शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्टेशनवर खाद्यपदार्थ विक्रीतून प्रवाशांची लूट;अधिकृत विक्रेत्यांकडूनच लूट सुरू असल्याने दाद कोणाकडे मागायची?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 13:20 IST

- या दराप्रमाणेच रेल्वेगाडीत खाद्यपदार्थांची विक्री करणे बंधनकारक आहे; परंतु येथेही प्रवाशांकडून जादा दर आकारले जाते. याबाबत आयआरसीटीसी अधिकाऱ्यांना विचारले असता बोलण्यास नकार दिला.

- अंबादास गवंडीपुणे :रेल्वेस्थानकावर अमूल, नेस कॅफे, हल्दीराम, लेहर यांसह इतर महत्त्वाच्या कंपन्यांकडून विविध खाद्यपदार्थांची विक्री करण्यात येते; परंतु या कंपन्यांकडून विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचे दर किरकोळ बाजारातील दरापेक्षा दुप्पट आहेत. शिवाय खाद्यपदार्थांतील वजनात देखील फरक आहे; परंतु प्रवाशांना याची माहिती नसल्याने गरजेच्या वेळी खरेदी करावे लागते. नामांकित कंपन्यांकडूनच प्रवाशांची खुलेआम लूट होत असल्याने दाद कोणाकडे मागायची? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रेल्वेचा प्रवास स्वस्त असल्याने लाखो प्रवासी प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. प्रवाशांना इंडियन केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (आयआरसीटीसी) आणि भारतीय रेल्वेकडून निविदा प्रक्रिया राबवून या कंपन्यांना रेल्वेस्थानकांवर पदार्थ विकण्यास परवानगी देण्यात येते; परंतु किरकोळ बाजार आणि रेल्वेस्थानकावर विकल्या जाणाऱ्या पदार्थांच्या दरात मोठी तफावत आहे. प्रवाशांना गरजेच्या वेळी नाइलाजाने पदार्थ खरेदी करावे लागते. याचा आर्थिक भुर्दंड प्रवाशांवर बसतो. अधिकृत विक्रेतेच लूट करत असल्याने प्रवाशांनी कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तसेच लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांमध्ये चहा, कॉफी, नाष्ट्याचे दर आयआरसीटीसीने ठरवून दिलेले आहेत. या दराप्रमाणेच रेल्वेगाडीत खाद्यपदार्थांची विक्री करणे बंधनकारक आहे; परंतु येथेही प्रवाशांकडून जादा दर आकारले जाते. याबाबत आयआरसीटीसी अधिकाऱ्यांना विचारले असता बोलण्यास नकार दिला.

असे आहेत दर...

हल्दीरामच्या शेव पॅकेट किरकोळ बाजारात १० रुपयाला ३७ ग्रॅम मिळते, तर रेल्वेस्थानकावर २० रुपयाला ५२ ग्रॅम मिळते. नियमानुसार हे पदार्थ ७४ ग्रॅम मिळाले पाहिजे. लेहरची कुरकुरे किरकोळ बाजारात १० रुपयाला ३९ ग्रॅम, तर रेल्वेस्थानकावर २० रुपयाला ५२ ग्रॅम मिळते. हल्दीरामचे फरसाण किरकोळ बाजारात १० रुपयाला ३९ ग्रॅम, रेल्वे स्थानकावर २० रुपयाला ५३ ग्रॅम मिळते. अमूल कोल कॅफे किरकोळ बाजारात ३५, तर रेल्वे स्थानकावर ६० रुपये इतके जादा दराने विकले जाते.

भारतीय रेल्वे ही जनतेची मालमत्ता आहे. ती कोणत्याही कंपनीच्या नफेखोरीसाठी किंवा प्रशासनाच्या साठगाठीसाठी वापरली जाऊ देणार नाही. देशातील सर्व रेल्वेस्थानकांवर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या उत्पादनांबाबत सुरू असलेली लूट आता सर्वांच्या लक्षात आली आहे. सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर हा सरळसरळ डाका आहे. या गंभीर प्रकरणावर आम्ही हल्दीराम कंपनीला दोन वेळा ईमेल करून उत्तर मागितले; परंतु एकदाही प्रतिसाद दिला गेला नाही.  युवक काँग्रेस हा मुद्दा जनतेच्या न्यायासाठी शेवटपर्यंत लढवणार आहे. - अक्षय जैन, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस 

English
हिंदी सारांश
Web Title : Railway Stations: Passengers Exploited by Overpriced Food; Who to Trust?

Web Summary : Passengers are being overcharged for food at railway stations, with prices often double that of retail stores. Popular brands like Haldiram's are implicated, raising questions about accountability and fair pricing for travelers. Youth Congress vows to fight this exploitation.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेpassengerप्रवासीrailwayरेल्वे