शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

जुन्नर तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; पावसामुळे खरीप कांदा लागवड उद्ध्वस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 19:48 IST

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात सतत आणि मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा कांद्याच्या कोवळ्या रोपांवर विपरीत परिणाम झाला आहे

आळेफाटा : जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यंदा पुन्हा एकदा मोठा आर्थिक फटका बसला आहे. रब्बी हंगामातील नुकसानीतून सावरायच्या आतच खरीप हंगामातील नवीन कांदा लागवड अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रति एकर हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात सतत आणि मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा कांद्याच्या कोवळ्या रोपांवर विपरीत परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी जमिनीत पाणी साचल्याने कांदा लागवड पूर्णपणे खराब झाली आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते, मजुरी आणि सिंचन यासाठी केलेला मोठा खर्च आता वाया गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, कर्जाची परतफेड करणे जवळपास अशक्य झाले आहे. शेतकरी आता प्रशासनाकडे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी करत आहेत. “रब्बी हंगामात कांदा सडला, आता खरीप कांदा पाण्यात गेला. कांदा न चिरतादेखील डोळ्यात पाणी आणतोय!” अशी खंत शेतकरी विजय चव्हाण यांनी व्यक्त केली.

तहसील कार्यालय आणि कृषी विभागाकडून अद्याप पंचनाम्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. शेतकऱ्यांचा आक्रोश वाढत असून, शासनाने तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, कांदा लागवडीसाठी केलेला खर्च आणि आता झालेले नुकसान यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान पाहता शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी होत आहे. तसेच, भविष्यात अशा नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक मदत योजनांचा लाभ मिळणे गरजेचे आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Junnar Farmers Devastated: Rain Ruins Onion Crop, Huge Losses

Web Summary : Junnar's onion farmers face massive losses as heavy rains destroy newly planted crops, compounding previous losses. Farmers demand immediate government assessment and compensation for ruined crops, pushing them into debt and despair.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊस