शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
3
एका दिवसात १ लाख कोटींचा धुराळा! टाटांच्या 'या' कंपनीचा शेअर धडाम; संक्रांतीपूर्वीच गुंतवणूकदारांना 'धक्का'
4
T20 Word Cup: ४ परदेशी खेळाडूंना भारताचा व्हिसा नाकारला; 'पाकिस्तान कनेक्शन' पडले महागात
5
"...तर तेव्हा उपमुख्यमंत्री झाले नसते'; बसवलेला मुख्यमंत्री म्हणत राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा
6
'काँग्रेसचा वाण नाही, पण गुण लागला' राज ठाकरेंच्या सभेनंतर उदय सामंतांचा टोला!
7
तुम्ही संभाजीनगरचे पालक, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक; संजय केनेकर शिरसाटांवर संतापले
8
IND vs NZ: विराट-शिखरचा विक्रम धोक्यात! श्रेयस अय्यर वनडे क्रिकेटमध्ये रचणार 'असा' इतिहास
9
२०००% नं वधारला हा स्मॉलकॅप शेअर, ₹54 वर आलाय भाव; आता कंपनी ₹84 कोटींचे भांडवल उभारणार
10
तुमच्या कुटुंबाचे भविष्य करा सुरक्षित! वर्षाला फक्त २० रुपये भरा आणि मिळवा २ लाखांचे कवच
11
मतदानादिवशी ठाकरे बंधूंचे 'भगवा गार्ड' मैदानात उतरणार, दुबार, बोगस मतदारांना पकडणार आणि...
12
Rohit Sharmaची पत्नी रितिकाच्या हातातल्या महागड्या पर्सची रंगली चर्चा, किंमत ऐकून थक्क व्हाल
13
"हेडगेवारांना कारावास झाला होता, पण...", भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील RSS च्या भूमिकेवर ओवेसींनी उपस्थित केला सवाल
14
'या' विमान कंपनीची नवी ऑफर: प्रवाशांना मोठी भेट; मोठ्यांना १,४९९ रुपयांपासून तर मुलांना १ रुपयांत विमान प्रवास
15
Nashik Municipal Election 2026 : उद्धवसेनेची अस्तित्वासाठी लढाई; नावालाच आघाडी, मैत्री मनसेशीच
16
Bornhan: मकर संक्रांत ते रथसप्तमी: बाळाची पहिली संक्रांत? मग 'बोरन्हाण' घालताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात!
17
Travel : एकटं फिरायचंय? टेन्शन सोडा! सोलो ट्रॅव्हलिंगसाठी 'ही' ५ ठिकाणे आहेत सर्वात बेस्ट
18
"हा साप मला चावलाय, माझ्यावर उपचार करा" सापाला खिशात घालून रिक्षा चालकानं गाठलं रुग्णालय
19
'वंदे भारत स्लीपर'चे तिकीट दर पाहून डोळे विस्फारतील! १३,३०० रुपयांपर्यंत, ४०० किमीसाठी ₹१५२०; किलोमीटरनुसार भाडे बदलणार...
20
Harsha Richhariya : "आता बस्स झालं, तुमचा धर्म तुमच्याकडेच ठेवा, मी सीता नाही..."; हर्षा रिछारियाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

केवळ २८ दिवसांचाच संसार; चार महिन्यांतच जोडपे झाले विभक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 19:17 IST

लग्नानंतर काही दिवसांतच वाद; परस्पर संमतीने घटस्फोटाचा निर्णय 

पुणे : लग्न म्हणजे दोन व्यक्तींनी एकत्र येऊन आयुष्याची नवीन सुरुवात करण्याचा क्षण; मात्र या जोडप्याच्या नशिबात हा क्षण अल्पकाळच टिकला. केवळ २८ दिवसच दोघे लग्नानंतर एकत्र राहिले. त्यानंतर मतभेद निर्माण झाल्याने दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अखेर जवळपास वर्षभराच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर या जोडप्याचा संसार कायमचा संपला आहे.

स्मिता आणि राकेश (नाव बदललेले) यांचे लग्न ७ जुलै २०२४ रोजी झाले. दोघेही उच्चशिक्षित असून, आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. लग्नानंतर काही दिवस सुखाने गेले; मात्र लगेच त्यांच्यातील मतभेद पुढे आले. वाद वाढत गेल्याने त्यांनी स्वतंत्रपणे राहण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये संवाद साधून तणाव कमी करण्याचे प्रयत्न दोन्ही कुटुंबीयांनी केले; परंतु त्यात यश आले नाही. शेवटी त्यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

यानंतर या जोडप्याने हिंदू विवाह अधिनियम, १९५५ च्या कलम १३(बी) अंतर्गत घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. हा अर्ज २० सप्टेंबर २०२५ ला येथील कौटुंबिक न्यायालयात दाखल करण्यात आला होता. कायद्यानुसार न्यायालयाने त्यांना सहा महिन्यांचा कुलिंग पिरियड’ देऊन पुन्हा विचार करण्याची संधी दिली; मात्र या कालावधीतही मतभेद मिटले नाहीत. परिणामी, ४ ऑक्टोबर २०२५ रोजी कौटुंबिक न्यायालयाने त्यांचा परस्पर संमतीचा घटस्फोटाचा दावा मंजूर केला.

न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या दाव्यात, दोघांनी एकमेकांकडून कोणतीही आर्थिक देवाणघेवाण नसल्याचे नमूद केले आहे. म्हणजेच मालमत्ता, रक्कम किंवा इतर कोणत्याही आर्थिक स्वरूपातील देणी-घेणी न करता दोघांनी शांततेने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या दाव्यात पती-पत्नीच्या वतीने ॲड. मंगेश कदम आणि ॲड. सुमेध जोगदंडे यांनी काम पाहिले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCourtन्यायालय