शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडी की फक्त शिवसेनेबरोबर युती? मनसैनिकांचा संभ्रम कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 20:52 IST

पक्षाध्यक्ष राज ठाकरे काय निर्णय घेतात याबद्दल त्यांच्यामध्ये उत्सुकता आहे, त्याचबरोबर लवकर काय तो निर्णय घेतला जावा, अशी अपेक्षाही.

पुणे : आपण महाविकास आघाडीत जाणार आहोत की फक्त शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाबरोबर आपली युती असणार आहे? असा संभ्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कायम आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे काय निर्णय घेतात याबद्दल त्यांच्यामध्ये उत्सुकता आहे, त्याचबरोबर लवकर काय तो निर्णय घेतला जावा, अशी अपेक्षाही.

हिंदी सक्तीच्या विरोधातील आंदोलन यशस्वी झाल्यापासून मनसे व शिवसेना (उबाठा) युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेनेकडून याबाबत वारंवार बोलले जात आहे, मात्र राज ठाकरे अजूनही अंतर राखून आहेत. आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांनी युतीबाबत काय बोलायचे ते मीच बोलेन, अन्य कोणीही बोलू नये, अशी तंबीच दिली आहे. मात्र, त्यामुळेच या विषयाबाबत अनेक प्रश्न मनसैनिकांच्या मनात घोळत आहेत. एकटे लढून पाहिल्यानंतर सातत्याने अपयश आल्यामुळे हे प्रश्न निर्माण होत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवण्याची इच्छा असलेल्या काही पदाधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधला असता त्यांपैकी अनेकांनी ही युती नक्की कशी आहे, असा प्रश्न केला. शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व काँग्रेस अशी महाविकास आघाडी आहे. मनसे आघाडीमध्ये सहभागी होणार की फक्त शिवसेनेबरोबर युती करणार, हा सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न मनसैनिकांमध्ये चर्चेत आहे. त्याचबरोबर त्याला अनेक बाजूही असल्याचे मनसैनिकांबरोबर झालेल्या चर्चेत निदर्शनास आले.

आघाडीत सामील व्हायचे असेल तर तसा काहीच विषय अजून झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस मराठी विजय मेळाव्याला उपस्थित असल्याने त्यांची संमती गृहीत धरली जात आहे. काँग्रेसची याला संमती मिळेल का? ते मान्य करतील का? असे प्रश्न आहेत. राज यांचे फक्त मराठीचे धोरण काँग्रेसच्या एकूण विचारधारेला अमान्य होणारे आहे. त्यामुळेच की काय त्यांच्यापैकी कोणीही मराठी विजय मेळाव्याला उपस्थित नव्हते. मात्र, शिवसेना व मनसे यांच्या एकत्र येण्याबद्दलही काँग्रेसने अद्यापतरी कसलेही भाष्य केलेले नाही.

फक्त शिवसेनेबरोबर युती करायची तर मनसैनिकांना ती हवी आहे, मात्र त्या परिस्थितीत महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला जेवढ्या जागा मिळतील, त्याच जागांमध्ये मनसेला वाटेकरी व्हावे लागेल. तसे असेल तर मोक्याच्या अनेक जागा हातच्या निसटतील, असे मनसैनिकांना वाटते आहे. जागा वाटपात मनसेचा स्वतंत्र विचार केला जावा. मुंबई वगळता राज्यातील ठाणे, नाशिक, पुणे या शहरांमध्ये मनसेचे चांगले राजकीय वजन आहे. त्यामुळे तिथे तडजोड करावी लागली तर ती मनसेला नको आहे. तिथल्या ज्या जागा पूर्वी मनसेकडे होत्या, त्या कायम राहाव्यात, असे त्यांचे म्हणणे आहे.

राज यांच्या युतीबाबत मीच काय ते बोलेन या भूमिकेमुळे त्यांनी लवकर निर्णय घ्यावा असे मनसेच्या वतीने निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. जागा व उमेदवार निश्चित झाले तर लगेचच प्रचाराला लागता येते, निर्णयाला विलंब झाला तर कमी दिवस हाताशी राहतात व मतदारांबरोबर संपर्क साधणे अवघड होते, त्याचा परिणाम मतांवर होतो, असे काही मनसैनिकांनी सांगितले.

पक्षाध्यक्षांपर्यंत भावना पोहचल्या आहेत

पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच कार्यकर्त्यांना तयारीला लागा, मतदार याद्यांवर लक्ष द्या असा आदेश दिला आहे. कार्यकर्त्यांच्या भावना पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. ते यावर योग्य तो निर्णय जाहीर करतील. तोपर्यंत कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील मतदार याद्या, मतदान केंद्र याकडे लक्ष द्यावे. - हेमंत संभूस, राज्य सरचिटणीस, मनसे

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMahayutiमहायुती