शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
3
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
4
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
5
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
7
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
8
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
9
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
10
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
11
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
13
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
14
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
15
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
16
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
17
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
18
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
19
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
20
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

पोळे गावात बिबट्यांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांच्या जनावरांना लक्ष्य; वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 13:16 IST

संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्यांना पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

पानशेत : पानशेत धरण परिसरातील पोळे (ता. राजगड) येथे दोन बिबट्यांनी मुक्काम ठोकला असून, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एक नर आणि एक मादी अशा या दोन बिबट्यांनी गेल्या पाच दिवसांत सहा वेळा हल्ले करून शेतकऱ्यांची चार बकऱ्या आणि तीन कुत्री फस्त केली आहेत. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्यांना पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

देवमाळ वस्ती येथील शेतकरी बबन भांबू ढेबे यांची एक शेळी आणि बोकड, तसेच लक्ष्मण कोंडीबा ढेबे यांची एक शेळी बिबट्यांनी खाल्ली. पेरूदंडवस्ती येथील रामभाऊ विठ्ठल ढेबे यांच्या घराजवळून एक कुत्रा फस्त करण्यात आला. याशिवाय, दि. १४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता बबन भांबू ढेबे यांच्या घराजवळील एक कुत्री, तर दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता कंधारवस्ती येथील आप्पा भागुजी ढेबे यांची एक शेळी आणि त्याच दिवशी देवमाळ वस्ती येथील बबन भांबू ढेबे यांचा एक कुत्रा बिबट्यांनी फस्त केला.

बिबट्यांच्या सततच्या हल्ल्यांमुळे पोळे गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. ‘दररोज जनावरांवर हल्ले होत असून आमचे मोठे नुकसान होत आहे. वनविभागाने तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करून नुकसान भरपाई द्यावी,’ अशी मागणी शेतकरी बबन भांबू ढेबे यांनी केली. या घटनेची माहिती पांडुरंग ढेबे यांनी वनविभागाला फोनद्वारे कळवली आहे. वनविभागाचे वनरक्षक संतोष रणसिंगे आणि वैशाली हडाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामे केले आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी (वेल्हे) अनिल लांडगे म्हणाले, ‘पोळे ग्रामस्थांशी संवाद साधला असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय नियमानुसार मदत दिली जाईल. ग्रामस्थांचे लेखी निवेदन मिळाल्यास वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावला जाईल.’ वनविभागाने शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. ‘वनक्षेत्रात जनावरे सोडू नयेत. बिबट्यांना लहान जनावरे सोपे लक्ष्य ठरतात. त्यामुळे बकऱ्या आणि कुत्र्यांना एकटे सोडू नये. तसेच, नागरिकांनी एकट्याने जंगलात जाऊ नये,’ असे वनविभागाने सांगितले. ‘पोळे गावात दोन बिबट्यांचा मुक्काम आहे. दररोज जनावरांवर हल्ले होत असून, आमचे नुकसान होत आहे. यामुळे भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने बिबट्यांना पकडून आम्हाला दिलासा द्यावा,’ असे शेतकरी बबन भांबू ढेबे यांनी सांगितले. पोळे गावातील बिबट्यांचा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी वनविभाग आणि ग्रामस्थ यांच्यात समन्वयाची गरज आहे. जोपर्यंत बिबट्यांना पकडले जात नाही, तोपर्यंत गावकऱ्यांमधील भीती कायम राहणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड