शहरं
Join us  
Trending Stories
1
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
2
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
3
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
4
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
5
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
6
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
7
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
8
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
9
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
10
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
11
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
12
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
13
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
14
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
15
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
16
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
17
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
18
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
19
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
20
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
Daily Top 2Weekly Top 5

पोळे गावात बिबट्यांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांच्या जनावरांना लक्ष्य; वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 13:16 IST

संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्यांना पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

पानशेत : पानशेत धरण परिसरातील पोळे (ता. राजगड) येथे दोन बिबट्यांनी मुक्काम ठोकला असून, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एक नर आणि एक मादी अशा या दोन बिबट्यांनी गेल्या पाच दिवसांत सहा वेळा हल्ले करून शेतकऱ्यांची चार बकऱ्या आणि तीन कुत्री फस्त केली आहेत. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्यांना पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

देवमाळ वस्ती येथील शेतकरी बबन भांबू ढेबे यांची एक शेळी आणि बोकड, तसेच लक्ष्मण कोंडीबा ढेबे यांची एक शेळी बिबट्यांनी खाल्ली. पेरूदंडवस्ती येथील रामभाऊ विठ्ठल ढेबे यांच्या घराजवळून एक कुत्रा फस्त करण्यात आला. याशिवाय, दि. १४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता बबन भांबू ढेबे यांच्या घराजवळील एक कुत्री, तर दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता कंधारवस्ती येथील आप्पा भागुजी ढेबे यांची एक शेळी आणि त्याच दिवशी देवमाळ वस्ती येथील बबन भांबू ढेबे यांचा एक कुत्रा बिबट्यांनी फस्त केला.

बिबट्यांच्या सततच्या हल्ल्यांमुळे पोळे गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. ‘दररोज जनावरांवर हल्ले होत असून आमचे मोठे नुकसान होत आहे. वनविभागाने तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करून नुकसान भरपाई द्यावी,’ अशी मागणी शेतकरी बबन भांबू ढेबे यांनी केली. या घटनेची माहिती पांडुरंग ढेबे यांनी वनविभागाला फोनद्वारे कळवली आहे. वनविभागाचे वनरक्षक संतोष रणसिंगे आणि वैशाली हडाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामे केले आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी (वेल्हे) अनिल लांडगे म्हणाले, ‘पोळे ग्रामस्थांशी संवाद साधला असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय नियमानुसार मदत दिली जाईल. ग्रामस्थांचे लेखी निवेदन मिळाल्यास वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावला जाईल.’ वनविभागाने शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. ‘वनक्षेत्रात जनावरे सोडू नयेत. बिबट्यांना लहान जनावरे सोपे लक्ष्य ठरतात. त्यामुळे बकऱ्या आणि कुत्र्यांना एकटे सोडू नये. तसेच, नागरिकांनी एकट्याने जंगलात जाऊ नये,’ असे वनविभागाने सांगितले. ‘पोळे गावात दोन बिबट्यांचा मुक्काम आहे. दररोज जनावरांवर हल्ले होत असून, आमचे नुकसान होत आहे. यामुळे भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने बिबट्यांना पकडून आम्हाला दिलासा द्यावा,’ असे शेतकरी बबन भांबू ढेबे यांनी सांगितले. पोळे गावातील बिबट्यांचा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी वनविभाग आणि ग्रामस्थ यांच्यात समन्वयाची गरज आहे. जोपर्यंत बिबट्यांना पकडले जात नाही, तोपर्यंत गावकऱ्यांमधील भीती कायम राहणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड