शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

रखडलेले रुंदीकरण, अतिक्रमण अन् खड्ड्यांमुळे पुणेकरांचा कोंडला श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 10:45 IST

- महामार्ग प्राधिकरण, वाहतूक विभागाच्या होणाऱ्या दुर्लक्षामुळे वाहनधारकांना मनस्ताप

- अंबादास गवंडीपुणे : पुणे शहरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. इतर शहरांतून पुण्याला जोडणाऱ्या महामार्गांवरील कोंडी ही नेहमीचीच समस्या झालेली आहे. सोलापूर ते पुणे, नाशिक ते पुणे, तळेगाव ते शिक्रापूर या महामार्गांचे रुंदीकरण रखडले असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे शहराच्या प्रवेशद्वारांवर पोहोचताना काही किलाेमीटरच्या वाहनांच्या रांगा लागत आहेत.

याचा मोठा मनस्ताप पुणेकरांना सोसावा लागत आहे. सरकार आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता यासाठी कारणीभूत असून, वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात अद्याप यश मिळालेले नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हडपसर ते यवत, नाशिक फाटा ते खेड आणि तळेगाव ते शिक्रापूर या महामार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी केंद्रीय भूपृष्ठ नागरी वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शहराला जोडणारे महामार्ग आणि शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडीच्या स्थितीबाबत हा आढावा घेतला आहे.

महामार्गावरील वाढता ताण लक्षात घेऊन सुरक्षित आणि वेगवान वाहतुकीसाठी शहराच्या चाेहोबाजूंना रस्त्यांचे जाळे विणण्यात आले आहे; परंतु महामार्गावर पडलेले खड्डे, सर्व्हिस रोडवर उभे केलेली वाहने, वाढते अतिक्रमण, वाढत्या वाहनांची संख्या यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा वेग कमी झाला असून, अपघातांचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यामुळे शहरातील आसपासच्या उपनगरांत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसते. खरेतर, वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सर्व्हिस रोड करण्यात आले आहेत. मात्र, शहरातील चारही बाजूंना असणाऱ्या सर्व महामार्गांवरील सर्व्हिस रोडवर वाहने उभी करण्यात येत असल्याने सर्व्हिस रोडवर खुलेआम अतिक्रमण झाले आहे. सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पार्किंग होत असल्याने दररोज महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. याकडे महामार्ग प्राधिकरण, वाहतूक विभागाचे होणारे दुर्लक्ष वाहनधारकांना त्रासदायक ठरत असून, दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा विळखा अधिकाधिक घट्ट होत आहे. 

शहराशेजारी महामार्गांचे वास्तव भयाणसोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, मुंबई आणि सातारा या बाजूने पुणे शहरात येणाऱ्या वाहनांची संख्या खूपच जास्त आहे; परंतु शहराशेजारी असलेल्या या भागातील महामार्गांचे विस्तारीकण झालेले नाही. साेलापूर मार्गावर यवतपर्यंत दुपदरीकरण आहे. तिथून पुढे चाैपदरीकरण आहे. पुणे-अहिल्यानगर मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात समावेश झाल्यानंतरही गेल्या दहा वर्षांपासून रुंदीकरण रखडले असून, सेवा रस्त्याअभावी विरुद्ध दिशेने होणाऱ्या वाहतुकीमुळे कोंडीत भर पडत आहे. नाशिक मार्गाचे खेडपर्यंत रुंदीकरण झाले नाही. पुणे-मुंबई महामार्गाचे रुंदीकरण झाले तरी अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे. पुणे-सातारा महामार्गाचे काम अजून पूर्ण झाले नाही. यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडीला आयते आमंत्रण मिळते. पर्यायी वाहतूक कोंडी होते.

 रिंग रोडचे काम संथगतीने

राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) प्रस्तावित वर्तुळाकार रस्त्याचे (रिंग रोड) काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. निविदा प्रक्रिया राबवून निवड करण्यात आलेल्या कंपन्यांना अडीच वर्षांत काम पूर्ण करण्याच्या उद्दिष्टानुसार आदेश दिले आहेत. त्यामुळे संबंधित नऊ कंपन्यांनी एकत्रितपणे प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाकडून १७२ किलोमीटर लांब आणि ११० मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत. त्यासाठी सुमारे ४२ हजार कोटी रुपयांचा खर्च होणार असून, पश्चिम भागातील ९९ टक्के, तर पूर्व भागातीलही ९८ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे; परंतु शहरातील वाहनसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्या तुलनेत रिंग रोडचे काम होताना दिसत नाही. 

सरकारच्या केवळ घोषणाचदहा वर्षांपूर्वी अहिल्यानगर महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात समावेश झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे-अहिल्यानगर मार्गाचे रांजणगावपर्यंत पाच मजली उड्डाणपुलाद्वारे विस्तारीकरण करणार अशी घोषणा केली होती. त्यानंतर तीन मजली करण्याची घोषणा करण्यात आली. आता दुमजली उड्डाणपूल करण्याचे नियोजन असल्याचे समजते. त्यांनतर या महामार्गाचे अनेकदा सर्वेक्षण करूनदेखील प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. सरकार केवळ पोकळ घोषणा करून आश्वासन देत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

 शहरालगत जाणारे महामार्ग

जोडणारे शहर - महामार्ग क्रमांकपुणे-मुंबई - ४८

पुणे-सातारा - ४८पुणे-सोलापूर - ६५

पुणे-नाशिक - ६०

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtraffic policeवाहतूक पोलीस