शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

दोन जातींच्या दोन वेगळ्या समित्या नेमण्याची गरज काय? शरद पवारांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 17:21 IST

राजकारण न करता सामाजिक ऐक्य साधण्याचा प्रयत्न करणे महत्वाचे आहे असे ते म्हणाले.

 पुणे: राज्यात दोन समाजांच्या दोन वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्याची आवश्यकता होती का? असा प्रश्न करत ज्येष्ठ नेते आरक्षणाच्या मागण्यांवर राज्यकर्त्यांकडून घेतल्या जात असलेल्या भूमिकांवर नाराजी व्यक्त केली. राजकारण न करता सामाजिक ऐक्य साधण्याचा प्रयत्न करणे महत्वाचे आहे असे ते म्हणाले.मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आलेल्या पवार यांनी माध्यम प्रतिनिधींबरोबर संवाद साधला. त्यावेळी राज्यातील सामाजिक वातावरण बिघडले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, बंजारा समाजाने त्यांचा आदिवासी वर्गात समावेश व्हावा म्हणून मोर्चा काढला. दुसऱ्याच दिवशी आदिवासी समाजाचा मोर्चा झाला. दोन समाजांमध्ये कारण नसताना वातावरण वेगळे व्हायला लागले. आता सरकारने दोन समित्या नेमल्या. एक एका जातीची एक दुसऱ्या जातीची. यात एकजण दुसऱ्याचा विचार करणार नाही. असे करण्याची, दोन वेगवेगळ्या समित्या नेमण्याची गरज होती का? सामाजिक वीण दुबळी होत आहे.

राजकारण न करता सामाजिक ऐक्य साधण्याचा प्रयत्न होणे महत्वाचे आहे. हैद्राबाद गॅझेटविषयी कधीच वाचले नव्हते. तो भाग महाराष्ट्रात नव्हता. त्याच्या खोलात आम्ही कधी गेलो नाही. प्रत्येक जातीची वेगळी मागणी असेल तर ऐक्य कसे होईल? असा प्रश्न पवार यांनी केला.

सोलापूरात रस्त्यावरून पाणी वाहिले असे कधी ऐकले, पाहिले नव्हते. इकडे लोणी काळभोरमध्येही घरांमध्ये पाणी घुसले. उसाचे व अन्य पिकाचेही नुकसान झाले आहे. चाऱ्या असतात त्या बुजवल्या. पाणी वाहून जायचा सोर्स बुजवला. किल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे की ताबडतोब पंचनामे सुरू करा.  केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक तरतूद होत असते. आप त्ती निधी  मिळत  असतो.  सरकारकडे मागणी केली आहे. त्यांनी प्रक्रिया गतीमान केल्याचे क‌‌ळवले आहे असे पवार यांनी सांगितले.अलमट्टी धरणाची उंची वाढवली जात आहे याकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले, याबाबत सरकारने लवकर तेथील सरकारबरोबर काही करायला हवे. नाहीतर सोलापूर कोल्हापूर भागात भयंकर स्थिती निर्माण होईल. साखर व्यवसायातील कामगारांचा कोल्हापूरला मेळावा आहे, तिथे जाणार आहे, त्यावेळी याची माहिती घेऊ. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले. एकदा झाले, दुसऱ्यांदाही तेच झाले, त्यामुळे आता न्यायालयाने घेतलेला निर्णय चांगलाच आहे असे ते म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSharad Pawarशरद पवार