शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
2
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
3
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
4
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
5
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
6
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
7
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
8
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
9
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
10
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
11
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
12
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
13
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
14
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
15
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
16
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
17
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
18
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
19
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
20
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!

शेतकऱ्यांसाठी मदतनिधी मिळविण्याचे सरकारचा प्रयत्न : दत्तात्रय भरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 13:18 IST

आम्ही शेतकऱ्यांचे हित जपणारे आहोत. येणाऱ्या काळात चांगली मदत शेतकऱ्यांना केली जाईल, असे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट कोसळले आहे. राज्यभरात ९२ लाख एकर शेतीचे नुकसान झाले असून त्यापैकी सप्टेंबर महिन्यात ५३ लाख ३८ हजार एकर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम झाला असून, पिकांचे संपूर्ण विनाश झाल्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मदत निधीच्या माध्यमातून मदत मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी (दि.२५) दिल्लीला गेले होते. "आम्ही शेतकऱ्यांचे हित जपणारे आहोत. येणाऱ्या काळात चांगली मदत शेतकऱ्यांना केली जाईल, असे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या घटनांवर बोलताना मंत्री भरणे यांनी भावनिक आवाहन केले. "हे नैसर्गिक संकट आहे. शेतकऱ्यांनी धीर धरला पाहिजे. कुटुंबाने कोणाकडे पाहून जगायचं? शेतकऱ्यांनी हताश होऊ नये. राज्य सरकार शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगून त्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही भाष्य केले. "कर्जमाफीबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्यवेळी निर्णय घेतील. शेतकऱ्याला पुन्हा उभ करण्याचा प्रयत्न सुरू आहेत," असे ते म्हणाले. मात्र, या निर्णयासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नदीकाठावरील अतिक्रमणांच्या मुद्द्यावर बोलताना मंत्री भरणे यांनी वास्तवाची जाणीव करून दिली. "नदी ओढे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहेत. हे समजून घेतले पाहिजे. त्यामुळे पूरप्रवण क्षेत्र वाढले असून, भविष्यात अशी संकते टाळण्यासाठी कायदेशीर उपाययोजना कराव्यात," असे ते म्हणाले. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला अतिक्रमण हटाव अभियान राबवण्याचे निर्देश दिल्याचेही त्यांनी उल्लेख केला.

धाराशिव (बीड) जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्याच्या वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणावरही मंत्री भरणे यांनी प्रतिक्रिया दिली. शेतकऱ्यांच्या तक्रारींमुळे हे प्रकरण चर्चेत आले असून, "मी याबाबत माहिती घेईन. व्हिडिओ तपासाला जाईल," असे ते म्हणाले.

माती वाहून गेली तरी भरपाई

हवामान बदलाचा सर्वाधिक फटका शेकऱ्यांना बसत आहे. काही ठिकाणी माती वाहून गेली आहे तर काही ठिकाणी विहिर बुजली आहे अशांनाही नुकसान भरपाई दिली जाणार आहे. याशिवाय पावसामुळे एक ते पाच गुंठ्यांमधील शेतीचे नुकसान झाले असे तर त्यांनाही नुकसान भरपाई देण्यात येईल. तसेच कृषी समृद्ध योजना लवकरच प्रभावीपणे राबविण्यात येईल असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Government Efforts to Secure Aid for Farmers: Dattatraya Bharane

Web Summary : The government is striving to provide assistance to farmers affected by widespread crop damage due to recent natural disasters. Minister Dattatraya Bharane assured that the government is committed to helping farmers recover, addressing loan waivers and acknowledging challenges posed by river encroachments. Compensation will be provided for soil erosion and well damage.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस