शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
4
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
5
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
6
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
7
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
8
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
9
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
11
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
12
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
13
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
14
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
15
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
16
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
17
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
18
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
19
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
20
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?

मिळकत पत्रिकेतील पाच फेरफार आता ऑनलाईन, वेळ आणि हेलपाटेही वाचणार, भूमी अभिलेखकडून प्रणाली विकसित

By नितीन चौधरी | Updated: March 21, 2025 13:44 IST

येत्या आठवडाभरात याचे अधिकृतरित्या उद्घाटन होईल.

पुणे : राज्यातील २१ हजार शहरांमधील सुमारे ८५ लाख कोटी मिळकत पत्रिकांमधील पाच प्रकारचे फेरफार आता संपूर्णपणे ऑनलाईन करण्यात येणार आहेत. भूमी अभिलेख विभागाने यासाठी स्वतंत्र प्रणाली तयार केली आहे. खरेदीखत, वारस नोंद, बक्षीसपत्र, हक्कसोड; तसेच गहाणखत या फेरफारसाठी ऑनलाईनच अर्ज करावे लागणार असून, अर्जावरील प्रत्येक टप्प्यावर कोणती कार्यवाही केली जात आहे, याची माहितीही अर्जदारांना एसएमएस आणि ईमेलद्वारे कळविण्यात येणार आहे. विभागाकडून हे फेरफारही ऑनलाईनच नोंदविले जाणार असल्याने नागरिकांचा वेळ आणि हेलपाटे वाचणार आहेत. तसेच कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार आहे. येत्या आठवडाभरात याचे अधिकृतरित्या उद्घाटन होईल.

भूमी अभिलेख विभागाने ईप्सित अर्थात इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टी सिस्टीम इंटिग्रेटेड टूल ही संगणकप्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीत आता मिळकत पत्रिकेत केले जाणारे फेरफार आता ऑनलाईन केले जाणार आहेत. त्यात खरेदीखत, वारस नोंद, बक्षीसपत्र, हक्कसोड; तसेच गहाणखत या प्रमुख पाच प्रकारांचा समावेश आहे. मिळकत पत्रिकांमध्ये केल्या जाणाऱ्या एकूण फेरफारांमध्ये या पाच फेरफारांचे प्रमाण तब्बल ७४ टक्के असते. त्यामुळे या फेरफारांसाठी अर्ज ऑनलाईन करण्याचे भूमी अभिलेख विभागाने ठरविल्याचे जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी असा फेरफार करण्यासाठी लेखी अर्ज करावा लागत होता. त्यानंतर संबंधित कर्मचारी हा अर्ज विभागाच्या प्रणालीत केव्हा घ्यायचा हे स्वत: ठरवित होता. त्यानंतर अर्जाची तपासणी करून त्रुटी असल्यास अर्जदाराला सूचित करणे आणि फेरफार तयार करणे, यात मोठा अवधी जात होता. यासाठी ठराविक कालमर्यादा निश्चित नव्हती. यात अर्ज गहाळ होणे, त्यावर कार्यवाही न करणे अशा तक्रारींचे प्रमाण मोठे होते. तसेच गैरमार्गाचा वापरही केला जात होता. नागरिकांना यासाठी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत होते. त्यात वेळही खर्ची पडत होता. आता अर्जच ऑनलाईन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी महाभूमी पोर्टलवरच स्वतंत्र टॅब उपलब्ध असेल. अर्जदाराला लॉगिन आयडी तयार करून कागदपत्र अपलोड करता येणार आहेत. त्यासाठी अर्जदाराने आपला संपूर्ण पत्ता आणि मोबाईल क्रमांक अचूक द्यायचा आहे. यावरच अर्जाची ताजी स्थिती अर्जदाराला कळविण्यात येणार आहे.

अर्ज केल्यानंतर त्यात कागदपत्रांची त्रुटी असल्यास अर्जदाराला ऑनलाईनच कळविण्यात येणार आहे. तसेच अर्जदारानेही ही त्रुटी ऑनलाईनच पूर्ण करायची आहे. संबंधित कर्मचाऱ्याने त्यानंतर त्यावर हरकती किती आल्या, सुनावणी कशी झाली, याची माहितीही ऑनलाईनच द्यायची आहे. तसेच फेरफार नोंदही ऑनलाईन करायची आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन झाल्याने नागरिकांचे कार्यालयामधील हेलपाटेही वाचणार आहेत. तसेच कर्मचाऱ्यांच्या मर्जीनुसार काम करण्याला आळा बसणार आहे. त्यासाठी परिपूर्ण अर्जावर निर्धारित २५ दिवसांत फेरफार नोंदवावा लागणार आहे.

या प्रणालीमुळे नागरिकांचे काम सोपे होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या प्रणालीचे येत्या आठवडाभरात उद्घाटन करण्यात येणार आहे.- सुहास दिवसे, जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGovernmentसरकार