शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

मिळकत पत्रिकेतील पाच फेरफार आता ऑनलाईन, वेळ आणि हेलपाटेही वाचणार, भूमी अभिलेखकडून प्रणाली विकसित

By नितीन चौधरी | Updated: March 21, 2025 13:44 IST

येत्या आठवडाभरात याचे अधिकृतरित्या उद्घाटन होईल.

पुणे : राज्यातील २१ हजार शहरांमधील सुमारे ८५ लाख कोटी मिळकत पत्रिकांमधील पाच प्रकारचे फेरफार आता संपूर्णपणे ऑनलाईन करण्यात येणार आहेत. भूमी अभिलेख विभागाने यासाठी स्वतंत्र प्रणाली तयार केली आहे. खरेदीखत, वारस नोंद, बक्षीसपत्र, हक्कसोड; तसेच गहाणखत या फेरफारसाठी ऑनलाईनच अर्ज करावे लागणार असून, अर्जावरील प्रत्येक टप्प्यावर कोणती कार्यवाही केली जात आहे, याची माहितीही अर्जदारांना एसएमएस आणि ईमेलद्वारे कळविण्यात येणार आहे. विभागाकडून हे फेरफारही ऑनलाईनच नोंदविले जाणार असल्याने नागरिकांचा वेळ आणि हेलपाटे वाचणार आहेत. तसेच कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार आहे. येत्या आठवडाभरात याचे अधिकृतरित्या उद्घाटन होईल.

भूमी अभिलेख विभागाने ईप्सित अर्थात इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टी सिस्टीम इंटिग्रेटेड टूल ही संगणकप्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीत आता मिळकत पत्रिकेत केले जाणारे फेरफार आता ऑनलाईन केले जाणार आहेत. त्यात खरेदीखत, वारस नोंद, बक्षीसपत्र, हक्कसोड; तसेच गहाणखत या प्रमुख पाच प्रकारांचा समावेश आहे. मिळकत पत्रिकांमध्ये केल्या जाणाऱ्या एकूण फेरफारांमध्ये या पाच फेरफारांचे प्रमाण तब्बल ७४ टक्के असते. त्यामुळे या फेरफारांसाठी अर्ज ऑनलाईन करण्याचे भूमी अभिलेख विभागाने ठरविल्याचे जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी असा फेरफार करण्यासाठी लेखी अर्ज करावा लागत होता. त्यानंतर संबंधित कर्मचारी हा अर्ज विभागाच्या प्रणालीत केव्हा घ्यायचा हे स्वत: ठरवित होता. त्यानंतर अर्जाची तपासणी करून त्रुटी असल्यास अर्जदाराला सूचित करणे आणि फेरफार तयार करणे, यात मोठा अवधी जात होता. यासाठी ठराविक कालमर्यादा निश्चित नव्हती. यात अर्ज गहाळ होणे, त्यावर कार्यवाही न करणे अशा तक्रारींचे प्रमाण मोठे होते. तसेच गैरमार्गाचा वापरही केला जात होता. नागरिकांना यासाठी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत होते. त्यात वेळही खर्ची पडत होता. आता अर्जच ऑनलाईन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी महाभूमी पोर्टलवरच स्वतंत्र टॅब उपलब्ध असेल. अर्जदाराला लॉगिन आयडी तयार करून कागदपत्र अपलोड करता येणार आहेत. त्यासाठी अर्जदाराने आपला संपूर्ण पत्ता आणि मोबाईल क्रमांक अचूक द्यायचा आहे. यावरच अर्जाची ताजी स्थिती अर्जदाराला कळविण्यात येणार आहे.

अर्ज केल्यानंतर त्यात कागदपत्रांची त्रुटी असल्यास अर्जदाराला ऑनलाईनच कळविण्यात येणार आहे. तसेच अर्जदारानेही ही त्रुटी ऑनलाईनच पूर्ण करायची आहे. संबंधित कर्मचाऱ्याने त्यानंतर त्यावर हरकती किती आल्या, सुनावणी कशी झाली, याची माहितीही ऑनलाईनच द्यायची आहे. तसेच फेरफार नोंदही ऑनलाईन करायची आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन झाल्याने नागरिकांचे कार्यालयामधील हेलपाटेही वाचणार आहेत. तसेच कर्मचाऱ्यांच्या मर्जीनुसार काम करण्याला आळा बसणार आहे. त्यासाठी परिपूर्ण अर्जावर निर्धारित २५ दिवसांत फेरफार नोंदवावा लागणार आहे.

या प्रणालीमुळे नागरिकांचे काम सोपे होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या प्रणालीचे येत्या आठवडाभरात उद्घाटन करण्यात येणार आहे.- सुहास दिवसे, जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGovernmentसरकार