शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

शेतं जलमय, जनजीवन विस्कळीत..! शिरूर तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 17:25 IST

तलावाच्या काठावरून पाण्याचा विसर्ग झाल्याने आणि शेंडगेवाडी तलावही तुडुंब भरल्याने खालच्या भागातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे

रांजणगाव सांडस : शिरूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ओढे, नाले आणि तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. आलेगाव पागा परिसरात पाण्याचा विसर्ग झाल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आलेगाव पागा येथील प्रसिद्ध तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. तलावाच्या काठावरून पाण्याचा विसर्ग झाल्याने आणि शेंडगेवाडी तलावही तुडुंब भरल्याने खालच्या भागातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परिसरातील ओढ्यावरील बंधारेही पूर्णपणे भरले असून, अनेक शेतांतील माती वाहून गेली आहे. हरिश्चंद्र गुंजाळ यांच्या शेतातील बाजरीचे पीक भुईसपाट झाले असून, लागवड केलेले ऊस पीकही पाण्याबरोबर वाहून गेले आहे. पिके पाण्यात बुडाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

वस्त्यांचा संपर्क तुटला

पावसाच्या पाण्यामुळे गुंजाळ वस्ती आणि मायदर मळा येथील नागरिकांचा गेल्या दोन दिवसांपासून संपर्क तुटला होता. आलेगाव पागा स्मशानभूमीजवळील ओढ्याला महापूर आल्याने भोसले वस्तीतील नागरिकांचाही जनसंपर्क खंडित झाला होता. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आता हळूहळू या भागातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे.

वाहतूक आणि जनावरांवर परिणाम

मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक लहान-मोठे ओढे वाहू लागले असून, काही रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पाण्याचा वेग इतका वाढला की, काही शेतकऱ्यांना आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावी लागली. बाजरीचे उभे पीक आणि काढलेली बाजरी पावसाच्या पाण्यात भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, तरीही काही शेतकऱ्यांमध्ये पावसामुळे समाधानाची भावना आहे.

प्रशासनाचा इशारा, शेतकऱ्यांची मागणी

प्रशासनाने पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून सतर्कतेचा इशारा दिला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून शासकीय मदत मिळावी, अशी मागणी भाऊसाहेब भोसले यांनी केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेRainपाऊस