शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

उपमुख्यमंत्री पवार यांनी ग्रामस्थांची व्यथा ऐकून घेतलीच नाही; हिंजवडीतील विधानावर ग्रामस्थ संतप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 12:55 IST

हिंजवडीतील प्रश्न सोडविण्याबाबत उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी दोनदा या परिसराची पाहणी केली. शनिवारी सकाळी पवार हिंजवडीत आले असता, स्थानिकांनीही आपली मते मांडली.

हिंजवडी : हिंजवडी विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सकाळी भेट दिली. त्यावेळी हिंजवडीकर स्थानिकांनी प्रश्न मांडले. त्यावेळी पवार यांनी हिंजवडीकरांचे कान टोचले. याबाबत ‘उपमुख्यमंत्री पवार यांनी ग्रामस्थांची व्यथा ऐकून घेतलीच नाही’, अशी नाराजी हिंजवडीकरांनी व्यक्त केली आहे.

हिंजवडीतील प्रश्न सोडविण्याबाबत उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी दोनदा या परिसराची पाहणी केली. शनिवारी सकाळी पवार हिंजवडीत आले असता, स्थानिकांनीही आपली मते मांडली. त्यावेळी पवार यांनी प्रश्न मांडणाऱ्यांचे कान टोचले. ‘नेत्यांनी ग्रामस्थांची व्यथा ऐकून घेतलीच नाही’, अशा भावना व्यक्त करत या भागातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वाहतूक कोंडीची समस्या सुटली पाहिजे, ह्याच्याशी आम्हीसुद्धा सहमत आहे. किंबहुना तशी आमची मागणीसुद्धा आहे. मात्र, रस्ता रुंदीकरण करताना किमान गावठाण भागात स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे आणि त्यांचा एकदा सहानुभूतीपूर्वक विचार करणे गरजेचे आहे. - सचिन आढाव, ग्रामस्थ, माण 

आज अजित पवार हे पाहणी दौरा करण्यासाठी आले होते. त्यांनी ग्रामस्थांची व्यथा ऐकून घेतलीच नाही. अधिकाऱ्यांनी त्यांना जे सांगितले होते, त्यानुसार, ३६ मीटर रस्ता होणार त्यात काही बदल होणार नाही, असं सांगितलं. यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या भावना पायदळी तुडवल्या गेल्याची भावना व्यक्त होत आहे.- शिवाजी भिलारे, ग्रामस्थ, माण

माण-हिंजवडी रस्ता प्रशस्त व्हावा, असं आम्हाला सुद्धा वाटतं. मात्र, किमान काही ठिकाणी, काय अडचण आहे, याबाबत पवार यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन, त्यांचे म्हणणे जरा ऐकून घेणे गरजेचे आहे. - पांडुरंग राक्षे, ग्रामस्थ, माण

मागील २१ वर्षांपासून आयटी पार्क टप्पा क्रमांक चारसाठी प्रस्तावित भूसपादनांचे शेरे आमच्या सातबारावर दाखल आहेत. परंतु, वेळोवेळी पाठपुरावा करूनही अद्यापपर्यंत आमच्या सातबारावरील शिक्का कमी झालेला नाही. याकडेही पवार यांनी एवढेच आक्रमक होऊन लक्ष देणे गरजेचे आहे. - मल्हारी बोडके, सचिव, माण गाव बचाव कृती समिती

हिंजवडी सरपंचांनी हिंजवडी गावठाण रस्ता रुंदीकरणाबाबत काही ग्रामस्थांच्या भावना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, पवार यांनी ते व्यवस्थित ऐकून घेतले नाही. त्यांनी किमान ग्रामस्थांच्या भावना ऐकून घेणे गरजेचे आहे. - विक्रम साखरे, माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, हिंजवडी

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवार