शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

राज्यात ६ लाख ५० हजार इतक्या असाक्षरांनी दिली परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 09:27 IST

उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत आयोजन

पुणे : केंद्रपुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत (एनबीएसके -२०२२-२७) पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवारी (दि. २३) पार पडली. राज्यात एकूण ५३ हजार २७१ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला राज्यभरातून ८ लाख ४ हजार इतक्या असाक्षरांनी परीक्षा देणे अपेक्षित होते. त्यापैकी सुमारे ६ लाख ५० हजार इतक्या असाक्षरांनी परीक्षा दिली.

पंधरा वर्षे आणि त्यावरील वयोगटातील असाक्षर व्यक्तींमध्ये महत्त्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसित करण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. या कौशल्यांमध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण, इ. बाबींचा समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत २०२४-२५ मध्ये उल्लास अॅपवर नोंदणी झालेल्या असाक्षरांसाठी ही चाचणी घेण्यात आली. परीक्षा केंद्रावर ऑफलाइन पद्धतीने व असाक्षरांच्या सोयीनुसार चाचणी घेण्यात आली. एकूण १५० गुणांची ही चाचणी घेण्यात आली. मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, कन्नड, तेलुगू, तमीळ, बंगाली अशा एकूण ९ माध्यमांतून ही चाचणी घेण्यात आली. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी विहित निकषानुसार उत्तीर्ण झाल्यानंतर नवसाक्षरांना केंद्रशासनाकडून प्रमाणपत्र / गुणपत्रक देण्यात येणार आहे.

यावेळी असाक्षरांचे औक्षण करून, पुस्तक, गुलाबपुष्प / पुष्पगुच्छ देऊन तसेच गोड खाऊ देऊन आकर्षक फलक लेखन करून व टाळ्या वाजवून परीक्षा केंद्रावर जोरदार स्वागत करण्यात आले. असाक्षरांचा चाचणीसाठी मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून आला.

७० वर्षांच्या पुढील आजी-आजोबाही झाले नवसाक्षर

७० वर्षांच्या पुढील आजी-आजोबाही नवसाक्षर होण्याचा निश्चय करून आनंदाने परीक्षा केंद्रावर उपस्थित होते. जे असाक्षर परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा द्यायला समर्थ नव्हते, अशा असाक्षरांना स्वतःच्या घरी चाचणी देण्याची व्यवस्था करण्यात आली. या चाचणीसाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. अनेक परीक्षा केंद्रांवर असाक्षरांसाठी भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती.

मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे दोन लाखांनी परीक्षेत उपस्थिती वाढली आहे. शासन प्रशासनातील मान्यवरांचा उल्लेखनीय सहभाग, वैविध्यपूर्ण उपक्रम, राज्यस्तरावरून वेळोवेळी घेतला जाणारा आढावा या सर्व बाबींना तितकाच क्षेत्रीय यंत्रणेकडून मिळणारा प्रतिसाद व असाक्षरांचाही स्वयंस्फूर्तीने समावेश यामुळे एकूणच 'उल्लास' ही जनचळवळ बनत आहे.  -राजेश क्षीरसागर, राज्य समन्वयक, उल्लास

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEducationशिक्षणliteratureसाहित्य