शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नवरात्रीतीत नऊ दिवसांचे उपवास करताय? मग ही काळजी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 15:26 IST

उपवासादरम्यान शरीराला ऊर्जा आणि पोषण मिळावे, यासाठी सात्त्विक पदार्थांचा आहारात समावेश करावा. यामध्ये खालील पदार्थांना प्राधान्य द्या

पुणे : नवरात्रीच्या पवित्र काळात लाखो भक्त उपवास करून देवीची आराधना करतात. हा उपवास केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित नसून, वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातूनही अत्यंत फायदेशीर आहे. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने उपवास करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणत्याही आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. 

उपवासात काय खावे? सात्त्विक आहाराचे नियम

उपवासादरम्यान शरीराला ऊर्जा आणि पोषण मिळावे, यासाठी सात्त्विक पदार्थांचा आहारात समावेश करावा. यामध्ये खालील पदार्थांना प्राधान्य द्या :

सात्त्विक आहार : फळे, सुकामेवा (बदाम, मनुका), दूध, दही, मखाना आणि शिंगाड्याचे पीठ यांसारखे सात्त्विक पदार्थ खावेत. नवरात्रीत प्रामुख्याने लाल भोपळा, भेंडी या भाज्यांचा आहारात समावेश करतात. आहार सेवन करताना समान अंतराने आहार घ्यावा म्हणजे एकाच वेळी जास्त खाणे टाळावे. दोन जेवणांच्या मध्ये सुकामेवा किंवा दह्याचा समावेश करावा. ताजी फळे खावीत जेणेकरून शरीराला फायबर (तंतू) मिळून पचनास आणि पोट साफ होण्यास मदत होते. जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी लिंबाचा रस वापरू शकता.

हायड्रेशनची काळजी : शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी नारळ पाणी, लिंबू सरबत किंवा फळांचा नैसर्गिक रस प्यावा. दिवसभरात किमान ८-१० ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

आहाराचे वेळापत्रक : समान अंतराने जेवण घ्या. दोन जेवणांच्या मध्ये सुकामेवा किंवा दही घ्या. एकाच वेळी जास्त खाणे टाळा, जेणेकरून पचन बाधित होणार नाही.

चव आणि रोगप्रतिकारक : लिंबाचा रस वापरून जेवणाची चव वाढवा. हे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासही मदत करते. ताजी फळे खाऊन फायबर मिळवा, ज्यामुळे पोट साफ राहते. 

उपवासाचे वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक फायदे

आयुर्वेदानुसार, उपवासामुळे जठराग्नी जागृत होतो, जो शरीरातील विषारी द्रव्ये जाळून टाकतो. यामुळे :

शरीरातील आळस आणि जडपणा निघून जातो.

सर्व पेशींचे पुन:नवीकरण होते, ज्यामुळे शरीर शुद्ध आणि ऊर्जावान बनते.

मन आणि शरीर यांचा संबंध दृढ होतो, तणाव कमी होतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.

दीर्घकाळ उपवास केल्याने पचनसंस्था विश्रांती घेते, ज्यामुळे एकूण आरोग्य सुधारते.

नवरात्रीच्या उपवासात शरीराची काळजी घेण्यासाठी हलके आणि पौष्टिक सात्त्विक आहार घ्या, जसे की फळे, सुकामेवा, दूध आणि दही. तेल, मीठाचा अतिवापर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. जसे तळलेले पदार्थ टाळावे, त्याजागी वाफवलेले किंवा शिजवलेले पदार्थ घ्या. शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. उपवास करताना शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक मिळतील, याची खात्री करा.  - कस्तुरी भोसले (आहारातज्ज्ञ) 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड