शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

नवरात्रीतीत नऊ दिवसांचे उपवास करताय? मग ही काळजी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 15:26 IST

उपवासादरम्यान शरीराला ऊर्जा आणि पोषण मिळावे, यासाठी सात्त्विक पदार्थांचा आहारात समावेश करावा. यामध्ये खालील पदार्थांना प्राधान्य द्या

पुणे : नवरात्रीच्या पवित्र काळात लाखो भक्त उपवास करून देवीची आराधना करतात. हा उपवास केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित नसून, वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातूनही अत्यंत फायदेशीर आहे. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने उपवास करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणत्याही आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. 

उपवासात काय खावे? सात्त्विक आहाराचे नियम

उपवासादरम्यान शरीराला ऊर्जा आणि पोषण मिळावे, यासाठी सात्त्विक पदार्थांचा आहारात समावेश करावा. यामध्ये खालील पदार्थांना प्राधान्य द्या :

सात्त्विक आहार : फळे, सुकामेवा (बदाम, मनुका), दूध, दही, मखाना आणि शिंगाड्याचे पीठ यांसारखे सात्त्विक पदार्थ खावेत. नवरात्रीत प्रामुख्याने लाल भोपळा, भेंडी या भाज्यांचा आहारात समावेश करतात. आहार सेवन करताना समान अंतराने आहार घ्यावा म्हणजे एकाच वेळी जास्त खाणे टाळावे. दोन जेवणांच्या मध्ये सुकामेवा किंवा दह्याचा समावेश करावा. ताजी फळे खावीत जेणेकरून शरीराला फायबर (तंतू) मिळून पचनास आणि पोट साफ होण्यास मदत होते. जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी लिंबाचा रस वापरू शकता.

हायड्रेशनची काळजी : शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी नारळ पाणी, लिंबू सरबत किंवा फळांचा नैसर्गिक रस प्यावा. दिवसभरात किमान ८-१० ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

आहाराचे वेळापत्रक : समान अंतराने जेवण घ्या. दोन जेवणांच्या मध्ये सुकामेवा किंवा दही घ्या. एकाच वेळी जास्त खाणे टाळा, जेणेकरून पचन बाधित होणार नाही.

चव आणि रोगप्रतिकारक : लिंबाचा रस वापरून जेवणाची चव वाढवा. हे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासही मदत करते. ताजी फळे खाऊन फायबर मिळवा, ज्यामुळे पोट साफ राहते. 

उपवासाचे वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक फायदे

आयुर्वेदानुसार, उपवासामुळे जठराग्नी जागृत होतो, जो शरीरातील विषारी द्रव्ये जाळून टाकतो. यामुळे :

शरीरातील आळस आणि जडपणा निघून जातो.

सर्व पेशींचे पुन:नवीकरण होते, ज्यामुळे शरीर शुद्ध आणि ऊर्जावान बनते.

मन आणि शरीर यांचा संबंध दृढ होतो, तणाव कमी होतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.

दीर्घकाळ उपवास केल्याने पचनसंस्था विश्रांती घेते, ज्यामुळे एकूण आरोग्य सुधारते.

नवरात्रीच्या उपवासात शरीराची काळजी घेण्यासाठी हलके आणि पौष्टिक सात्त्विक आहार घ्या, जसे की फळे, सुकामेवा, दूध आणि दही. तेल, मीठाचा अतिवापर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. जसे तळलेले पदार्थ टाळावे, त्याजागी वाफवलेले किंवा शिजवलेले पदार्थ घ्या. शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. उपवास करताना शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक मिळतील, याची खात्री करा.  - कस्तुरी भोसले (आहारातज्ज्ञ) 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड