शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
2
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
3
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
4
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
5
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
6
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
7
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
8
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
9
Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
10
'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
11
IND vs SA : टीम इंडियानं घरच्या मैदानात गुडघे टेकल्यावर नेटकऱ्यांना आठवला विराट; गंभीर होतोय ट्रोल
12
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
13
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
14
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
15
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
16
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
17
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
18
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
19
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
20
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बिबट्या पाठोपाठा आता भटक्या कुत्र्यांची भीती; ९ महिन्यांत १८ हजार लोकांना घेतला चावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 11:30 IST

गेल्या नऊ महिन्यांत १८ हजार लोकांना घेतला चावा, वाढत्या संख्येवरील नियंत्रणासाठी झेडपीकडे कोणतीच यंत्रणा नाही

- दुर्गेश मोरे

पुणे : ग्रामीण भागामध्ये बिबट्याची मोठी दहशत आहे. या दहशतीत लोकांचे संघर्षमय जगणे सुरू आहे. त्यातच आता आणखी एका समस्येला लोकांना सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपासून गावागावांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाले असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यांत तब्बल १८ हजार लोकांना कुत्र्याने चावा घेतला आहे. दरम्यान, महानगरपालिका, नगरपालिका हद्दीत ज्याप्रमाणे भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रण करण्यासाठी यंत्रणा आहे, तशी यंत्रणा जिल्हा परिषदेकडे नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात भटकी कुत्री हा गंभीर प्रश्न बनत चालला आहे.

ग्रामीाण भागामध्ये बिबट्याबराेबरच आता भटक्या कुत्र्यांची समस्या लोकांना भेडसावू लागली आहे. त्यांचा उपद्रव इतका वाढला आहे की, कुत्र्याने नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री समूहाने फिरत असतात. रस्त्यावर पडलेले खाद्यपदार्थ खाण्यावरून त्यांच्यात भांडणे लागतात. रस्त्यावर गोंधळ घालणार्या या कुत्र्यांचा वाहने व पादचाऱ्यांना त्रास होतो. परिसरातील नागरिक त्यांना हाकलण्यासाठी सरसावतात. त्यामुळे कधी कधी कुत्री चवताळून नागरिकांच्या अंगावर धावून जातात व चावा घेतात. भटके श्वान झुंडीने फिरत असतात. रात्रीच्या किंवा पहाटेच्या वेळी कामावरून येणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जातात. बऱ्याचदा किशोरवयीन मुले प्राण्यांची खोड काढतात, अशा वेळी प्राणी आक्रमक होऊन चावा घेत असल्याचे आरोग्य विभागाच्या नोंदीवरून समोर आले आहे.

जिल्ह्यात जानेवारी २०२५ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये तब्बल १८ हजार १५१ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये सर्वाधिक घटना हवेली तालुक्यात घडल्या असून, आतापर्यंत तीन हजार २८७ नागरिकांना भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याची नोंद आहे. त्यापाठोपाठ दौंड दोन ४२८, शिरूर दोन हजार जणांना चावा घेतल्या नोंद आहे. भोर आणि मुळशी तालुक्यामध्ये श्वासदंशच्या घटना कमी आहे. तिथे अनुक्रमे ७०५ आणि ६६८ इतक्या घटनांची नोंद आहे. 

निर्बिजीकरणाची व्यवस्था नाही

महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील भटक्या कुत्र्यांना पकडून काही वेळा ग्रामीण भागामध्ये सोडले जाते. पूर्वी असे प्रकार मोठ्या प्रमाणात व्हायचे आता कमी झाले असले, तरी तसे प्रकार घडत आहे. त्याशिवाय ग्रामपंचायत स्तरावर निर्बिजीकरणाची कोणतीच व्यवस्था नसल्याने दिवसेंदिवस त्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. 

डॉक्टर आहे पण, व्यवस्था नाही

भटक्या कुत्र्यांची समस्या सर्वत्रच आहे. काही दिवसांपूर्वी सार्वजनिक ठिकाणांवरील भटकी कुत्री त्वरित हटवून, त्यांची नसबंदी करून त्यांना निवारागृहात हलवावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना दिले आहेत. महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रामध्ये पूर्वीपासून अशी यंत्रणा कार्यरत आहे. मात्र, ग्रामपंचायत पातळीवर पशुसंवर्धन विभाग कार्यरत असला, तरी या भटक्या कुत्र्यांना पकडण्याची यंत्रणाचा अस्तित्वात नाही. महत्त्वाचे म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पातळीवरही यासंदर्भात कोणत्याही संस्थेला आतापर्यंत काम दिले गेले नसल्याचे वास्तव समोर आले. त्यामुळे डॉक्टर असूनही त्यांना भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करता येत नाही. 

निवारा केंद्र उभारण्याचे मोठे आव्हान

श्वानदंशाच्या वाढणाऱ्या घटना पाहता ग्रामीण भागातही ग्रामपंचायत पातळीवर ठोस उपायोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी त्यांची नसबंदी हा एकमेव अधिकृत पर्याय आहे. पण, त्यासाठी कुत्रे पकडणारी संस्था नेमणे, त्यानंतर त्यांच्या शस्त्रक्रिया करणे, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नसबंदी नंतर लसीकरण करून त्यांना निवारागृहात ठेवणे, अशी एकूण प्रक्रिया राबवावी लागणार आहे. त्यातील सर्वात अवघड काम म्हणजे भटक्या कुत्र्यांसाठी निवारा केद्र उभारणे हे आहे. कारण, केवळ निवारा उपलब्ध करून देऊन चालणार नाही, तर त्यांची एक प्रकारे काळजी घेण्याचे आव्हान देखील असणार आहे. 

तालुकानिहाय श्वानदंशाच्या घटना

आंबेगाव १०१२

बारामती १२८४

भोर ७०५

दौंड २४२८

हवेली ३२८७

इंदापूर १३६४

जुन्नर १५२०

खेड १४५१

मावळ १४९३

मुळशी ६६८

पुरंदर ८२०

शिरुर २००२

एकूण १८,१५७ 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेdogकुत्रा