शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बिबट्या पाठोपाठा आता भटक्या कुत्र्यांची भीती; ९ महिन्यांत १८ हजार लोकांना घेतला चावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 11:30 IST

गेल्या नऊ महिन्यांत १८ हजार लोकांना घेतला चावा, वाढत्या संख्येवरील नियंत्रणासाठी झेडपीकडे कोणतीच यंत्रणा नाही

- दुर्गेश मोरे

पुणे : ग्रामीण भागामध्ये बिबट्याची मोठी दहशत आहे. या दहशतीत लोकांचे संघर्षमय जगणे सुरू आहे. त्यातच आता आणखी एका समस्येला लोकांना सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपासून गावागावांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाले असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यांत तब्बल १८ हजार लोकांना कुत्र्याने चावा घेतला आहे. दरम्यान, महानगरपालिका, नगरपालिका हद्दीत ज्याप्रमाणे भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रण करण्यासाठी यंत्रणा आहे, तशी यंत्रणा जिल्हा परिषदेकडे नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात भटकी कुत्री हा गंभीर प्रश्न बनत चालला आहे.

ग्रामीाण भागामध्ये बिबट्याबराेबरच आता भटक्या कुत्र्यांची समस्या लोकांना भेडसावू लागली आहे. त्यांचा उपद्रव इतका वाढला आहे की, कुत्र्याने नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री समूहाने फिरत असतात. रस्त्यावर पडलेले खाद्यपदार्थ खाण्यावरून त्यांच्यात भांडणे लागतात. रस्त्यावर गोंधळ घालणार्या या कुत्र्यांचा वाहने व पादचाऱ्यांना त्रास होतो. परिसरातील नागरिक त्यांना हाकलण्यासाठी सरसावतात. त्यामुळे कधी कधी कुत्री चवताळून नागरिकांच्या अंगावर धावून जातात व चावा घेतात. भटके श्वान झुंडीने फिरत असतात. रात्रीच्या किंवा पहाटेच्या वेळी कामावरून येणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जातात. बऱ्याचदा किशोरवयीन मुले प्राण्यांची खोड काढतात, अशा वेळी प्राणी आक्रमक होऊन चावा घेत असल्याचे आरोग्य विभागाच्या नोंदीवरून समोर आले आहे.

जिल्ह्यात जानेवारी २०२५ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये तब्बल १८ हजार १५१ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये सर्वाधिक घटना हवेली तालुक्यात घडल्या असून, आतापर्यंत तीन हजार २८७ नागरिकांना भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याची नोंद आहे. त्यापाठोपाठ दौंड दोन ४२८, शिरूर दोन हजार जणांना चावा घेतल्या नोंद आहे. भोर आणि मुळशी तालुक्यामध्ये श्वासदंशच्या घटना कमी आहे. तिथे अनुक्रमे ७०५ आणि ६६८ इतक्या घटनांची नोंद आहे. 

निर्बिजीकरणाची व्यवस्था नाही

महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील भटक्या कुत्र्यांना पकडून काही वेळा ग्रामीण भागामध्ये सोडले जाते. पूर्वी असे प्रकार मोठ्या प्रमाणात व्हायचे आता कमी झाले असले, तरी तसे प्रकार घडत आहे. त्याशिवाय ग्रामपंचायत स्तरावर निर्बिजीकरणाची कोणतीच व्यवस्था नसल्याने दिवसेंदिवस त्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. 

डॉक्टर आहे पण, व्यवस्था नाही

भटक्या कुत्र्यांची समस्या सर्वत्रच आहे. काही दिवसांपूर्वी सार्वजनिक ठिकाणांवरील भटकी कुत्री त्वरित हटवून, त्यांची नसबंदी करून त्यांना निवारागृहात हलवावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना दिले आहेत. महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रामध्ये पूर्वीपासून अशी यंत्रणा कार्यरत आहे. मात्र, ग्रामपंचायत पातळीवर पशुसंवर्धन विभाग कार्यरत असला, तरी या भटक्या कुत्र्यांना पकडण्याची यंत्रणाचा अस्तित्वात नाही. महत्त्वाचे म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पातळीवरही यासंदर्भात कोणत्याही संस्थेला आतापर्यंत काम दिले गेले नसल्याचे वास्तव समोर आले. त्यामुळे डॉक्टर असूनही त्यांना भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करता येत नाही. 

निवारा केंद्र उभारण्याचे मोठे आव्हान

श्वानदंशाच्या वाढणाऱ्या घटना पाहता ग्रामीण भागातही ग्रामपंचायत पातळीवर ठोस उपायोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी त्यांची नसबंदी हा एकमेव अधिकृत पर्याय आहे. पण, त्यासाठी कुत्रे पकडणारी संस्था नेमणे, त्यानंतर त्यांच्या शस्त्रक्रिया करणे, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नसबंदी नंतर लसीकरण करून त्यांना निवारागृहात ठेवणे, अशी एकूण प्रक्रिया राबवावी लागणार आहे. त्यातील सर्वात अवघड काम म्हणजे भटक्या कुत्र्यांसाठी निवारा केद्र उभारणे हे आहे. कारण, केवळ निवारा उपलब्ध करून देऊन चालणार नाही, तर त्यांची एक प्रकारे काळजी घेण्याचे आव्हान देखील असणार आहे. 

तालुकानिहाय श्वानदंशाच्या घटना

आंबेगाव १०१२

बारामती १२८४

भोर ७०५

दौंड २४२८

हवेली ३२८७

इंदापूर १३६४

जुन्नर १५२०

खेड १४५१

मावळ १४९३

मुळशी ६६८

पुरंदर ८२०

शिरुर २००२

एकूण १८,१५७ 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेdogकुत्रा