शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

राज्यातील न्यायालयांत प्रलंबित दाव्यांचा डोंगर; तब्बल ५७ लाख ६४ हजार १०७ दावे प्रतीक्षेत

By नम्रता फडणीस | Updated: July 18, 2025 09:31 IST

- फौजदारी दाव्यांचे प्रमाण अधिक; सरकारी वकिलांची संख्या कमी, न्यायालयीन कर्मचाऱ्यांची रिक्त पदे

पुणे : सरकारी वकिलांच्या तीन वर्षांनी होणाऱ्या बदल्या, कोर्ट पैरवी, हवालदार यांचे अपुरे मनुष्यबळ, तसेच आरोपी फरार असणे, कागदपत्रांची प्रतीक्षा, साक्षीदार फितूर होणे, आरोपींचे रेकॉर्ड उपलब्ध नसणे अशा अनेक कारणांमुळे राज्यातील जिल्हा, सत्र आणि कनिष्ठ न्यायालयांमध्ये तब्बल ५७ लाख ६४ हजार १०७ दावे प्रलंबित असून, यात ४० लाख १६ हजार १८५ फौजदारी आणि १७ लाख ५३ हजार ९२ दिवाणी दाव्यांचा समावेश आहे. पुणे जिल्हा न्यायालयांमध्ये ७ लाख ७७ हजार ५९७ दावे प्रलंबित असून, फौजदारी दाव्यांचे प्रमाण ८५ टक्के इतके आहे.

प्रलंबित दाव्यांचा निपटारा करण्यासाठी राज्यातील सर्वच न्यायालयांना सुविधा आणि साधने मिळावीत, यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिका देखील प्रलंबित आहेत. जिल्ह्यांमध्ये जलदगतीने न्यायालय सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारांकडून वारंवार केली जाते. मात्र, या घोषणा केवळ कागदावरच राहिल्या आहेत. महिला व मुलींवरील अत्याचाराच्या केसेस चालविण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन झालेली नाहीत. त्यामुळे हे दावे प्रलंबितच आहेत.

पुणे जिल्ह्यात ५ लाख ९१ हजार २६० फौजदारी दावे, तर १ लाख ८६ हजार २३७ दिवाणी दावे प्रलंबित आहेत. दरमहिना दाव्यांची संख्या वाढत आहे. पुणे जिल्ह्याच्या न्यायालयांमध्ये गेल्या महिन्यात ३४ हजार १३५ इतके दावे दाखल झाले. त्यात फौजदारी दाव्यांची संख्या ३१ हजार ९६५ इतकी असून, २१७० दिवाणी दाव्यांची संख्या आहे. यात एकूण ५७५२ इतकेच दावे निकाली काढण्यात आले आहेत. नॅशनल ज्युडिशियल डाटा ग्रीडच्या आकडेवारीमध्ये ही प्रलंबित दाव्यांची माहिती नमूद करण्यात आलेली आहे.

राज्यात फौजदारी दावे प्रलंबित असण्याची कारणे आणि प्रकरणांची संख्या

कारणे ---------------------- दाव्यांची संख्या

१) आरोपी फरार ......... ........ ...... २,२४,४७०

२) कागदपत्रांची प्रतीक्षा --------- ५१,८२८

३) काही कारणांसाठी स्थगिती -------- ५१,१९४

४) साक्षीदार -------------------- ४०९५

५) रेकॉर्ड अनुपलब्ध ------------ ३०३०

६) उच्च न्यायालयात स्थगिती --------- ८९३१

७) जिल्हा न्यायालयात स्थगिती -------- १३९३

न्यायालयात फौजदारी प्रकरणे चालविण्यासाठी समन्स, वाॅरंट पाठविण्यासाठी कोर्ट पैरवी, हवालदार यांच्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे फिर्यादी व साक्षीदार यांना न्यायालयात योग्य वेळेत हजर केले जात नाही. यामुळे या प्रकरणांचा निपटारा जलदगतीने होत नाही. याशिवाय सरकारी वकिलांची तीन वर्षांनी बदली होत असल्याने खटला योग्य वेळेत चालत नाही. या कारणांमुळे फौजदारी प्रकरणात प्रलंबित दाव्यांची संख्या वाढत आहे. - ॲड. राकेश सोनार, फौजदारी वकील

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय