शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?
2
Satara Crime: चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
3
टाटा ट्रस्टमधील वाद लवकरच संपणार? मेहली मिस्त्रींसाठी नवी ऑफर, समूहात वर्चस्व वाढणार
4
IND vs AUS: रोहित शर्मा होणार 'षटकारांचा राजा', आफ्रिदीचा विश्वविक्रम मोडण्यापासून 'इतका' दूर!
5
Satara Crime: "...तोपर्यंत पोलिसी अत्याचाराला आळा बसणार नाही"; विजय वडेट्टीवार यांचे ट्विट
6
'शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता कसा फिरतो, हेच आता बघतो...', जरांगे पाटलांचा हल्लाबोल
7
PSI सोबतची 'ती' दुसरी व्यक्ती कोण? डॉक्टरने हातावर लिहिलेल्या 'त्या' नावाची ओळख उघड
8
पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी PSI चा दबाव; विरोध केल्याने महिला डॉक्टरचा सुरु होता छळ, शेवटी...
9
रोहित शर्माला मिडिया फोटोसाठी हाक मारताच गौतम गंभीर म्हणाला, "फोटो काढून घे, सगळ्यांना..."
10
सौदी-पाकिस्तानच्या अणु करारामुळे भारताचा मित्र असणारा मुस्लिम देश संतापला! मनधरणी करायला पाकचे सेना प्रमुख रवाना
11
आशियात नव्या युद्धाची चाहूल; किम जोंगच्या सैनिकांवर दक्षिण कोरियाचा गोळीबार, कारण काय..?
12
ग्लोव्ह्ज कापून काढले, सलाईन लावताना सुई मोडली! तिलक वर्मानं केलाय 'या' जीवघेण्या आजाराचा सामना
13
Carbide Gun : दिवाळीच्या आनंदावर विरजण! ३०० जणांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत; 'कार्बाइड गन' आहे तरी काय?
14
'बिग बॉस'मध्ये प्रणित मोरेचा पुन्हा कॉमेडी शो, सदस्यांना खळखळून हसवलं; नेटकरी म्हणतात...
15
आयडियाची कल्पना! सिगारेटचं व्यसन सोडण्यासाठी लढवली शक्कल; डोकं केलं पिंजऱ्यात बंद
16
Phaltan Crime: महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करत होती? आयुष्य संपविण्यापूर्वी ती तिथे कशी पोहोचली? 
17
१ नोव्हेंबरपासून बदलणार नियम! आता बँक खात्यांसाठी तुम्हाला ठेवता येणार एकापेक्षा अधिक 'वारस'दार, जाणून घ्या
18
पाकिस्तानने 'या' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी, १६ नागरिकांच्या मृत्यूनंतर 'उशिराने शहाणपण'
19
दिल्लीत बॉम्बस्फोटाचा कट उधळला; दोन ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक
20
VIRAL VIDEO : वय केवळ आकडाच! ८२ वर्षांच्या आजीने केली भारतातील सगळ्यात उंच बंजी जम्पिंग; पाहून अंगावर येतील शहारे

राज्यातील न्यायालयांत प्रलंबित दाव्यांचा डोंगर; तब्बल ५७ लाख ६४ हजार १०७ दावे प्रतीक्षेत

By नम्रता फडणीस | Updated: July 18, 2025 09:31 IST

- फौजदारी दाव्यांचे प्रमाण अधिक; सरकारी वकिलांची संख्या कमी, न्यायालयीन कर्मचाऱ्यांची रिक्त पदे

पुणे : सरकारी वकिलांच्या तीन वर्षांनी होणाऱ्या बदल्या, कोर्ट पैरवी, हवालदार यांचे अपुरे मनुष्यबळ, तसेच आरोपी फरार असणे, कागदपत्रांची प्रतीक्षा, साक्षीदार फितूर होणे, आरोपींचे रेकॉर्ड उपलब्ध नसणे अशा अनेक कारणांमुळे राज्यातील जिल्हा, सत्र आणि कनिष्ठ न्यायालयांमध्ये तब्बल ५७ लाख ६४ हजार १०७ दावे प्रलंबित असून, यात ४० लाख १६ हजार १८५ फौजदारी आणि १७ लाख ५३ हजार ९२ दिवाणी दाव्यांचा समावेश आहे. पुणे जिल्हा न्यायालयांमध्ये ७ लाख ७७ हजार ५९७ दावे प्रलंबित असून, फौजदारी दाव्यांचे प्रमाण ८५ टक्के इतके आहे.

प्रलंबित दाव्यांचा निपटारा करण्यासाठी राज्यातील सर्वच न्यायालयांना सुविधा आणि साधने मिळावीत, यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिका देखील प्रलंबित आहेत. जिल्ह्यांमध्ये जलदगतीने न्यायालय सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारांकडून वारंवार केली जाते. मात्र, या घोषणा केवळ कागदावरच राहिल्या आहेत. महिला व मुलींवरील अत्याचाराच्या केसेस चालविण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन झालेली नाहीत. त्यामुळे हे दावे प्रलंबितच आहेत.

पुणे जिल्ह्यात ५ लाख ९१ हजार २६० फौजदारी दावे, तर १ लाख ८६ हजार २३७ दिवाणी दावे प्रलंबित आहेत. दरमहिना दाव्यांची संख्या वाढत आहे. पुणे जिल्ह्याच्या न्यायालयांमध्ये गेल्या महिन्यात ३४ हजार १३५ इतके दावे दाखल झाले. त्यात फौजदारी दाव्यांची संख्या ३१ हजार ९६५ इतकी असून, २१७० दिवाणी दाव्यांची संख्या आहे. यात एकूण ५७५२ इतकेच दावे निकाली काढण्यात आले आहेत. नॅशनल ज्युडिशियल डाटा ग्रीडच्या आकडेवारीमध्ये ही प्रलंबित दाव्यांची माहिती नमूद करण्यात आलेली आहे.

राज्यात फौजदारी दावे प्रलंबित असण्याची कारणे आणि प्रकरणांची संख्या

कारणे ---------------------- दाव्यांची संख्या

१) आरोपी फरार ......... ........ ...... २,२४,४७०

२) कागदपत्रांची प्रतीक्षा --------- ५१,८२८

३) काही कारणांसाठी स्थगिती -------- ५१,१९४

४) साक्षीदार -------------------- ४०९५

५) रेकॉर्ड अनुपलब्ध ------------ ३०३०

६) उच्च न्यायालयात स्थगिती --------- ८९३१

७) जिल्हा न्यायालयात स्थगिती -------- १३९३

न्यायालयात फौजदारी प्रकरणे चालविण्यासाठी समन्स, वाॅरंट पाठविण्यासाठी कोर्ट पैरवी, हवालदार यांच्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे फिर्यादी व साक्षीदार यांना न्यायालयात योग्य वेळेत हजर केले जात नाही. यामुळे या प्रकरणांचा निपटारा जलदगतीने होत नाही. याशिवाय सरकारी वकिलांची तीन वर्षांनी बदली होत असल्याने खटला योग्य वेळेत चालत नाही. या कारणांमुळे फौजदारी प्रकरणात प्रलंबित दाव्यांची संख्या वाढत आहे. - ॲड. राकेश सोनार, फौजदारी वकील

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय