शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
2
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
3
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
4
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
5
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
6
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
7
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
8
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
9
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
10
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
11
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
12
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
13
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
14
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
15
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
16
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
17
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
18
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
19
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
20
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासला धरणातील १००, तर कालव्याशेजारील ६० एकर जमीन अतिक्रमणमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:35 IST

- आतापर्यंत सुमारे ९० टक्के अतिक्रमण काढण्यात आले आहे. कारवाई सुरूच असून यात सुमारे १०० एकर जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली आहे  

पुणे : खडकवासला धरणाच्या परिसरातील तसेच फुरसुंगीपर्यंतच्या कालव्यातील अतिक्रमण काढण्यास जलसंपदा विभागाने सुरुवात केली असून आतापर्यंत सुमारे ९० टक्के अतिक्रमण काढण्यात आले आहे. कारवाई सुरूच असून यात सुमारे १०० एकर जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली आहे, तर कालव्यातील सुमारे ६० एकर जमिनीवरील अतिक्रमण काढण्यात आले आहे. कालव्याशेजारील काही रहिवासी अतिक्रमण मात्र अद्याप काढण्यात आलेले नसून त्यांच्या स्थलांतर आणि पुनर्वसनाबाबतच्या निर्णयानंतरच हे अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

खडकवासला धरण परिसरात वाढत्या अतिक्रमणाबाबत तक्रारी करण्यात आल्यानंतर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गंभीर दखल घेऊन ही अतिक्रमणे काढण्यात येतील. त्यासाठी ड्रोन सर्व्हे करून किती प्रमाणात आणि कोणाची अतिक्रमणे आहेत याची माहिती घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते. अतिक्रमण केलेल्या रिसॉर्ट, हॉटेलमधून होणाऱ्या प्रदूषणाबाबत करण्यात आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ड्रोन सर्व्हे करण्यात येईल, असेही सांगितले होते. त्यानुसार जलसंपदा विभागाने खडकवासला धरण परिसरात रिसॉर्ट, छोट्या-मोठ्या हॉटेल्समुळे वाढलेली अतिक्रमणे किती प्रमाणात झाली आहेत, तसेच कालव्याच्या भागातही किती आणि कशा प्रकारची अतिक्रमणे झाली यासाठी ड्रोन सर्व्हे करण्याचा निर्णय घेण्यात होता. धरणासह कालव्याचाही ड्रोन सर्व्हे करून तेथील अतिक्रमणांची छायाचित्रे काढण्यात आली. अतिक्रमणांचे मॅपिंगही करण्यात आले.

या सर्वेक्षणातून पूर्ण करून धरण परिसरात २३ अतिक्रमणे असल्याचे आढळून आले आहेत. त्यात काही ठिकाणी लॅण्डस्केपिंग, कायमस्वरूपी बांधकाम आणि तात्पुरते शेड उभारण्यात आले आहेत. ही अतिक्रमणे काढण्यासाठी जलसंपदा विभागाने सर्व संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यासह जिल्हा न्यायालयातूनही नोटिसा बजावण्यात आल्या. अनेकदा अशी कारवाई करताना अतिक्रमणधारक न्यायालयात जाऊन स्थगिती मिळवतात. त्यामुळे कारवाई बंद पडते. ही स्थिती ओढवू नये, यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या सूचनेनुसार उच्च न्यायालयातही कॅव्हेट दाखल करण्यात आले.

गेल्या तीन महिन्यांपासून ही कारवाई सुरू असून आतापर्यंत धरण परिसरातील सुमारे ९० टक्के अतिक्रमण काढण्यात आले आहे. तर कालव्याशेजारील सुमारे ८० टक्के अतिक्रमण काढण्यात आले आहे. धरण परिसरातील कारवाईत सुमारे १०० एकर जमीन मोकळी केल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच कालव्याशेजारील सुमारे ५० ते ६० एकर जमीन मोकळी करण्यात आली आहे. कालव्याशेजारील जमिनीमध्ये व्यावसायिक आणि रहिवासी अशा दोन्ही प्रकारच्या अतिक्रमणांचा समावेश आहे. त्यातील व्यावसायिक अतिक्रमणे कारवाई करून काढण्यात आली आहेत. मात्र, रहिवासी अतिक्रमणांबाबत त्यांच्या स्थलांतराचा, तसेच पुनर्वसनाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतरच रहिवासी अतिक्रमण काढण्यात येणार आहे.

जलाशय पातळीतील अतिक्रमणे ‘जैसे थे’

धरण परिसरातील पूर्ण संचय पातळीच्या (जलाशय पातळी) आत असलेली दोन ते चार ठिकाणची अतिक्रमणे अद्याप काढण्यात आलेली नाहीत. यासंदर्भातही लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून काढण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार पूर्ण संचय पातळीच्या ७५ मीटर मागे, तसेच एक मीटर उंचीत अतिक्रमण करता येत नाही. त्यामुळे ही अतिक्रमणे योग्य त्या कार्यवाहीनंतर काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Khडकवासला Dam: 160 Acres Land Recovered After Encroachment Removal

Web Summary : The Irrigation Department cleared 160 acres of encroached land near Khadakwasla Dam and canals. Residential encroachments await relocation plans. A drone survey identified 23 encroachments, prompting notices and court actions. 90% of encroachments near the dam were removed.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र