शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

निष्पापांचा बळी गेल्यावर पुणे महापालिकेला सुचले शहाणपण :उंचावरचे फ्लेक्स काढणार असल्याचे आयुक्तांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 22:16 IST

होर्डिंगचा लोखंडी सांगाडा पडून ४ जण मृत्यूमुखी पडल्याच्या घटनेचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी उमटले. अधिकारी जाहीरातदार कंपन्यांकडून हप्ते घेत असल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला.

पुणे : होर्डिंगचा लोखंडी सांगाडा पडून ४ जण मृत्यूमुखी पडल्याच्या घटनेचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी उमटले. अधिकारी जाहीरातदार कंपन्यांकडून हप्ते घेत असल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला. आयुक्त सौरव राव यांनी येत्या एक महिन्याच्या आत शहरातील ४० फूट उंचीवरचे सर्व होर्डिंग्ज काढून टाकण्याचे आश्वासन सभागृहाला दिले.

                 आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त विजय दहिभाते यांना नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देता आली नाहीत.अखेर आयुक्तांना यात मध्यस्थी करावी लागली व सदस्यांचे समाधान करावे लागले. होर्डिंग धोरणातील नियमांची अंमलबजावणी करण्याचे तसेच ४० फूट उंचीवरील लोखंडी सांगाडा असलेले सर्व होर्डिंग्ज एका महिन्यात काढून टाकण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यावर सदस्य शांत झाले. तरीही क्षेत्रीय कार्यालय व प्रभाग स्तरावरील अधिकारी जाहीरातदार कंपन्या, एजन्सी यांच्याकडून हप्ते घेत असल्याचा गंभीर आरोप केला. दुर्घटनेतील होर्डिंग काढून घेण्याबाबत रेल्वे प्रशासनाला लेखी कळवले असल्याचे समर्थन महापालिका अधिकारी करत असले तरी ७ वेळा पत्र पाठवून त्यांनी एकप्रकारे दुर्लक्षच केले आहे, त्यामुळे त्यांनाही यासाठी जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

              सभेच्या कामकाजाला महापौर मुक्ता टिळक यांनी सुरूवात करताच दिलीप बराटे यांनी जाहिरात फलकांचा विषय उपस्थित केला. प्रशासन सांगत असलेली अनधिकृत होर्डिंग्जची संख्या हास्यास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याविषयाची सर्व खरी आकडेवारी त्यांनी मागितली. काँग्रेसचे अविनाश बागवे यांनी होर्डिग धोरणाचे काय झाले असा सवाल करत याविषयाची पाळेमुळेच खणून काढली. इतका मोठा अपघात झाल्यानंतरही आकाशचिन्ह विभागाला त्याचे गांभीर्य नाही, कारवाई करायला त्यांचे मन होत नाही अशी टीका त्यांनी केली. शहरात किमान अडीच लाख तरी होर्डिग्ज उभी असावीत असे त्यांनी सांगितले.

             महापालिकेने तयार केलेल्या होर्डिंग धोरणाला प्रशासनाने जाणीवपुर्वक विलंब लावला. त्यातील नियमांचे सोयिस्कर अर्थ लावले असा आरोप सुभाष जगताप यांनी केला. सन २००३ मध्ये हे धोरण तयार केले त्यात आपण स्वत: होतो.  त्यात प्रशासनाने सोयीचे तेवढे घेतले गेले व गैरसोयीचे वेगळा अर्थ लावत लांबवले गेले असे जगताप म्हणाले. जाहीरात फलकाचा दर प्रशासनाने तत्कालीन स्थायी समिती व सर्वसाधारण सभा यांची मान्यता न घेताच ठरवला, त्याची अंमलबजावणीही सुरू केली. न्यायालायने आक्षेप घेतल्यानंतर त्याला अलीकडेच मान्यता घेण्यात आली असे त्यांनी निदर्शनास आणले. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी सरकारच्याच आदेशाने काही कंपन्यांना तत्कालीन आयुक्त व अधिकाºयांनी अभय दिले असा आरोप केला. शिवसेनेच्या संजय भोसले यांनी कारवाई कधी करणार ते सांगा असा सवाल केला.विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी प्रशासनाने या गोष्टींचा खुलासा करावा, अशी मागणी करत प्रशासनावरील आक्षेपांची जंत्रीच सादर केली. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले म्हणाले, नियमात चुकला तो कोणीही असो त्याला दंड करा असेच सांगत आलो आहोत. नगरसेवकांना किंवा सत्ताधाºयांनाही कारवाई करा असे सांगण्याची वेळच आली नाही पाहिजे.

            आयुक्तांनी खुलासा करताना सदस्यांच्या भावनांची दखल घेत याबाबत झालेल्या सर्व चुकांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. सर्वप्रथम ४० फूटांपेक्षा जास्त उंच असलेले सर्व फलक एक महिन्यात काढून टाकण्याची कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले. खासगी जागेतील फलकांनाही धोरणातील सर्व नियम लागू केले जातील. ज्या जाहीरात संस्थेला अभय दिले त्याची चौकशी करू, खटले किती आहे, नोटीसा किती दिल्या आहेत, परवानग्या किती याची सखोल माहिती घेऊ असे त्यांनी सांगितले. याविषयारील चर्चेत सत्ताधारी अजय खेडेकर, गोपाळ चिंतल, हरिदास चरवड यांनी तसेच विरोधकांमधील नाना भानगिरे, योगेश ससाणे, प्रिया गदादे, बाळा ओसवाल, सुनिल टिंगरे यांनी सहभाग घेतला.

एका जाहीरात कंपनीला सरकारमधूनच अभय मिळाले. मंत्री पंकजा मुंडे यांचा आशिर्वाद असलेली ही कंपनी आहे. तत्कालीन आयुक्तांच्या आदेशानेच त्यांच्याबरोबरच्या कराराचे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असूनही नुतनीकरण करण्यात आले. याची चौकशी करावी व दोषी अधिकाºयांवरही गुन्हा दाखल करण्याची कारवाई करावी.

-अरविंद शिंदे,कॉँग्रेस गटनेते

  • जाहीरात करणाºया कंपन्या व प्रशासनातील काही अधिकारी यांची हातमिळवणी आहे. रेल्वेला नोटीस दिली त्यात एक वाक्य, तुम्ही होर्डिग काढले नाही तर ते आम्ही काढू असे आहे. मग महापालिकेने कारवाई का केली नाही. ती झाली असती तर चारजणांचा जीव हकनाक गेला नसता. संबधित अधिकाºयांनाही यात जबाबदार धरावे.

-सुभाष जगताप, नगरसेवक

  • प्रशासन खोटे बोलत आहे. चार जणांना प्राण गमवावे लागले त्याचे यांना अजूनही काहीच वाटत नाही. त्यानंतर तरी प्रशासनाने शहरातील सर्व अनधिकृत होर्डिग्ज काढून टाकायला हवी होती. मात्र अशी कारवाई झालेली नाही. चुकीची आकडेवारी देत दिशाभूल केली जात आहे.

-अविनाश बागवे,नगरसेवक

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाAccidentअपघात