शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

निष्पापांचा बळी गेल्यावर पुणे महापालिकेला सुचले शहाणपण :उंचावरचे फ्लेक्स काढणार असल्याचे आयुक्तांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 22:16 IST

होर्डिंगचा लोखंडी सांगाडा पडून ४ जण मृत्यूमुखी पडल्याच्या घटनेचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी उमटले. अधिकारी जाहीरातदार कंपन्यांकडून हप्ते घेत असल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला.

पुणे : होर्डिंगचा लोखंडी सांगाडा पडून ४ जण मृत्यूमुखी पडल्याच्या घटनेचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी उमटले. अधिकारी जाहीरातदार कंपन्यांकडून हप्ते घेत असल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला. आयुक्त सौरव राव यांनी येत्या एक महिन्याच्या आत शहरातील ४० फूट उंचीवरचे सर्व होर्डिंग्ज काढून टाकण्याचे आश्वासन सभागृहाला दिले.

                 आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त विजय दहिभाते यांना नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देता आली नाहीत.अखेर आयुक्तांना यात मध्यस्थी करावी लागली व सदस्यांचे समाधान करावे लागले. होर्डिंग धोरणातील नियमांची अंमलबजावणी करण्याचे तसेच ४० फूट उंचीवरील लोखंडी सांगाडा असलेले सर्व होर्डिंग्ज एका महिन्यात काढून टाकण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यावर सदस्य शांत झाले. तरीही क्षेत्रीय कार्यालय व प्रभाग स्तरावरील अधिकारी जाहीरातदार कंपन्या, एजन्सी यांच्याकडून हप्ते घेत असल्याचा गंभीर आरोप केला. दुर्घटनेतील होर्डिंग काढून घेण्याबाबत रेल्वे प्रशासनाला लेखी कळवले असल्याचे समर्थन महापालिका अधिकारी करत असले तरी ७ वेळा पत्र पाठवून त्यांनी एकप्रकारे दुर्लक्षच केले आहे, त्यामुळे त्यांनाही यासाठी जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

              सभेच्या कामकाजाला महापौर मुक्ता टिळक यांनी सुरूवात करताच दिलीप बराटे यांनी जाहिरात फलकांचा विषय उपस्थित केला. प्रशासन सांगत असलेली अनधिकृत होर्डिंग्जची संख्या हास्यास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याविषयाची सर्व खरी आकडेवारी त्यांनी मागितली. काँग्रेसचे अविनाश बागवे यांनी होर्डिग धोरणाचे काय झाले असा सवाल करत याविषयाची पाळेमुळेच खणून काढली. इतका मोठा अपघात झाल्यानंतरही आकाशचिन्ह विभागाला त्याचे गांभीर्य नाही, कारवाई करायला त्यांचे मन होत नाही अशी टीका त्यांनी केली. शहरात किमान अडीच लाख तरी होर्डिग्ज उभी असावीत असे त्यांनी सांगितले.

             महापालिकेने तयार केलेल्या होर्डिंग धोरणाला प्रशासनाने जाणीवपुर्वक विलंब लावला. त्यातील नियमांचे सोयिस्कर अर्थ लावले असा आरोप सुभाष जगताप यांनी केला. सन २००३ मध्ये हे धोरण तयार केले त्यात आपण स्वत: होतो.  त्यात प्रशासनाने सोयीचे तेवढे घेतले गेले व गैरसोयीचे वेगळा अर्थ लावत लांबवले गेले असे जगताप म्हणाले. जाहीरात फलकाचा दर प्रशासनाने तत्कालीन स्थायी समिती व सर्वसाधारण सभा यांची मान्यता न घेताच ठरवला, त्याची अंमलबजावणीही सुरू केली. न्यायालायने आक्षेप घेतल्यानंतर त्याला अलीकडेच मान्यता घेण्यात आली असे त्यांनी निदर्शनास आणले. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी सरकारच्याच आदेशाने काही कंपन्यांना तत्कालीन आयुक्त व अधिकाºयांनी अभय दिले असा आरोप केला. शिवसेनेच्या संजय भोसले यांनी कारवाई कधी करणार ते सांगा असा सवाल केला.विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी प्रशासनाने या गोष्टींचा खुलासा करावा, अशी मागणी करत प्रशासनावरील आक्षेपांची जंत्रीच सादर केली. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले म्हणाले, नियमात चुकला तो कोणीही असो त्याला दंड करा असेच सांगत आलो आहोत. नगरसेवकांना किंवा सत्ताधाºयांनाही कारवाई करा असे सांगण्याची वेळच आली नाही पाहिजे.

            आयुक्तांनी खुलासा करताना सदस्यांच्या भावनांची दखल घेत याबाबत झालेल्या सर्व चुकांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. सर्वप्रथम ४० फूटांपेक्षा जास्त उंच असलेले सर्व फलक एक महिन्यात काढून टाकण्याची कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले. खासगी जागेतील फलकांनाही धोरणातील सर्व नियम लागू केले जातील. ज्या जाहीरात संस्थेला अभय दिले त्याची चौकशी करू, खटले किती आहे, नोटीसा किती दिल्या आहेत, परवानग्या किती याची सखोल माहिती घेऊ असे त्यांनी सांगितले. याविषयारील चर्चेत सत्ताधारी अजय खेडेकर, गोपाळ चिंतल, हरिदास चरवड यांनी तसेच विरोधकांमधील नाना भानगिरे, योगेश ससाणे, प्रिया गदादे, बाळा ओसवाल, सुनिल टिंगरे यांनी सहभाग घेतला.

एका जाहीरात कंपनीला सरकारमधूनच अभय मिळाले. मंत्री पंकजा मुंडे यांचा आशिर्वाद असलेली ही कंपनी आहे. तत्कालीन आयुक्तांच्या आदेशानेच त्यांच्याबरोबरच्या कराराचे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असूनही नुतनीकरण करण्यात आले. याची चौकशी करावी व दोषी अधिकाºयांवरही गुन्हा दाखल करण्याची कारवाई करावी.

-अरविंद शिंदे,कॉँग्रेस गटनेते

  • जाहीरात करणाºया कंपन्या व प्रशासनातील काही अधिकारी यांची हातमिळवणी आहे. रेल्वेला नोटीस दिली त्यात एक वाक्य, तुम्ही होर्डिग काढले नाही तर ते आम्ही काढू असे आहे. मग महापालिकेने कारवाई का केली नाही. ती झाली असती तर चारजणांचा जीव हकनाक गेला नसता. संबधित अधिकाºयांनाही यात जबाबदार धरावे.

-सुभाष जगताप, नगरसेवक

  • प्रशासन खोटे बोलत आहे. चार जणांना प्राण गमवावे लागले त्याचे यांना अजूनही काहीच वाटत नाही. त्यानंतर तरी प्रशासनाने शहरातील सर्व अनधिकृत होर्डिग्ज काढून टाकायला हवी होती. मात्र अशी कारवाई झालेली नाही. चुकीची आकडेवारी देत दिशाभूल केली जात आहे.

-अविनाश बागवे,नगरसेवक

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाAccidentअपघात