शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Pune: महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ॲक्शन मोडवर; दोषींवर लवकरच कारवाई, ३ जणांची समिती नेमली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 12:37 IST

पुणे महापालिकेेने तीन जणांची समिती नेमली असून सात दिवसांमध्ये अहवाल सादर झाल्यानंतर दाेषींवर कारवाई केली जाणार

पुणे: खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी साेडल्याने सिंहगड रस्तावरील एकतानगर यासह पुलाची वाडी भागात पाणी शिरले, तसेच नदीकाठी राडारोडा टाकून भराव केल्याने आणि नदी सुधार प्रकल्पामुळे पुराचे पाणी घरात शिरून नागरिकांचे माेठे नुकसान झाले. याची दखल घेत पुराची कारणमीमांसा करण्यासाठी पुणे महापालिकेेने तीन जणांची समिती नेमली आहे. यात पालिकेच्या बांधकाम, ड्रेनेज व पथ विभागाचे अधिकारी आणि पाटबंधारे खात्याच्या एका अधिकारी निमंत्रित सदस्य असणार आहे. या समितीने सात दिवसांमध्ये अहवाल सादर करायचा आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.

खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर एकतानगर भागात पाण्याचा फुगवटा निर्माण झाला. सिंहगड रस्त्यावरून येणाऱ्या नाल्याचे पाणीही वस्तीमध्ये घुसले. त्यामुळे एकतानगर व परिसरातील अन्य कॉलनीमधील पुराचा धोका कमी करण्यासाठी साेमवारपासून राडारोडा काढण्याचे काम सुरू केले आहे. राजाराम पूल ते शिवणे यादरम्यान मुठा नदीपात्रात खासगी जागा मालकांनी हजारो ट्रक राडारोडा टाकून पात्र बुजविले हाेते. त्या जागेचा व्यावसायिक वापर करण्याचा हेतू होता. यामध्ये प्रामुख्याने राजाराम पूल ते वारजे पूल यादरम्यान जास्त राडारोडा टाकण्यात आला आहे, त्यातून अनेक एकर जमीन निर्माण केली आहे. त्याकडे महापालिका प्रशासनाने सोयिस्कर डोळेझाक केल्याचा आरोप केला जात आहे.

दाेषींवर हाेणार कारवाई 

या पार्श्वभूमीवर नदीकाठी राडाराेडा टाकून भराव केल्याने आणि नदी सुधार प्रकल्पामुळे पुराचे पाणी घरात शिरल्याचे कारण दिले जात आहे. त्यामुळे या पुराची कारणमीमांसा करणे गरजेचे आहे. त्यासाठी पुणे महापालिकेेने तीन जणांची समिती नेमली आहे. सात दिवसांमध्ये अहवाल सादर झाल्यानंतर दाेषींवर कारवाई केली जाणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तfloodपूरRainपाऊसWaterपाणीDamधरण