शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

पुण्यात नदी संवर्धनासाठी १११ दिवसांचे साखळी उपोषण पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 21:05 IST

गंगा नदी प्रदूषणमुक्त करावी या मागणीसाठी १११ दिवस पर्यावरणतज्ज्ञ प्रा. जी. डी. अग्रवाल यांनी उपोषण केले होते. या उपोषणातच अग्रवाल यांचा मृत्यू झाला.

पुणे : गंगा नदीप्रदूषणमुक्त करावी आणि तिथे कोणतेही हानीकारक प्रकल्प होऊ नये या मागणीसाठी १११ दिवस पर्यावरणतज्ज्ञ प्रा. जी. डी. अग्रवाल यांनी उपोषण केले होते. या उपोषणातच अग्रवाल यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे हे बलिदान व्यर्थ न जाऊ देता ही साखळी सुरू ठेवण्यासाठी पुण्यातील पर्यावरणप्रेमींनी साखळी उपोषण सुरू केले. त्याला आज (दि.५) १११ दिवस झाले आहेत. त्यामुळे आज देखील सर्व १११ जणांनी दिवसभराचे उपोषण केले. 

                 प्रा. जी. डी. अग्रवाल (स्वामी सानंद) यांना श्रध्दांजली म्हणून पुण्यातील पर्यावरणप्रेमींनी हे साखळी उपोषण सुरू केले. हे उपोषण चार-पाच दिवस चालेल आणि बंद होईल, असे वाटले होते. परंतु, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि मार्च महिन्यापर्यंत नागरिकांनी उपोषणासाठी नोंदणी केलेली आहे. दररोज एक जण जिथे आहे तिथे उपोषण करीत आहेत. यामध्ये राज्यातील अनेक ठिकाणचे नागरिक सहभागी झाले आहेत. तसेच शाळेतील विद्यार्थीही सहभाग घेत आहेत, अशी माहिती निरंजन उपासनी यांनी दिली. त्यांनीच या उपोषणाच संकल्पना सुरू केली. 

                  याविषयी उपासनी म्हणाले, अग्रवाल यांनी उपोषण केले. परंतु, त्याची माहिती आम्हाला नव्हती. ते गेल्यानंतर अनेकांना समजले की ते नदीसाठी लढत होते. त्यामुळे आम्हाला ते खूप मनाला लागले. तेव्हा मी नदीसाठी एक दिवस उपोषण करण्याचे ठरविले. त्यानंतर माझे मित्र आणि इतर सहकारी सहभागी झाले आहेत. नदी ही शहराची जीवनवाहिनी असते. परंतु, आपल्या पुण्यातील मुठा अत्यंत  वाईट अवस्थेत आहे. तिची अवस्था पाहून मनाला खूप वाईट वाटते. ती स्वच्छ करण्यासाठी लोकचळवळ हवी. त्याशिवाय ती स्वच्छ होणार नाही.’’ वन्यजीव संशोधक धर्मराज पाटील म्हणाले, मुठा नदीपात्रात प्रचंड घाण आहे. त्यामुळे येथे शेकाट्या हे पक्षी पाहायला मिळतात. ते गटारातच दिसतात. नागरिक नदीत कचरा टाकत आहेत. तसेच सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे मुठा प्रदूषित होत आहे. त्यासाठी नागरिकांनीच पुढे येऊन पुढाकार घेतला पाहिजे.’’ 

टॅग्स :Waterपाणीmula muthaमुळा मुठाriverनदीenvironmentवातावरणpollutionप्रदूषण