शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

Pune: नागरिक वैतागले! कराच्या थकबाकीसाठी पुण्यातील थेट ३२ गावं विकायला काढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 15:03 IST

महापालिकेत समायोजन झाल्यावर रस्ते, ड्रेनेज, लाईट या प्राथमिक सोयी सुविधा तातडीने उपलब्ध होईल अशी अपेक्षा नागरिकांना होती

शिवणे : पुणे शहराच्या आसपास असलेल्या ३२ गावांची ग्रामपंचायत रद्द करून त्यांचा समावेश महापालिका कार्यक्षेत्रात केला गेला, त्याला आता चार वर्षे होत आली आहेत. महापालिकेत समायोजन झाल्यावर रस्ते, ड्रेनेज, लाईट या प्राथमिक सोयी सुविधा तातडीने उपलब्ध होईल अशी अपेक्षा नागरिकांना होती; मात्र ती अपेक्षा फोल ठरली. शिवाय मिळकत कर प्रचंड लादला गेला आहे, इतका मोठा कर भरण्यास नागरिकांनी विरोध केला; मात्र महापालिकेकडून करामध्ये सवलत दिली जात नाही त्यामुळे कराच्या थकबाकीसाठी अख्खे गाव विकणे आहे असा फलकच ग्रामस्थांनी गावागावांत लावत प्रशासनाचा निषेेध केला आहे.

धरण उशाला असून देखील येथील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही, टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याने एकेका सोसायटीला लाखो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. अरुंद रस्ते आणि त्याभोवती वाढलेली अतिक्रमणे यामुळे वाहतूक कोंडी नित्याची झालेली आहे. करोडो रुपयांचा कर या गावांतून गोळा होत असताना देखील सुविधांच्या बाबतीत सदर गावांना सावत्रपणाची वागणूक दिली जात असल्याची नागरिकांची भावना झालेली आहे. प्रशासनाच्या वतीने कोणत्याही सुविधा मिळत नाहीत; परंतु टॅक्स मात्र भरमसाठ आकारला जात आहे. लाखो रुपयांचा मिळकत कर भरावा लागत असल्यामुळे या गावांमधील नागरिक त्रस्त झालेले आहेत. मिळकत कर न भरल्यास मिळकतींवर जप्तीचे प्रकार होत आहेत.

मागील काही वर्षांत टॅक्स एवढा भरमसाठ वाढलेला आहे की, सगळे घरदार विकले तरी टॅक्स भरू शकत नाही अशी धारणा समाविष्ट गावांतील नागरिकांची झाली आहे. त्यामुळे या ३२ गावांतील नागरिकांनी ‘गाव विकणे आहे' अशा आशयाचे फलक लावून निषेध आंदोलन सुरू केलेले आहे. गाव विकणे आहे अशा मजकुराचे फलक सर्व गावागावांत झळकत असल्याने हे बॅनर नागरिकांचे लक्ष वेधत आहेत. महापालिकेचा जुलमी कर भरू शकत नसल्याने आमचे गावच महापालिकेने विकत घ्यावे व आमचा टॅक्स भरून घ्यावा अशा तीव्र भावना या गावातील नागरिकांच्या दिसत आहेत.

आचारसंहिता लागू होण्याआधी निर्णय घ्या

आगामी विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शासनाने समाविष्ट केलेल्या ३२ गावांचा टॅक्स कमी करून ग्रामपंचायतीच्या धर्तीवर आकारावा अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल तसेच जोपर्यंत टॅक्स कमी होत नाही व नव्याने सुधारित दर लागू होत नाही तोपर्यंत मतदान न करण्याचा निर्णय ३२ गावांतील नागरिकांनी घेतलेला आहे. गाव विकणे आहे अशा आशयाचे फलक धायरी, नऱ्हे, आंबेगाव, किटकटवाडी, खडकवासला, नांदोशी, नांदेड, उत्तमनगर, शिवणे, कोंढवे, कोपरे या भागात लावण्यात आलेले असून या मागील नागरिकांच्या तीव्र भावना स्पष्ट जाणवत आहेत. सोमवारी पत्रकार परिषद घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचे यावेळी ३२ गाव कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेShivaneशिवणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाgram panchayatग्राम पंचायतMONEYपैसाTaxकरSocialसामाजिक