पुणे : सायंकाळचे पाच वाजले की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह आमचीही पावलं चहाच्या टपरीकडे वळतात. नेहमीप्रमाणे काही विद्यार्थ्यांसह मी शनिवारी सायंकाळी चहाच्या टपरीवर गेलाे हाेताे. काही मुले नंतर आली.
सर्वांचे बिल देऊन मी तेथून निघालाे हाेताे, काही सेकंदांच्या आत भरधाव कारने चहाच्या टपरीसमाेरील मुलांना उडवले. त्यांच्या किंकाळण्याचा आवाज कानी पडला अन् मी धावतच घटनास्थळी गेलाे आणि जखमींना तत्काळ रुग्णालयात आणण्यासाठी मदत केली. साधारण स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी सात ते आठ मुलं-मुली आणि इतर तीन ते चारजण असे एकूण १० ते १२ लाेक जखमी झाले. यांतील दाेन मुले आणि तीन मुली गंभीर जखमी आहेत, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी नितीन ढेकळे यांनी दिली.
थाेडा रिलिफ म्हणून चहा घेण्याच्या निमित्ताने टपरीवर जमलेल्या या विद्यार्थ्यांच्या वाटेत भरधाव कारने बाधा आणली आणि अनेकांना जखमी केले. मद्यपी कारचालकाची मजा, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र कायमची सजा हाेऊन बसली आहे, याचे फार दु:ख वाटत आहे, असे नितीन म्हणाले.