शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

औरंगजेबाशी तुलना बरोबरच, माफी मागणार नाही; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितले

By राजू इनामदार | Updated: March 22, 2025 16:18 IST

देशद्रोहाचा गुन्हा लावण्याची धमकी दिली तरीही विधान मागे घेणार नाही असेही त्यांनी सांगितले.

पुणे: ‘‘ते सांगतात औरंगजेब क्रुर होता, यांच्या राजवटीत संतोष देशमुख यांच्या हत्या झाली, स्वारगेटमध्ये बलात्कार झाला, मग यांच्या राजवटीची तुलना त्याच्या राजवटीबरोबर केली यात चूक काय आहे? असा सवाल करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपण आपल्या विधानाशी ठाम आहोत, माफी मागणार नाही, असे सांगितले. देशद्रोहाचा गुन्हा लावण्याची धमकी दिली तरीही विधान मागे घेणार नाही असेही त्यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यावर प्रथमच पुण्यात काँग्रेसभवनमध्ये आलेल्या सपकाळ यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी लक्ष्य केले. ते म्हणाले, “शिवत्रपती किंवा कोणत्याही थोर व्यक्तीवर टीका करा व परदेशात पळून जा, इथे असाल तर पोलिस संरक्षण घ्या अशी योजना फडणवीस सरकारने सुरू केली आहे. कोरटकर अशीच टीका करून कलकत्तामार्गे दुबईला गेला. पोलिस काय करत होते? फडणवीस यांनीच पोलिसांना कोरटकरला मदत करण्यास सांगितले. सोलापूरकरने टीका केली तर त्याला पोलिस संरक्षण मिळाले. हे काय प्रकार आहेत? राज्याला गृहमंत्री आहे की नाही? गृहविभागाचे काम कोणी घाशीराम कोतवाल पाहतो का? राज्यातील जनतेला फडणवीस यांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.”

एक उपमुख्यमंत्री मला म्हणाले, माफी मागा, नाहीतर तुमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा लावतो. दुसरे उपमुख्यमंत्री म्हणाले, पोलिस याची चौकशी करतील. मी केले तरी काय? औरंगजेब क्रुर होता तुम्हीच म्हणता आहात तर तुमच्या सरकारमध्ये त्याच्यासारखाच क्रुर कारभार सुरू आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. बेरोजगारीने युवक वर्ग हैराण झाला आहे. आम्ही हे सगळे प्रश्न सरकारला विचारतो आहोत, तर सरकारचे दुसरेच काही सुरू आहे. लाडक्या बहिणींना निवडणुकीआधी सरसकट पैसे वाटले. आता अपात्र म्हणून अनेक बहिणींना योजनेतून बाहेर काढले जात आहे. मग आधी वाटप केलेले पैसे संबधित अधिकाऱ्यांकडून वसूल करणार आहात का? काही कोटी रूपयांची गोष्ट आहे. यांचा सगळा कारभार हा असा असल्याची टीका सपकाळ यांनी केली.

संघटनात्मक स्तरावर काँग्रेस पक्ष क्षीण झाला आहे हे सपकाळ यांनी मान्य केले, मात्र आता आम्ही संघटना बांधत आहोत. एक विचाराने एकत्र येत आहोत. ही बांधणी विचारधारेवर आधारित असेल. आमचा लढाही फक्त राजकीय लढा नसेल तर विचारधारेवर आधारितच असेल. लोक पक्षातून जातात हेही खरे आहे, धंगेकर का गेले हे त्यांनीच सांगितले. सत्ता सत्ता आणि सत्ता हेच काहीजणांना हवे असते. आम्ही तीन वेळा उमेदवारी दिली तरीही ते गेले. आता असे होऊ नये याची काळजी आम्ही घेऊ असे त्यांनी सांगितले.

पुण्यासारखे सांस्कृतिक शहर अमली पदार्थांच्या विळख्यात सापडले आहे. गुजरातमधील कांडला बंदरात हे सगळे नशेचे पदार्थ येतात. कांडला व पुणे असे काही कनेक्शन आहे हे तपासण्याची मागणी आम्ही पोलिसांकडे करतो आहोत असे सपकाळ यांनी सांगितले. पुण्यामध्ये नको ते प्रकार व्हावेत हेही पोलिसांचे अपयश असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcongressकाँग्रेसBJPभाजपाAurangzeb Tombऔरंगजेबाची कबर