शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पुनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

भातशेतीला हवामानबदलाचा फटका, यंदाचे वर्ष निघणार कसे? शेतकऱ्यांना पडला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 1:25 AM

भातशेतीचे आगार समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भातशेती यंदा पावसाअभावी वाया गेली आहे. गेल्या काही वर्षांपासून भातशेतीला बदलत्या निसर्गचक्राचा फटका बसत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

डिंभे - भातशेतीचे आगार समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भातशेती यंदा पावसाअभावी वाया गेली आहे. गेल्या काही वर्षांपासून भातशेतीला बदलत्या निसर्गचक्राचा फटका बसत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सध्या सर्वत्र काढणीच्या कामांची लगबग सुरू असल्याचे पाहावयास मिळत असले तरी शेतकऱ्यांच्या हाती केवळ पळंज आणि पेंढाच लागत आहे. मागील वर्षी भातशेतीतून बऱ्यापैकी उत्पादन शेतक-यांच्या हाती लागले होते. मात्र, यंदा वेळेआधीच पावसाने काढता पाय घेतल्याने जिल्ह्यातील हजारो लोकसंख्येच्या जीवनाचा मुख्य आधार समजली जाणारी भातशेती वाया गेली आहे. यामुळे भातउत्पादक हवालदिल झाले असून, यंदाचे वर्षे कसे जाणार याची चिंता लागली आहे.सह्याद्रीच्या पर्वतरांगात राहणा-या विशेष करून आदिवासी जनतेच्या जीवनाचा भातशेती ही मुख्य आधार मानली जाते. जिल्ह्यात जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व भोर हे तालुके प्रामुख्याने भातशेतीचे आगार म्हणून ओळखले जातात. या तालुक्यात दरवर्षी हजारो हेक्टर क्षेत्रावर भातशेतीचे उत्पादन घेतले जाते. भातशेतीच या भागातील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. मिळणाºया एकूण उत्पादनापैकी आवश्यक तेवढे उत्पादन पदरी ठेवून तांदळाच्या विक्रीतून शेतकरी आपल्या इतर गरजा भागवीत असल्याचे पाहावयास मिळते. विशेष करून आदिवासी शेतक-याच्या जीवनाचा भातशेती मुख्य आधार मानला जातो.इंद्रायणी, रायभोग, जिर, आंबेमोहर, कोलम, कोळंबा या पारंपरिक जातीचे भातउत्पादन या भागात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून भातशेतीसाठी पूरक हवामान व पाऊस राहिल्याने भातशेतीला यंदा तोड नव्हती. भात पेरण्यांसाठी काही ठिकाणी पावसाची वाट पाहावी लागली हे जरी खरे असले तरी काही शेतक-यांनी धूळवाफेवर पेरण्या उरकल्या होत्या.मात्र, यंदा पावसाने चांगली साथ दिल्याने झालेल्या सर्व पेरण्या कारणी लागल्या होत्या. लागवडीसाठी यंदा कोठेही पावसाची वाट पाहावी लागल्याचे चित्र पाहावयास मिळत नव्हते. उलटपक्षी भातलागवडी वेळेत उरकल्याने शेतकरीवर्गामध्ये आनंदी वातावरण असल्याचे पाहावयास मिळत होते.मात्र, ऐन भातशेती जोम धरण्याच्या काळाच पुणे जिल्ह्यातून पावसाने काढता पाय घेतला. एकदा गेलेल्या पावसाने पुन्हा तोंड दाखविलेच नाही. आज पडेल उद्या पडेल या आशेवर शेतक-यांचे डोळे आकाशाकडे लागेल होते.मात्र, महिना दीड महिना उलटून गेला तरी पावसाची चिन्हे दिसेनात. अखेर नवरात्रीत तरी पाऊस हजेरी लावीन नाहीतर दसºयाला तरी हमखास पडेन, या आशेवर असणाऱ्या  शेतकऱ्यांची बाकी निराशा झाली. सध्या सर्वत्र भातकाढणीचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकरी खाचरात असेल ते भात कापून झोडणी करतआहेत. मात्र, भात भाजलेच नसल्याने शेतकऱ्यांच्या हाती केवळ पळंज आणि पेंढाच लागत आहे.‘‘सध्या भातकाढणी सुरू आहे. पण भात भाजलेच नाही. खाचरात केवळ गवत (पेंढा) कापण्याची वेळ आली आहे. गवत झोडून हाती पळंज पडत आहे. पेंढा जनावरांसाठी साठवतोय; पण वर्षे कसे काठावर काढायचे याची चिंता आतापासूनच लागली आहे. हातावर पोट असणाºया आम्हा शेतकºयांनी यंदा काय खायचे?- रामा आंबेकर,आदिवासी शेतकरी,पोखरी (ता. आंबेगाव)‘‘जुन ते सप्टेंबरअखेर तालुक्यात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे आंबेगाव तालुका दुष्काळसदृश तालुका यादीमध्ये घेण्यासाठी सध्या महसूल व कृषी विभागामार्फत सत्यमापन परिस्थितीचा सर्व्हे करण्याचे काम सुरू झाले आहे. हा अहवाल लवकरच शासनाला सादर केला जाणार आहे. पावसाअभावी भातपीक धोक्यात येत असले तरी परतीच्या पावसामुळे थोड्याफार प्रमाणात उत्पादन शेतकºयांच्या हाती पडण्याची अपेक्षा आहे. मात्र सरासरी उत्पादनात घट होणार आहे.- संजय विश्वासराव, तालुका कृषी अधिकारी आंबेगाव तालुकायंदाचा भात हंगाम वाया गेलेल्या शेतकºयांना आता उदरनिर्वाहाची चिंता लागली आहे. यंदाचे वर्षे कसे जाणार अशी हळहळ शेतकरीवर्ग करत आहे. काही शेतकºयांनी भातकापणीच्या कामांना अजून सुरुवात केली नाही. खाचरात भात वाळून गेल्याने त्याला दाणेच आले नाहीत. केवळ मात्र केवळ खाचराच्या बांधावर बसून हळहळ व्यक्त करण्यापलीकडे शेतकºयांच्या हातात आता काहीच राहिले नाही.तर केवळ हातावर पोट असणाºया शेतकºयांना भातशेतीचा आधार असायचा. मात्र तेच उत्पादन यंदा हातचे गेल्याने हळहळ व्यक्त करण्यापलीकडे शेतकºयांच्या हातात यंदा काहीच राहिले नाही. उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असणाºया भातशेतीलाच यंदा निसर्गचक्राच्या लहरीपणाचा फटका बसला असून, यंदाचा भातहंगाम हातचा गेल्याने शेतकरीवर्ग पुरता उद्ध्वस्त झाल्याचे चित्र पाहावयासमिळत आहे.

टॅग्स :Puneपुणेagricultureशेती