शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

पुणे : जिल्ह्यात रोज ११ अपघात; ४ मृत्यू, मागील वर्षभरात ४ हजार अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 6:29 AM

मागील वर्षभरात दररोज सरासरी अकरा अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. मागील वर्षात जिल्ह्यात सुमारे चार हजार अपघात झाले असून...

पुणे : जिल्ह्यात मागील वर्षभरात दररोज सरासरी अकरा अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. मागील वर्षात जिल्ह्यात सुमारे चार हजार अपघात झाले असून त्यात १३९८ जणांचा बळी गेला आहे. २०१६ या वर्षाच्या तुलनेत अपघातांमध्ये काहीशी वाढ झाली असली तरी मृतांचा आकडा किंचित घटल्याचे दिसते.प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मागील तीन वर्षांची अपघातांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीवरून तीन वर्षांत अपघातांमध्ये सातत्य असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. मात्र, मृतांचा आकडा कमी झाल्याचे सकारात्मक चित्रही आहे. २०१५ मध्ये पुणे शहर व ग्रामीण भागात अनुक्रमे १४४३ आणि २६३५ असे एकूण ४०७८ एवढे अपघात झाले होते. त्यामध्ये १५४३ जणांना आपले प्राण गमवावे लागले. २०१६ मध्ये अपघातांचे प्रमाण काहीसे कमी झाले. पण २०१७ मध्ये त्यातुलनेत वाढ झाली असून सुमारे चार हजार अपघात झाले आहेत. असे असले तरी मृतांचा आकडा घटल्याचे दिसते.पुणे शहरापेक्षा ग्रामीण भागात अपघातांची संख्या अधिक आहे. मागील वर्षी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये मिळून सुमारे दीड हजार अपघात झाले. त्यात ३७३ जणांचा बळी गेला, तर ग्रामीण भागात सुमारे अडीच हजार अपघातांत १ हजार २५ जणांना आपला जीव गमवावा लागला. मागील तीन वर्षांत एकूण ११ हजार ७९० अपघात झाले असून त्यात ४ हजार ४१२ जणांचा मृत्यू झाला, तर ९ हजार ५८२ लोक जखमी झाले.जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अपघातांची आकडेवारी मांडण्यात आली. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या वेळी खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, आमदार भीमराव तापकीर, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, वाहतूक पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, महामार्ग पोलीस अधीक्षक अमोल तांबे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, विनोद सगरे, अनिल वळीव, आनंद पाटील आदी उपस्थित होते. बैठकीत रस्ते अपघात कमी करण्यासाठी विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.कृती आराखडा : ट्रफिक पार्क उभारण्याची सूचनाशिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैठकीत प्रत्येक तालुक्यात ट्रॅफिक पार्क उभारण्याची सूचना केली. तसेच स्वतंत्र रस्ता सुरक्षा पथकाची निर्मिती, अपघात कमी करण्यासाठी कृती आराखडा तयार करणे, अपघातप्रवण क्षेत्रांचे सर्वेक्षण, महाविद्यालय व शाळास्तरावर रस्ता सुरक्षा स्वयंसेवकांचे जाळे निर्माण करण्याबाबत त्यांना सूचना केल्या.द्रुतगती महामार्गावरून जाणाºया दुचाकी वाहनांवर कारवाई, तसेच मार्गाच्या जोन्ही बाजूने संरक्षक जाळी लावण्याची सूचना शिरोळे यांनी केली. तसेच त्यांनी खासदार निधीतून आरटीओ ५० लाख रुपयांचा निधी दिला. त्यातून रोलर ब्रेक टेस्टिंग यंत्रणा खरेदी करण्यात येणार असून लहान परिवहन वाहनांचेयोग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण आळंदी रस्ता चाचणी मैदान येथे करण्यात येणार आहे. महामार्गावरील बेशिस्त वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ड्रोन तंत्राचा वापर करण्याबाबत साबळे यांनी सुचविले.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे