शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

प्रकाशकांनी वाचक संस्कृतीच्या प्रसारासाठी ग्रंथप्रदर्शनांना पाठबळ द्यायला हवे : रमेश राठिवडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 4:09 PM

विदिशा विचार मंचतर्फे आयोजित ’भूमिका’ कार्यक्रमात राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांच्या हस्ते वाचन प्रसाराच्या कार्यामध्ये २५ वर्षे योगदान दिल्याबद्दल रमेश राठिवडेकर आणि रसिका राठिवडेकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी रमेश राठिवडेकर यांनी अापला अायुष्याचा प्रवास उलगडला.

पुणे: वाचन कमी होत आहे असं म्हणण चुकीचं आहे. आॅनलाईनमुळे शहरी वाचक खूश झाला तरी ग्रामीण भागातील वाचकांना सहजगत्या पुस्तके उपलब्ध करून देणारी ग्रंथप्रदर्शने थांबली आहेत याची प्रकाशकांना खंत वाटत नाही.ग्रंथप्रदर्शने सुरू राहणे ही वाचक, लेखक आणि विक्रेते यांच्याबरोबरच प्रकाशकांचीही गरज आहे. आपल्या वातानुकूलन कक्षाबाहेर पडून प्रकाशकांनी वाचन संस्कृतीच्या प्रसारासाठी ग्रंथप्रदर्शनांना पाठबळ द्यावे, अशी अपेक्षा अक्षरधारा बुक गॅलरीचे रमेश राठिवडेकर यांनी व्यक्त केली. 

    विदिशा विचार मंचतर्फे आयोजित ’भूमिका’ कार्यक्रमात राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांच्या हस्ते वाचन प्रसाराच्या कार्यामध्ये २५ वर्षे योगदान दिल्याबद्दल रमेश राठिवडेकर आणि रसिका राठिवडेकर यांचा सत्कार करण्यात आला. मंचच्या ममता क्षेमकल्याणी यांनी राठिवडेकर दांपत्याची मुलाखत घेतली. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी या वेळी उपस्थित होते.

       ढवळे ग्रंथयात्रेतील कर्मचारी आणि व्यवस्थापक  ते अक्षरधारा बुक गॅलरीचे मालक असा रमेश राठिवडेकर यांचा प्रवास यावेळी उलगड्याणात अाला. ते म्हणाले, बालपणी आईचे निधन झाल्यानंतर काकूने सांभाळ केला. ढवळे ग्रंथयात्रेमध्ये काम करताना प्रदर्शन भरविलेल्या प्रत्येक गावात दररोज प्रत्येक माणूस मला नवीन काही शिकवत गेला. ढवळे यांनी केलेल्या चुकांमधून शिकलो आणि प्रकाशकांना वेळच्यावेळी पैसे दिले. तेथून बाहेर पडल्यानंतर स्वतंत्ररित्या ग्रंथप्रदर्शने भरविण्यास सुरुवात केली. छोटेसे दुकान आणि अक्षरधारा बुक गॅलरी साकारताना वाचकांची भरभक्कम साथ लाभली.वाचन कमी होते आहे हे म्हणणे चुकीचे आहे. प्रकाशक आणि वाचकांपर्यंत पुस्तक पोहचवणा-या यंत्रणेचे जाळे निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे. प्रकाशक काहीसे शिथिल, निरुउत्साही झाल्याने मी ग्रंथप्रदर्शन थांबविण्याचा निर्णय घेतला, तरी देखील एकाही प्रकाशकाने त्याबद्दल आस्थेने विचारपूस केली नाही. त्यांनी या निर्णया संदर्भात माझ्याशी थेट बोलण्याचे देखील कष्ट घेतले नाही. महाराष्ट्रातील तळागाळात पुस्तक पोहचवणारी प्रभावी आणि किफायतीर ग्रंथप्रदर्शन चळवळ बंद होत आहे तरी त्याबद्दल प्रकाशकांना त्याचे गांभिर्य नाही. ढवळे प्रकाशन संस्थेपासून सेवक म्हणून सुरु झालेल्या प्रवासापासून तिथला व्यवस्थापक होण्यापर्यंतचा प्रवास, किस्से,अंगावर काटा आणणारे अनुभव यावेळी उलगडले. केवळ भिलार हे पुस्तकाचे गाव करून भागणार नाही. शासनाने प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकांचे गाव करून ते दत्तक द्यावे, असे मत राठिवडेकर यांनी व्यक्त केले. वाचकांची मागणी म्हणून नारायण धारप यांच्या ‘ग्रहण’ पुस्तकाचे प्रकाशन केले. पण, हे माझे क्षेत्र नाही,याची जाणीव असल्याचेही त्यांनी सांगितले.

     ढवळे ग्रंथयात्रा इचलकरंजी येथे आली तेव्हा त्यातील कार्मचाऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था आमच्या घरी होती. त्यांच्यातील एक असलेल्या रमेशयांच्याशी विवाह होईल असे त्या वेळी वाटले नव्हते. एकदोनदा समोरासमोर भेट झाली. मग त्यांनी थेट विचारले आणि घरच्यांच्या परवानगीने आमचा विवाह झाला, अशी आठवण रसिका राठिवडेकर यांनी सांगितली. वाचकांचा आनंद हीच आमची दिवाळी असते, असेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिकonlineऑनलाइनnewsबातम्या