शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशकांनी वाचक संस्कृतीच्या प्रसारासाठी ग्रंथप्रदर्शनांना पाठबळ द्यायला हवे : रमेश राठिवडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 16:09 IST

विदिशा विचार मंचतर्फे आयोजित ’भूमिका’ कार्यक्रमात राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांच्या हस्ते वाचन प्रसाराच्या कार्यामध्ये २५ वर्षे योगदान दिल्याबद्दल रमेश राठिवडेकर आणि रसिका राठिवडेकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी रमेश राठिवडेकर यांनी अापला अायुष्याचा प्रवास उलगडला.

पुणे: वाचन कमी होत आहे असं म्हणण चुकीचं आहे. आॅनलाईनमुळे शहरी वाचक खूश झाला तरी ग्रामीण भागातील वाचकांना सहजगत्या पुस्तके उपलब्ध करून देणारी ग्रंथप्रदर्शने थांबली आहेत याची प्रकाशकांना खंत वाटत नाही.ग्रंथप्रदर्शने सुरू राहणे ही वाचक, लेखक आणि विक्रेते यांच्याबरोबरच प्रकाशकांचीही गरज आहे. आपल्या वातानुकूलन कक्षाबाहेर पडून प्रकाशकांनी वाचन संस्कृतीच्या प्रसारासाठी ग्रंथप्रदर्शनांना पाठबळ द्यावे, अशी अपेक्षा अक्षरधारा बुक गॅलरीचे रमेश राठिवडेकर यांनी व्यक्त केली. 

    विदिशा विचार मंचतर्फे आयोजित ’भूमिका’ कार्यक्रमात राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांच्या हस्ते वाचन प्रसाराच्या कार्यामध्ये २५ वर्षे योगदान दिल्याबद्दल रमेश राठिवडेकर आणि रसिका राठिवडेकर यांचा सत्कार करण्यात आला. मंचच्या ममता क्षेमकल्याणी यांनी राठिवडेकर दांपत्याची मुलाखत घेतली. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी या वेळी उपस्थित होते.

       ढवळे ग्रंथयात्रेतील कर्मचारी आणि व्यवस्थापक  ते अक्षरधारा बुक गॅलरीचे मालक असा रमेश राठिवडेकर यांचा प्रवास यावेळी उलगड्याणात अाला. ते म्हणाले, बालपणी आईचे निधन झाल्यानंतर काकूने सांभाळ केला. ढवळे ग्रंथयात्रेमध्ये काम करताना प्रदर्शन भरविलेल्या प्रत्येक गावात दररोज प्रत्येक माणूस मला नवीन काही शिकवत गेला. ढवळे यांनी केलेल्या चुकांमधून शिकलो आणि प्रकाशकांना वेळच्यावेळी पैसे दिले. तेथून बाहेर पडल्यानंतर स्वतंत्ररित्या ग्रंथप्रदर्शने भरविण्यास सुरुवात केली. छोटेसे दुकान आणि अक्षरधारा बुक गॅलरी साकारताना वाचकांची भरभक्कम साथ लाभली.वाचन कमी होते आहे हे म्हणणे चुकीचे आहे. प्रकाशक आणि वाचकांपर्यंत पुस्तक पोहचवणा-या यंत्रणेचे जाळे निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे. प्रकाशक काहीसे शिथिल, निरुउत्साही झाल्याने मी ग्रंथप्रदर्शन थांबविण्याचा निर्णय घेतला, तरी देखील एकाही प्रकाशकाने त्याबद्दल आस्थेने विचारपूस केली नाही. त्यांनी या निर्णया संदर्भात माझ्याशी थेट बोलण्याचे देखील कष्ट घेतले नाही. महाराष्ट्रातील तळागाळात पुस्तक पोहचवणारी प्रभावी आणि किफायतीर ग्रंथप्रदर्शन चळवळ बंद होत आहे तरी त्याबद्दल प्रकाशकांना त्याचे गांभिर्य नाही. ढवळे प्रकाशन संस्थेपासून सेवक म्हणून सुरु झालेल्या प्रवासापासून तिथला व्यवस्थापक होण्यापर्यंतचा प्रवास, किस्से,अंगावर काटा आणणारे अनुभव यावेळी उलगडले. केवळ भिलार हे पुस्तकाचे गाव करून भागणार नाही. शासनाने प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकांचे गाव करून ते दत्तक द्यावे, असे मत राठिवडेकर यांनी व्यक्त केले. वाचकांची मागणी म्हणून नारायण धारप यांच्या ‘ग्रहण’ पुस्तकाचे प्रकाशन केले. पण, हे माझे क्षेत्र नाही,याची जाणीव असल्याचेही त्यांनी सांगितले.

     ढवळे ग्रंथयात्रा इचलकरंजी येथे आली तेव्हा त्यातील कार्मचाऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था आमच्या घरी होती. त्यांच्यातील एक असलेल्या रमेशयांच्याशी विवाह होईल असे त्या वेळी वाटले नव्हते. एकदोनदा समोरासमोर भेट झाली. मग त्यांनी थेट विचारले आणि घरच्यांच्या परवानगीने आमचा विवाह झाला, अशी आठवण रसिका राठिवडेकर यांनी सांगितली. वाचकांचा आनंद हीच आमची दिवाळी असते, असेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिकonlineऑनलाइनnewsबातम्या