शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

इंदापूरसाठी उजनीचे पाणी देऊ : चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 14:55 IST

उजनी धरणातील पाणी पुढे वाहून कर्नाटकला जाते. ते पाणी अडवले तर इंदापूरमधील या २७ गावांशिवाय अन्य गावांची पाण्याची गरज भागू शकते

ठळक मुद्दे उपसा सिंचन योजनेचे प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

पुणे: इंदापूरसाठीपाणी मिळणे गरजेचे आहे. उजनी धरणातूनपाणी उचलले तर ते शक्यही होईल. तसा निर्णय घेतला जाईल, तत्पुर्वी धरणातून पाणी उचलण्यासाठी म्हणून उपसासिंचन योजनेचे प्रस्ताव तयार करून ते त्वरीत पाटंबंधारे खात्याकडे द्यावेत,असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी इंदापूर तालुक्यातील ग्रामस्थांना दिले.जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी पाटील विधानभवनात आले होते. विधानभवनाच्या आवारात त्यांची भेट घेण्यासाठी म्हणून सकाळीच इंदापूर तालुक्यातील २७ गावांमधील नागरिक ठाण मांडून बसले होते. आमदार दत्ता भरणे, प्रताप पाटील यांच्या नेतृत्वाखाली या नागरिकांनी धरणे आंदोलन सुरू केले. प्रताप पाटील म्हणाले, इंदापूरमधील निरगुडे, अकोले, कळस अशी एकूण २७ गावे पाण्यावाचून तहानलेली आहेत. प्यायलाही पाणी नाही. तरीही पाटंबंधारे खाते दखल घ्यायला तयार नाही, त्यामुळेच असे आंदोलन करून लक्ष वेधण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. चंद्रकांत पाटील थेट बैठकीसाठी निघून गेल्यामुळे आंदोलक संतप्त झाले, मात्र आतून बैठकीनंतर चर्चा करण्यात येईल असा निरोप आल्यानंतर ते शांत झाले. प्रताप पाटील यांनी सांगितले की, पाटबंधारे खात्याचे अधिकारी त्यांच्या राजकीय दबाव असल्याची माहिती देतात. यापुर्वी खडकवासला धरणातून पाणी सोडले की ते कॅनॉलद्वारे या परिसरात येत असे. त्यातून १४ तलाव भरले जात. त्यामुळे या २७ गावांची गरज भागत होती. आता कोणतीही पुर्वसुचना न देता किंवा पर्यायी व्यवस्था न करता थेट पाणी देणे बंद करण्यात आले. बैठकीमध्ये आत आमदार भरणे यांनी पाटील यांच्यापुढे हीच तक्रार केली. पाटील यांनी सर्व आंदोलकांना आत बोलावून त्यांची भेट घेतली व म्हणणे ऐकले. उजनी धरणातील पाणी पुढे वाहून कर्नाटकला जाते. ते पाणी अडवले तर इंदापूरमधील या २७ गावांशिवाय अन्य गावांची पाण्याची गरज भागू शकते. हे लक्षात घेऊन तसा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. गावांनी पाटबंधारे खाते तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात उपसा सिंचन योजनेचे प्रस्ताव पाठवावेत, त्यांना त्वरीत मंजूरी देऊ. पाण्याशिवाय कोणतेही गाव राहू देणार नाही असे आश्वासन पाटील यांनी दिले. 

टॅग्स :IndapurइंदापूरWaterपाणीUjine Damउजनी धरणFarmerशेतकरी