शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

इंदापूरसाठी उजनीचे पाणी देऊ : चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 14:55 IST

उजनी धरणातील पाणी पुढे वाहून कर्नाटकला जाते. ते पाणी अडवले तर इंदापूरमधील या २७ गावांशिवाय अन्य गावांची पाण्याची गरज भागू शकते

ठळक मुद्दे उपसा सिंचन योजनेचे प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

पुणे: इंदापूरसाठीपाणी मिळणे गरजेचे आहे. उजनी धरणातूनपाणी उचलले तर ते शक्यही होईल. तसा निर्णय घेतला जाईल, तत्पुर्वी धरणातून पाणी उचलण्यासाठी म्हणून उपसासिंचन योजनेचे प्रस्ताव तयार करून ते त्वरीत पाटंबंधारे खात्याकडे द्यावेत,असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी इंदापूर तालुक्यातील ग्रामस्थांना दिले.जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी पाटील विधानभवनात आले होते. विधानभवनाच्या आवारात त्यांची भेट घेण्यासाठी म्हणून सकाळीच इंदापूर तालुक्यातील २७ गावांमधील नागरिक ठाण मांडून बसले होते. आमदार दत्ता भरणे, प्रताप पाटील यांच्या नेतृत्वाखाली या नागरिकांनी धरणे आंदोलन सुरू केले. प्रताप पाटील म्हणाले, इंदापूरमधील निरगुडे, अकोले, कळस अशी एकूण २७ गावे पाण्यावाचून तहानलेली आहेत. प्यायलाही पाणी नाही. तरीही पाटंबंधारे खाते दखल घ्यायला तयार नाही, त्यामुळेच असे आंदोलन करून लक्ष वेधण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. चंद्रकांत पाटील थेट बैठकीसाठी निघून गेल्यामुळे आंदोलक संतप्त झाले, मात्र आतून बैठकीनंतर चर्चा करण्यात येईल असा निरोप आल्यानंतर ते शांत झाले. प्रताप पाटील यांनी सांगितले की, पाटबंधारे खात्याचे अधिकारी त्यांच्या राजकीय दबाव असल्याची माहिती देतात. यापुर्वी खडकवासला धरणातून पाणी सोडले की ते कॅनॉलद्वारे या परिसरात येत असे. त्यातून १४ तलाव भरले जात. त्यामुळे या २७ गावांची गरज भागत होती. आता कोणतीही पुर्वसुचना न देता किंवा पर्यायी व्यवस्था न करता थेट पाणी देणे बंद करण्यात आले. बैठकीमध्ये आत आमदार भरणे यांनी पाटील यांच्यापुढे हीच तक्रार केली. पाटील यांनी सर्व आंदोलकांना आत बोलावून त्यांची भेट घेतली व म्हणणे ऐकले. उजनी धरणातील पाणी पुढे वाहून कर्नाटकला जाते. ते पाणी अडवले तर इंदापूरमधील या २७ गावांशिवाय अन्य गावांची पाण्याची गरज भागू शकते. हे लक्षात घेऊन तसा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. गावांनी पाटबंधारे खाते तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात उपसा सिंचन योजनेचे प्रस्ताव पाठवावेत, त्यांना त्वरीत मंजूरी देऊ. पाण्याशिवाय कोणतेही गाव राहू देणार नाही असे आश्वासन पाटील यांनी दिले. 

टॅग्स :IndapurइंदापूरWaterपाणीUjine Damउजनी धरणFarmerशेतकरी