शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
2
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
3
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
4
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
5
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
6
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
7
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
8
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
9
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
10
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
11
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
12
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
13
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
14
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
15
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
16
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
17
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
18
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
19
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
20
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा

समाजमाध्यमांवर व्यक्त होण्यावर व्यावसायिक बंधने आणली जातायेत- गोपाळ तिवारी

By राजू इनामदार | Updated: June 6, 2023 17:15 IST

प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी हा सर्वसामान्यांची गळचेपी करण्याचा प्रकार असल्याची टीका केला...

पुणे : सार्वजनिकपणे समाजमाध्यमांवर व्यक्त होण्यावर व्यावसायिक बंधने आणली जात असून, यात सरकारचा हात नाही हे लक्षात आणून देण्यासाठी सरकारनेच यावर नियंत्रण आणावे, अशी मागणी काँग्रेसने केली. प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी हा सर्वसामान्यांची गळचेपी करण्याचा प्रकार असल्याची टीका केली.

माध्यमांचे व्यावसायिकरण झालेच आहे, व्हाॅटस्ॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक या समाजमाध्यमांचेही व्यावसायिकरण होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना यावर आपले मत मुक्तपणे, विनामूल्य प्रदर्शित करता येत होते. आता मात्र त्यासाठी पैसे मोजावे लागतील अशी स्थिती आहे. एखाद्या मताला मिळणाऱ्या लाइक्स किंवा कमेंट आता लक्षणियरित्या कमी होऊ लागल्या आहेत. अनेकदा पोस्ट त्या-त्या माध्यमांकडून परस्पर डिलिट केल्या जातात, अशीही उदाहरणे सातत्याने निदर्शनास येत आहेत, असे तिवारी यांचे म्हणणे आहे.

दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी संगणक क्रांती घडवली. त्यातून ही समाजमाध्यमे भारतात सहजी उपलब्ध झाली. आताच्या केंद्र सरकारला सत्ताप्राप्ती करून देणाऱ्या अनेक घटकांमध्ये या समाजमाध्यमांचा मोठा वाटा आहे. त्यावर बंधने लादली जात असतील तर त्यामागे सरकारचा हात आहे अशी शंका निर्माण होते. तसे नसेल तर केंद्र सरकारने समाजमाध्यमांच्या संचालकांना ही सर्व माध्यमे पूर्वीप्रमाणेच विनाबंधन, विनाशुल्क सुरू राहतील असे करणे भाग पाडावे, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे तिवारी यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेSocial Mediaसोशल मीडियाWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपFacebookफेसबुक