शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

समाजमाध्यमांवर व्यक्त होण्यावर व्यावसायिक बंधने आणली जातायेत- गोपाळ तिवारी

By राजू इनामदार | Updated: June 6, 2023 17:15 IST

प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी हा सर्वसामान्यांची गळचेपी करण्याचा प्रकार असल्याची टीका केला...

पुणे : सार्वजनिकपणे समाजमाध्यमांवर व्यक्त होण्यावर व्यावसायिक बंधने आणली जात असून, यात सरकारचा हात नाही हे लक्षात आणून देण्यासाठी सरकारनेच यावर नियंत्रण आणावे, अशी मागणी काँग्रेसने केली. प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी हा सर्वसामान्यांची गळचेपी करण्याचा प्रकार असल्याची टीका केली.

माध्यमांचे व्यावसायिकरण झालेच आहे, व्हाॅटस्ॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक या समाजमाध्यमांचेही व्यावसायिकरण होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना यावर आपले मत मुक्तपणे, विनामूल्य प्रदर्शित करता येत होते. आता मात्र त्यासाठी पैसे मोजावे लागतील अशी स्थिती आहे. एखाद्या मताला मिळणाऱ्या लाइक्स किंवा कमेंट आता लक्षणियरित्या कमी होऊ लागल्या आहेत. अनेकदा पोस्ट त्या-त्या माध्यमांकडून परस्पर डिलिट केल्या जातात, अशीही उदाहरणे सातत्याने निदर्शनास येत आहेत, असे तिवारी यांचे म्हणणे आहे.

दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी संगणक क्रांती घडवली. त्यातून ही समाजमाध्यमे भारतात सहजी उपलब्ध झाली. आताच्या केंद्र सरकारला सत्ताप्राप्ती करून देणाऱ्या अनेक घटकांमध्ये या समाजमाध्यमांचा मोठा वाटा आहे. त्यावर बंधने लादली जात असतील तर त्यामागे सरकारचा हात आहे अशी शंका निर्माण होते. तसे नसेल तर केंद्र सरकारने समाजमाध्यमांच्या संचालकांना ही सर्व माध्यमे पूर्वीप्रमाणेच विनाबंधन, विनाशुल्क सुरू राहतील असे करणे भाग पाडावे, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे तिवारी यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेSocial Mediaसोशल मीडियाWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपFacebookफेसबुक