शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
2
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
3
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
4
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
5
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
6
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
7
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
8
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
9
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
10
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
11
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
12
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
13
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
14
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
15
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
16
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
17
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
18
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
19
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
20
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’

शासकीय नियोजनाअभावी कांदापिकाची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 01:04 IST

खा. शिवाजीराव आढळराव : ग्लोबल फार्मर्स कृषी प्रदर्शनात संबोधन

नारायणगाव : सरकारच्या नियोजन अभावामुळे कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांपुढे समस्या निर्माण झाली आहे. ती सोडविण्यासाठी सरकारने आयात नियार्तीचे व्यापक धोरण अवलंबविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नारायणगाव येथे केले .

ग्रामोन्नती मंडळ कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव येथे ग्लोबल फार्मर्स २०१९ कृषी प्रदर्शन सुरु आहेत. त्याप्रसंगी कृषि विद्यान केंद्राने उभारलेल्या फळे व भाजीपाला प्रक्रिया प्रयोगशाळेचे उद्घाटन आणि घाडीपात्रीकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील हे बोलत होते. यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरीचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरीचे कृषि विस्तार संचालक डॉ. किरण कोकाटे, माजी सनदी आधिकारी अरविंद झांबम ,सहाय्यक जिल्हाधिकारी खेड तथा प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प आयुष प्रसाद, जिल्हा परिषद पुणेच्या सदस्या आशा बुचके, ग्रामोन्नती मंडळ कृषि विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्यवाह रविंद्र पारगावकर तसेच मंडळाचे संचालक उपस्थित होते.

खासदार आढळराव पाटील म्हणाले की. ‘ उत्तर पुणे जिल्हा हा भाजीपाला उत्पन्नात अग्रेसर असून प्रक्रिया उद्योग आणि मुल्यावर्धनासाठी कृषी पदविधारकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. अल्पावधीतच नारायणगावच्या कृषि विज्ञान केंद्राने शेतकºयांसाठी नाविन्यपूर्ण पिकप्रात्यक्षिकाबरोबर मोलाचे मार्गदर्शन केले आहे. कृषितंत्रज्ञानाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. केंद्राने उभारलेले उपक्रम राज्यात पथदर्शी ठरत आहेत.’’ महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरीचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी भारतीय शेती ही वातावरणाच्या बदलामुळे चिंतेची ठरत असून संरक्षित शेती फायद्याची ठरणार आहे, असे मत व्यक्त केले. सहाय्यक जिल्हाधिकारी खेड आयुष प्रसाद यांनी फार्मर्स प्रोड्यूसर कंपन्यांच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज, वाहतूक साखळी, प्रक्रिया व मूल्यवर्धित पदार्थांची निर्मितीत पुढाकार घेणे गरजेचे आहे. अशाप्रकारे पुढाकार घेणाºया संस्थांना सरकारने आर्थिक पाठबळ देऊन मोठे करायला हवे तर देश प्रचंड गतीने प्रगती करेल असा विश्वास व्यक्त केला.कृषि विस्तार संचालक डॉ. किरण कोकाटे यांनी उत्पादित शेतमालावर प्रक्रिया व त्याची विक्री व्यवस्थापन ही आजची गरज आहे असे सांगितले. कमी पिकवा परंतु दर्जेर्दार पिकवा असा सल्ला त्यांनी शेतकºयांना दिला.राज्यातील २५ ते ३० हजाराहून अधिक शेतकºयांनी विज्ञान केंद्राला भेटी दिल्या आहेत अशी माहिती केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर यांनी दिली. सूत्रसंचलन सुनील ढवळे, राहुल घाडगे यांनी केले, ग्रामोन्नती मंडळाचे कार्यवाह रविंद्र पारगावकर यांनी आभार मानले.कृषी विज्ञान केंद्राना आधुनिक तंत्रज्ञानाने संपन्न करण्यासाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार आहे असे आश्वासन खासदार आढळराव पाटील यांनी दिले. मान्यवरांच्या हस्ते प्रगतशील शेतकरी पुरस्कार संतोष बांगर,प्रगतशील महिला शेतकरी पुनम नवले, कृषि उद्योजक आदेश काशिद, श्रीकांत वायाळ यांना ग्रामोन्नती कृषि सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उद्या (दि. ६) कृषी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवार आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत समारोप कार्यक्रम होणार आहे. कृषी प्रदर्शनानिमित्त्त आयोजित लकी ड्रॉची सोडत काढणार असून भाग्यवान शेतकºयांना शेतीपयोगी बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे.

टॅग्स :Puneपुणेonionकांदा