शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारल्याने पुरस्कारांचे मोल कमी होत नाही : नाना पाटेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 8:43 PM

राष्ट्रपतींच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांच्या अनुपस्थितीत स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यात काही गैर नाही. त्यामुळे पुरस्काराचे मोल कमी होत नाही,

ठळक मुद्देबालगंधर्व नाट्यगृहाचा पुनर्विकास करायला हरकत नाही

पुणे :  कलाकारांसाठी राष्ट्रीय पुरस्काराचे वेगळे महत्व असते. मलाही राष्ट्रपतींच्याच हस्ते तीन पुरस्कार मिळाले. त्यामुळे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपतींच्याच हस्ते मिळावा, अशी अपेक्षा ठेवणे सार्थ आहे. पुरस्कार त्यांच्याच हस्ते मिळाला नाही तर कलाकारांची नाराजीही स्वाभाविक आहे. मात्र, राष्ट्रपतींच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांच्या अनुपस्थितीत स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यात काही गैर नाही. त्यामुळे पुरस्काराचे मोल कमी होत नाही, अशी भूमिका ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मांडली.   ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण गुरुवारी नवी दिल्ली येथे पार पडले. राष्ट्रपतींच्या हस्ते केवळ ११ पुरस्कार देण्यात आले. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे स्मृती इराणी यांच्या हस्ते उर्वरित पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याबाबत कलाकारांनी आक्षेप नोंदवला. याबाबत पुण्यातील एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना नाना पाटेकर यांनी मत व्यक्त केले.बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाबाबत विचारले असता पाटेकर म्हणाले, ‘जास्त एफएसआय मिळत असेल आणि अधिक नाट्यगृहे उभारता येत असतील तर बालगंधर्व नाट्यगृहाचा पुनर्विकास करायला हरकत नाही. जुनी वास्तू आहे,आमच्या काळात असं होतं म्हणण्यात अर्थ नाही. नाट्यवेडया प्रेक्षकाची कलाकृतींकडील ओढ कमी होत नाही. त्यामुळं नवीन नाट्यगृह बांधायला उशीर झाला तरी प्रेक्षक दूर जातील, असे वाटत नाही.’ आयपीएल दोन वर्षात बंद पडेल, असे वाटलं होते. मात्र, दहा वर्षे उलटूनही प्रतिसाद कायम आहे, असे सांगत नानापाटेकर यांनी बालगंधर्व नाट्यगृहाचा पुर्नविकास करुन नवीन वास्तू बांधण्याच्या बाजूने भूमिका घेतली.

 

टॅग्स :PuneपुणेNana Patekarनाना पाटेकरNational Film Awardsराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018Bal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिर