शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
4
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
5
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
6
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
7
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
8
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
9
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
10
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
11
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
12
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
13
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
14
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
15
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
16
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
17
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
18
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
19
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
20
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ

पुणे शहरात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर 'खासगी वाहने जोमात, रिक्षा-पीएमपी कोमात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 20:40 IST

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आल्याने शहरात दुचाकी व चारचाकी या वाहनांची गर्दी वाढू लागली आहे...

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहनांना संचारबंदी

पुणे : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आल्याने शहरात दुचाकी व चारचाकी या वाहनांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे अनेक भागातील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी लागली. पण ही वाहतूक सुरू असताना नियमांकडे मात्र डोळेझाक होत आहे. दुचाकीवर एक आणि चारचाकीमध्ये केवळ दोघांनाच परवानगी असूनही त्याचे पालन होताना दिसत नाही. तर दुसरीकडे रिक्षा आणि पीएमपी बससेवेबाबत मात्र प्रशासनाची ताठर भूमिका अजूनही कायम आहे. त्यामुळे या सेवाही काही निर्बंधासह सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहनांना संचारबंदी करण्यात आली. मागील महिन्यात दुचाकी व चारचाकी वाहनांना काही अटींवर परवानगी देण्यात आली. देशांतर्गत विमानसेवाही सुरू झाली. १ जूनपासून २०० रेल्वेगाड्याही धावू लागल्या. पण रिक्षा व पीएमपीच्या बससेवा बंदच ठेवण्यात आली. दुचाकीवर केवळ एकाच व्यक्तीला तर चारचाकीमध्ये दोघांना परवानगी आहे. पण प्रत्यक्षात सध्या या नियमांकडे बहुतेक जण दुर्लक्ष करत आहेत. दुचाकीवरून दोघे जण तर चारचाकीमध्ये दोनहून अधिक व्यक्ती प्रवास करताना दिसत आहेत. पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. मागील आठवडाभरात तर खासगी वाहनांची रस्त्यांवरील संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली.याविषयी नाराजी व्यक्त करताना रिक्षा पंचायतचे निमंत्रक नितीन पवार म्हणाले, लक्ष्मी रस्त्यावरील दुकानांसह तुळशीबागही सुरू करण्यावर निर्णय घेतला जातो. पण जनजीवन पूर्वपदावर आणायचे असेल तर रिक्षा व बसला परवानगी द्यायलाच हवी. दुचाकीवरून जाण्यास महिलांसह ज्येष्ठांना मयार्दा आहेत. त्यांना रिक्षाशिवाय पर्याय नाही. रिक्षा सुरू झाल्याशिवाय जनजीवन पूर्वपदावर येणार नाही. त्यामुळे रिक्षाला दोन प्रवासी नेण्याची परवानगी द्यायला. रिक्षाचालक पूर्ण दक्षता घेऊन प्रवाशांना सेवा देतील. रिक्षा सुरू झाल्यानंतर त्यांना याबाबत प्रशिक्षणही दिले जाईल.---------------पिंपरी-चिंचवडमध्ये ५० टक्के बस मार्गावर धावत आहेत. त्याप्रमाणे पुण्यातही नियोजन करण्यात आले आहे. प्रशासनाकडून बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही सज्ज आहेत. प्रामुख्याने वर्दळीचे मार्ग, एमआयडीसी, आयटी कंपन्या, बाजारपेठा, महत्त्वाच्या ठिकाणी बस सोडण्याला प्राधान्य असेल. बसमध्ये मार्किंगचे कामही सुरू आहे.- अनंत वाघमारे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी---------------दुचाकी व चारचाकी तसेच कॅब वाढल्याने आधीच रिक्षा व्यवसायावर परिणाम झाला आहे. विमा, पासिंग, परवाना इतर शुल्क भरमसाठ वाढले आहे. आता लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद आहे. रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आल्याने रिक्षाला मान्यता द्यायला हवी.- किशोर राखुंडे, रिक्षाचालक

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस