शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

देशातंर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाची संरक्षण उत्पादने निर्मितीत खाजगी कंपन्यांनी घ्यावा पुढाकार : सुभाष भामरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 20:15 IST

लष्कराला पुढील काही वर्षांकरिता कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे विचारत घेऊन त्यादृष्टीने स्वदेशी उत्पादने बनविल्यास त्याचा देशाला फायदा होईल.

ठळक मुद्दे संरक्षण क्षेत्रातील उद्योगाचे स्वदेशीकरण: संधी आणि आव्हाने लष्कराची उत्पादनांची बाजारपेठ विकसित होण्यासाठी मोठी संधी

पुणे : तंत्रज्ञामुळे आजच्या युद्धपद्धतीत अमुलाग्र बदल झाले आहेत. नव्या तंत्रज्ञानाची रचना आणि त्यांची निर्मिती करणे आज आव्हान बनले आहे. भारत आज मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे बाहेरील देशांकडून खरेदी करत आहे. ही गरज देशांतर्गतच पूर्ण होण्यासाठी देशांच्या भविष्यातील संरक्षण विषयक गरजा लक्षात घेऊन आंतराष्ट्रीय दर्जांची संरक्षण उत्पादने बनविण्यासाठी खाजगी कंपन्यांनी पुढाकार घ्यावा. यासाठी लष्करी संशोधन आणि विकास यावर येणा-या काळात लक्ष केंद्रीत करावे असे, प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी केले.  मराठा चेंबर ऑफ कॉर्मस तर्फे आयोजित संरक्षण क्षेत्रातीलब उद्योंगाचे स्वदेशीकरण: संधी आणि आव्हाणेह्ण या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते.  या प्रसंगी प्रसिध्द उद्योगपती बाबा कल्याणी, मराठा चेंबर आॅफ कॉर्मसचे अध्यक्ष प्रदीप भार्गव, संचालक प्रशांत गिरबाने, ज्येष्ठ पत्रकार नितीन गोखले उपस्थित होते.भामरे म्हणाले, पुण्याचा विकास हा औद्योगिक हब म्हणून होत आहे. या बरोबरच या ठिकाणी अनेक कंपण्या आहेत. डीआरडीओच्या अनेक प्रयोगशाळा या ठिकाणी आहेत. आज भारत एक महासत्ता म्हणून उदयास येत आहे. देशाच्या संरक्षण विषयक गरजा लक्षात घेता नव्या तंत्रज्ञानाची निर्मिती आवश्यक आहे. युध्दभूमीवर तंत्रज्ञान वेगाने बदलत असून त्यानुसार नवीन तंत्रज्ञान आधारित उत्पादने खरेदी करण्यात मोठा पैसा खर्च केला जात आहे. नवीन तंत्रज्ञान सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने त्याअनुषंगाने सरकार, कंपन्यांनी एकत्र येत संशोधनावर भर देऊन स्वदेशी उत्पादनांची निर्मिती केली पाहिजे. लष्कराची उत्पादनांची बाजारपेठ विकसित होण्यासाठी मोठी संधी आहे. या संधीचा फायदा घेऊन देशात निर्मित झालेली शस्त्रे निर्यात करण्याकरिता मोठा वाव आहे. यासाठी खाजगी कंपन्यांनी या उद्योगात पुढे येऊन जास्तीत जास्त गुंतवणूक करणे गजेचे आहे. येत्या काही वर्षात मोठया प्रमाणात कंपन्यांनी संशोधनावर भर देऊन चांगली उत्पादने तयार करावीत. लष्कराला पुढील काही वर्षांकरिता कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे विचारत घेऊन त्यादृष्टीने स्वदेशी उत्पादने बनविल्यास त्याचा देशाला फायदा होईल. यासाठी खाजगी कंपन्यांनी प्रयत्न करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.बाबा कल्याणी म्हणाले, देशात संरक्षण क्षेत्रातील उद्योंगांना विकसीत होण्यासाठी मोठी संधी आहे. दुस-या महायुद्धात अमेरिका सर्वात शेवटी युद्धात उतरली. १९३० च्या महामंदीनंतर अनेक उद्योग डबघाईला आले होते. मात्र, तेथील तीन उद्योजकांनी एकत्र येत डीफेन्स सेक्टरची निर्मिती केली. याला अमेरिकेच्या सरकारने पांठींबा दिला. वर्ष भरात मोठ्या प्रमाणात हजारो लढाऊ जहाज, विमाने, टँक आणि गोळा बारूद यांची निर्मिती करून त्यांची विक्री केली. भारतीय कंपन्यांकडेही या प्रकारचे कौशल्य असून त्या प्रकारच्या सुविधा मिळाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवानwarयुद्ध