शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
2
CAA, आरक्षण अन् राम मंदिराचा निर्णय..; PM नरेंद्र मोदींनी दिल्या 5 गॅरंटी
3
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
4
"रायबरेलीत कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल", काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांचा हल्लाबोल
5
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
6
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
7
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
8
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
9
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
10
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
11
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
12
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
13
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
14
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
15
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
16
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
17
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
18
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
19
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
20
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला

मुस्लिम समाजाबाबत पंतप्रधान नरेंद्र माेदींचे विधान खेदजनक; मुस्लिम सत्यशाेधक मंडळाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 11:04 AM

मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी याबाबत एक निवेदन प्रसिद्धीला दिले...

पुणे : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील लोकसभा निवडणूक प्रचारसभेत मुस्लिम समाजाबाबत केलेले विधान दुर्दैवी व खेदजनक आहे, अशी टीका मुस्लिम सत्यशोधक मंडळाने केली. ‘मुस्लिम समाज हा या देशावरील भार आहे, त्यांचे प्रश्न न संपणारे व मानसिकता बायोलॉजिकल फॅक्टर आहे’ हा पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचा आशय या देशाची एकता धोक्यात आणणारा आहे’, असे मंडळाने म्हटले आहे.

मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी याबाबत एक निवेदन प्रसिद्धीला दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘पूर्वग्रहीत धारणा ठेवून मुस्लिम समाजाला दूषणे देणे, ही हिंदुत्ववादी संघटनांची जुनी कार्यशैली आहे. हिंदुत्ववादी संघटना, भाजप हिंदु-तुष्टीकरण व हिंदु - मुस्लिम ध्रुवीकरणाचे तंत्र वापरत असतातच, मात्र पंतप्रधान मोदीही आता तेच तंत्र वापरू लागले आहेत, हे अयोग्य व एकात्म भारतीय समाज निर्माण करण्यात अडथळा आणणारे आहे.

‘मुस्लिम जमातवाद संपला आहे, असे नाही. मात्र, या समाजाचे अनेक प्रश्न शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणातून आलेले आहेत, हे वास्तव स्वीकारून त्यावर उपाययोजना करण्याऐवजी या प्रश्नांचे राजकीय भांडवल करण्यात सरकार शक्ती खर्च करत आहे. लोकसंख्या नियंत्रणाबाबत मुस्लिम समाजात समाधानकारक प्रगती होत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून हिंदुत्ववादी संघटना वारंवार त्याचा उपयोग समाजातील मुस्लिम द्वेष वाढवण्यासाठी करतात. एखाद्या समाजाला असे सातत्याने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून ठेवणे देशाच्या एकात्मतेला धक्का देणारे ठरेल, याचे भान पंतप्रधानांनी ठेवावे, असे निवेदन म्हटले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPuneपुणेMuslimमुस्लीमRajasthanराजस्थानcongressकाँग्रेस