शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

मुस्लिम समाजाबाबत पंतप्रधान नरेंद्र माेदींचे विधान खेदजनक; मुस्लिम सत्यशाेधक मंडळाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 11:08 IST

मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी याबाबत एक निवेदन प्रसिद्धीला दिले...

पुणे : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील लोकसभा निवडणूक प्रचारसभेत मुस्लिम समाजाबाबत केलेले विधान दुर्दैवी व खेदजनक आहे, अशी टीका मुस्लिम सत्यशोधक मंडळाने केली. ‘मुस्लिम समाज हा या देशावरील भार आहे, त्यांचे प्रश्न न संपणारे व मानसिकता बायोलॉजिकल फॅक्टर आहे’ हा पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचा आशय या देशाची एकता धोक्यात आणणारा आहे’, असे मंडळाने म्हटले आहे.

मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी याबाबत एक निवेदन प्रसिद्धीला दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘पूर्वग्रहीत धारणा ठेवून मुस्लिम समाजाला दूषणे देणे, ही हिंदुत्ववादी संघटनांची जुनी कार्यशैली आहे. हिंदुत्ववादी संघटना, भाजप हिंदु-तुष्टीकरण व हिंदु - मुस्लिम ध्रुवीकरणाचे तंत्र वापरत असतातच, मात्र पंतप्रधान मोदीही आता तेच तंत्र वापरू लागले आहेत, हे अयोग्य व एकात्म भारतीय समाज निर्माण करण्यात अडथळा आणणारे आहे.

‘मुस्लिम जमातवाद संपला आहे, असे नाही. मात्र, या समाजाचे अनेक प्रश्न शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणातून आलेले आहेत, हे वास्तव स्वीकारून त्यावर उपाययोजना करण्याऐवजी या प्रश्नांचे राजकीय भांडवल करण्यात सरकार शक्ती खर्च करत आहे. लोकसंख्या नियंत्रणाबाबत मुस्लिम समाजात समाधानकारक प्रगती होत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून हिंदुत्ववादी संघटना वारंवार त्याचा उपयोग समाजातील मुस्लिम द्वेष वाढवण्यासाठी करतात. एखाद्या समाजाला असे सातत्याने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून ठेवणे देशाच्या एकात्मतेला धक्का देणारे ठरेल, याचे भान पंतप्रधानांनी ठेवावे, असे निवेदन म्हटले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPuneपुणेMuslimमुस्लीमRajasthanराजस्थानcongressकाँग्रेस