शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांनी 'खोटं बोल पण रेटून बोल' हे थांबवावं; नाना पटोलेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 20:48 IST

नाना पटोले यांनी पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलला भेट देत खासदार राजीव सातव यांच्या तब्येतीची केली विचारपूस

पुणे: राज्यासह देशभरात कोरोना संकटाने हाहाःकार उडविला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत आहे.मात्र, याचवेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात कोरोना काळातील वैद्यकीय मदतीवरून होत असलेल्या आरोप- प्रत्यारोपाने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवितानाच पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पुणे येथील जहांगीर रुग्णालयाला भेट दिली व डॉक्टरांशी चर्चा करून खासदार राजीव सातव यांच्या तब्येतीची विचारपूस करत व त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांसंबंधी माहिती घेतली.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पटोले म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लसी, ऑक्सिजन, रेमडिसिविर, व्हेंटिलेटर असे सर्व उपचार साहित्य केंद्र सरकारकडे आहे. मात्र याचा सुरळीत पुरवठा राज्यांना होत नाही.केंद्र सरकारने राज्यांवर अन्याय केला आहे. 

पुढे ते म्हणाले, जागतिक पातळीवर मदत सुरू झाली आहे. अनेक देश राज्याला मदतीसाठी पुढे आले आहेत. मात्र आता कोरोनाला जागतिक महामारी म्हणून घोषित करण्यात यावे अशीही मागणी पटोले यांनी यावेळी केली.

कोरोना काळातील रुग्णांना उपचारासाठी बेड उपलब्ध होताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण या परिस्थितीत ज्यांनी रुग्णांच्या उपचारासाठी पुढे येत कोविड सेंटर सुरू केले त्यांचं अभिनंदन देखील पटोले यांनी यावेळी बोलताना केले. 

पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांवर  निशाणा...

पंतप्रधान नरेंद मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना नाना पटोले म्हणाले, कोरोनाची भीषण परिस्थितीत  पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांनी आतातरी खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं थांबवायला हवे.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCentral Governmentकेंद्र सरकार