शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणामुळे वंचितांना कधीही सत्ता मिळणार नाही : रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 22:04 IST

प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणामुळे वंचित समाजाला सत्ता मिळणार नाही असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेे.

पुणे : वंचितमधून अनेक लाेक साेडून चालले आहेत. एमआयएम साेबतची त्यांची युती तुटली आहे. अनेक कार्यकर्ते आता आरपीआयमध्ये येत आहेत. वंचितला फारशी मते मिळणार नाहीत. प्रकाश आंबेडकरांच्या राजकाराणामुळे वंचितांना सत्ता कधीही मिळणार नाही. सत्ता मिळवायची असेल तर माझ्याकडून शिका आणि वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवायचे असेल तर प्रकाश आंबेडकरांकडून शिका अशी टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांवर केली. 

पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बाेलत हाेते. आठवले म्हणाले, निवडून येण्यासाठी मी अनेक प्रयाेग केले. वेगळी आघाडी करुन सत्ता मिळवणे अवघड आहे. वंचितचा एकमेव खासदार एमआयएमच्या तिकीटावर निवडून आला आहे. येत्या विधानसभेला वंचितला फारशा जागा मिळतील असे वाटत नाही. 

आम्हाला निवडणुक आयाेगाने संगणक हे चिन्ह दिले आहे. संगणक चिन्ह मिळाल्याने ईव्हीएम मशीन चालवणे अवघड नाही. आम्ही ईव्हीएमचं हॅकींग करणार नाही. आम्ही बराेबरच बटण दाबणार. आरपीआय कमळावर निवडणूक लढवणार नाही. आम्ही 10 जागांची मागणी केली आहे. किमान आठ जागा तरी आम्हाला मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. भाजप आणि शिवसेनेचे जागा वाटप झाल्यानंतर मित्र पक्षांच्या जागांचा विचार करण्यात येणार आहे. मित्रपक्षांमध्ये आमचा पक्ष माेठा असल्याने आम्ही जास्त जागांची मागणी करणार आहाेत. असेही आठवले यावेळी म्हणाले. 

पवारांची चाैकशी हाेणे याेग्य नाहीराज्य सहकारी बॅंकेच्या घाेटाळ्यात शरद पवार यांचे नाव नाही असे आण्णा हजारे सुद्धा म्हणाले आहेत. पवारांची चाैकशी हाेणे याेग्य नाही. जे दाेषी असतील त्यांच्यावर कारवाई हाेईल. पवार हे जाणते नेते आहेत. सुक्ष्म पद्धतीने ते काम करतात. त्यांची चाैकशी करणे याेग्य नाही. परंतु सूड बुद्धीने सरकारने चाैकशी लावली असल्याचे मला वाटत नाही. असेही आठवलेंनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारणPuneपुणे