शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या 70 वर्षात गरिबी गेली नाही, आता काय घालवणार ; साेशल मीडियावर पुणेकरांची मतमतांतरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 11:46 IST

राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यास गरिबांना दरवर्षी 72 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. देशातील 20 टक्के लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र माेदींनी 2014 च्या निवडणुकीच्या प्रचारात सत्तेत आल्यास प्रत्येकाच्या खातात 15 लाख जमा करण्याचे आश्वासन दिले हाेते. गेल्या पाच वर्षांमध्ये काेणाच्याच खात्यात 15 लाख जमा न झाल्याने माेदींना त्यांच्या घाेषणेवरुन वेळाेवेळी घेरण्यात आले. आता राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यास गरिबांना दरवर्षी 72 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. देशातील 20 टक्के लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. यातून गरिबी हटावचा नारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे राहुल गांधी साेशल मिडीयावर ट्राेल केले जात आहेत. यात पुणेकर आघाडीवर असून गेल्या 70 वर्षात गरिबी घालवू शकला नाहीत तर आता काय घालवणार असा प्रश्न विचारला जात आहे. 

काँग्रेसनं पुन्हा एकदा 'गरिबी हटाव'चा नारा दिला आहे. दुपारी राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्तेस आल्यास गरिब कुटुंबाला दरवर्षी 72 हजार रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. देशातील 20 टक्के लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, असं आश्वासन त्यांनी दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ श्रीमंत उद्योगपतींना मदत करतात. मात्र आम्ही गरिबांना मदत करणार आहोत, असेही ते पत्रकार परिषदेत म्हंटले. काँग्रेसचं सरकार आल्यावर गरिबांना न्याय मिळेल, असंही ते म्हणाले. 

यावर राहुल गांधी आता साेशल मीडियावर चांगलेच ट्राेल हाेत आहेत. गेल्या 70 वर्षात काॅंग्रेस गरिबी घालवू शकली नाही आणि आता निवडणुकींच्या ताेंडावर अशी विधाने करणे बराेबर नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे हे 75 हजार नागरिकांच्या करातूनच दिले जाणार आहेत. म्हणजे नागरिकांना लुबाडण्याचा हा प्रकार असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे. गरिबांना पैसे नकाे तर त्यांच्या हाताला काम द्या असा सूर देखील उमटताना दिसत आहे. 70 वर्षात गरिबी हटली नाही आता हे मान्य करा आणि लाेकांच्या हाताला काम द्या अशी मागणी केली जात आहे.  

  साेशल मिडीयावर राहुल गांधींच्या बातमीवर उमटलेल्या प्रतिक्रीया 

- गडबड करू नका. आधी मोदींनी दिलेले 15 लाख तरी संपू द्या, मग तुमचे घेऊ ! 

- अशाने लोक तुझ्यासारखेच रिकामटेकड होतील ,काम करण्याच सोडून देतील.

- गरीबाला फुकट काही देऊ नका त्याच्या हाताला रोजगार द्या ,

- सरकार कोणतेही असो या फुकट च्या योजना सगळ्या बंद करा या मुळे तरुण पिढी व्यसनाधीन आणि आळशी बनत आहे.

- 1971 मध्ये इंदीराजी गांधी ने गरीबी हटाव चा नारा दिला होता.परंतु आज पर्यंत गरीबी हटली नाही।निवडणुकीत मतदानासाठी ही फसवी घोषणा केली आहे. जनता यात फसणार नाही.

- आधी इतके वर्ष सत्ता भोगली तेव्हा तुम्ही लोकांच्या गरजा पूर्ण नाही केल्या आता परत सत्ता मिळविण्यासाठी लोकांना मुर्ख बनवत आहेत.

- गरीबी हटाव मोहिम 60 वर्षा पासून सुरु आहे आणि आज पुन्हा हाच मुद्धा घेऊन तुम्ही इलेक्शन मध्ये यायले लाजा वाटतात का काँग्रेस ल. चार पिढ्या तुमच्या हाच मुद्दा जनता काय येडी नाही आत्ता.

- 70 वर्षात गरिबी हटली नाही, हे तर मान्य करा आता. गरिबांना हाताला कामं द्या त्यालाही तुमच्या घोषणांचा वीट आला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPuneपुणेcongressकाँग्रेसSocial Mediaसोशल मीडिया