शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

६ डिसेंबरनंतर राज्यात अनेक ठिकाणी दंगलीची शक्यता; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 13:56 IST

प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर निशाणा लगावला.

पुणे- ६ डिसेंबर नंतर देशात काहीही होऊ शकतं, पाच राज्यांच्या निवडणुका संपल्या की परिस्थिती बिघडणार आहे, असा गंभीर दावा आज वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात केला. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात महात्मा फुले यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका निशाणा साधला. 

राष्ट्रवादी पक्ष आमचाच, अजित पवार गटाकडून दावा, विधिमंडळात २६० पानी उत्तर सादर 

"राज्यात ६ डिसेंबर नंतर काहीही होऊ शकते अशा सूचना पोलिसांना आल्या आहेत. पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना आल्या आहेत, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. गेल्या नऊ वर्षात मुस्लिम समाजाने अत्याचार सहन केला आहे. लोकसभा निवडणुकीला चार महिने राहिले आहेत. येत्या लोकसभेला बदल नक्की होणार आहे, सरकार कोणाचे येईल सांगता येत नाही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी नसणार आहे, असंही आंबेडकर म्हणाले. 

संविधान बदलणार अशा घोषणा केल्या जातायत

देशात सध्या धार्मिक हस्तक्षेप होत आहे, आमच्या वैदिक धर्मावर आघात होत आहे, असा ज्यांनी कांगावा केला होता त्यांनी आता देशात हिंदूंचं राज्य असून देशाला हिंदूराष्ट्र करावं, संबोधित करावं, असा नवीन कांगावा केला आहे. तर दुसरीकडे देशालील संविधान बदलणार अशा घोषणा केल्या जात आहेत, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

लोकल पोलिसांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. येत्या काही दिवसात राज्यात दंगली घडू शकतात, असं सांगितलं आहे, असंही आंबेडकर म्हणाले. प्रकाश आंबेडकर म्हणाले, छगन भुजबळ यांना तुरुंगातून मीच बाहेर काढले आहे. त्यांनी या बद्दल माझे आभार मानले नाहीत, तरीही मी नाराज नाही, असंही आंबेडकर म्हणाले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळ