शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मतांवर डोळा ठेवून युद्धाचे राजकारण- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 01:16 IST

निवडणुकीच्या तोंडावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली जात आहे, सगळ्यात जास्त जवान मोदी सरकारच्या काळात शहीद झाले

कळस : निवडणुकीच्या तोंडावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली जात आहे, सगळ्यात जास्त जवान मोदी सरकारच्या काळात शहीद झाले, मात्र किती दहशतवादी मारले याचा आकडा सांगितला जात नाही, युध्दाबाबत ठोस धोरण घेतले जात नाही, युद्धाचे परिणाम चांगले नसतात, तरी मतांवर डोळा ठेवून राजकारण केले जात आहे, असा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.शेळगाव (ता. इंदापुर) येथे राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाची जाहिर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, बाजारसमितिचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, माजी अध्यक्ष बाळासाहेब घोलप, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, अमोल भिसे, सरपंच रामदास शिंगाडे,उपसरपंच तानाजी ननवरे,युवकाचे जिल्हा उपाध्यक्ष शुभम शिंगाडे, अ‍ॅड अशोक शिंगाडे उपस्थित होते.पवार म्हणाले की, राज्यात दुष्काळी सावट आहे. उजनीचा वीजपुरवठा सुरळीत केला जात नाही, भाजप शासनाकडून बाजार समिती, साखर कारखान्यात राजकारण केले जात. आहे युद्धजन्य परिस्थितीमुळे अधिवेशन संपवावे लागले अशी परिस्थिती असतानाही भाजपकडून यामध्ये राजकारण केले जात आहे. कर्जमाफी केली नाही, शेतीमालाला भाव नाही, शेतकरी सन्मान योजना फसवी असून यांच्या काळात डान्सबार पुन्हा चालु केले गेले. यामुळे तरुण पिढी उध्वस्त होत आहे नोकरभरती फसवी आहे उद्योग पतींना सवलत दिली जात आहे. मात्र शेतकऱ्यांना झुलवत ठेवले जात आहे. राज्यावर कजार्चा बोजा आहे. तालुक्यातील गटबाजी चालणार नाही इंदापूरने मला खासदार म्हणून मताधिक्य दिले. त्यामुळे इंदापूरला तालुक्याला विकासासाठी नेहमीच झुकते माप दिले. रस्ते नेहमीच महत्वाचे आहेत माझ्या पेक्षाही जास्त निधी इंदापुरला भरणे यांनी दिला. प्रास्ताविक अ‍ॅड लक्ष्मणराव शिंगाडे यांनी केले. सूत्रसंचालन सचिन देवडे यांनी केले>धनगर समाज आंदोलनाला भाजपाने रसद पुरवलीधनगर समाजाला आंदोलन करण्यासाठी भाजपने रसद पुरविली आंदोलन करत असताना आंदोलक हेलिकॉप्टर मधुन फिरत होते. आरक्षणावरुन दिशाभूल केली जात आहे. धनगर आरक्षणाबाबत टीस अहवाल धूळखात पडला आहे. धनगर समाजाला फसिवले जात आहे.मात्र अदिवासीच्या शैक्षणिक सवलती देणार असल्याचे जाहीर केले. मात्र अर्थसंकल्पात तरतूद केली त्यामुळे भाजपाने केवळ फसविण्याचे काम केले आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाterroristदहशतवादी