शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मतांवर डोळा ठेवून युद्धाचे राजकारण- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 01:16 IST

निवडणुकीच्या तोंडावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली जात आहे, सगळ्यात जास्त जवान मोदी सरकारच्या काळात शहीद झाले

कळस : निवडणुकीच्या तोंडावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली जात आहे, सगळ्यात जास्त जवान मोदी सरकारच्या काळात शहीद झाले, मात्र किती दहशतवादी मारले याचा आकडा सांगितला जात नाही, युध्दाबाबत ठोस धोरण घेतले जात नाही, युद्धाचे परिणाम चांगले नसतात, तरी मतांवर डोळा ठेवून राजकारण केले जात आहे, असा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.शेळगाव (ता. इंदापुर) येथे राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाची जाहिर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, बाजारसमितिचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, माजी अध्यक्ष बाळासाहेब घोलप, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, अमोल भिसे, सरपंच रामदास शिंगाडे,उपसरपंच तानाजी ननवरे,युवकाचे जिल्हा उपाध्यक्ष शुभम शिंगाडे, अ‍ॅड अशोक शिंगाडे उपस्थित होते.पवार म्हणाले की, राज्यात दुष्काळी सावट आहे. उजनीचा वीजपुरवठा सुरळीत केला जात नाही, भाजप शासनाकडून बाजार समिती, साखर कारखान्यात राजकारण केले जात. आहे युद्धजन्य परिस्थितीमुळे अधिवेशन संपवावे लागले अशी परिस्थिती असतानाही भाजपकडून यामध्ये राजकारण केले जात आहे. कर्जमाफी केली नाही, शेतीमालाला भाव नाही, शेतकरी सन्मान योजना फसवी असून यांच्या काळात डान्सबार पुन्हा चालु केले गेले. यामुळे तरुण पिढी उध्वस्त होत आहे नोकरभरती फसवी आहे उद्योग पतींना सवलत दिली जात आहे. मात्र शेतकऱ्यांना झुलवत ठेवले जात आहे. राज्यावर कजार्चा बोजा आहे. तालुक्यातील गटबाजी चालणार नाही इंदापूरने मला खासदार म्हणून मताधिक्य दिले. त्यामुळे इंदापूरला तालुक्याला विकासासाठी नेहमीच झुकते माप दिले. रस्ते नेहमीच महत्वाचे आहेत माझ्या पेक्षाही जास्त निधी इंदापुरला भरणे यांनी दिला. प्रास्ताविक अ‍ॅड लक्ष्मणराव शिंगाडे यांनी केले. सूत्रसंचालन सचिन देवडे यांनी केले>धनगर समाज आंदोलनाला भाजपाने रसद पुरवलीधनगर समाजाला आंदोलन करण्यासाठी भाजपने रसद पुरविली आंदोलन करत असताना आंदोलक हेलिकॉप्टर मधुन फिरत होते. आरक्षणावरुन दिशाभूल केली जात आहे. धनगर आरक्षणाबाबत टीस अहवाल धूळखात पडला आहे. धनगर समाजाला फसिवले जात आहे.मात्र अदिवासीच्या शैक्षणिक सवलती देणार असल्याचे जाहीर केले. मात्र अर्थसंकल्पात तरतूद केली त्यामुळे भाजपाने केवळ फसविण्याचे काम केले आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाterroristदहशतवादी