शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मतांवर डोळा ठेवून युद्धाचे राजकारण- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 01:16 IST

निवडणुकीच्या तोंडावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली जात आहे, सगळ्यात जास्त जवान मोदी सरकारच्या काळात शहीद झाले

कळस : निवडणुकीच्या तोंडावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली जात आहे, सगळ्यात जास्त जवान मोदी सरकारच्या काळात शहीद झाले, मात्र किती दहशतवादी मारले याचा आकडा सांगितला जात नाही, युध्दाबाबत ठोस धोरण घेतले जात नाही, युद्धाचे परिणाम चांगले नसतात, तरी मतांवर डोळा ठेवून राजकारण केले जात आहे, असा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.शेळगाव (ता. इंदापुर) येथे राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाची जाहिर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, बाजारसमितिचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, माजी अध्यक्ष बाळासाहेब घोलप, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, अमोल भिसे, सरपंच रामदास शिंगाडे,उपसरपंच तानाजी ननवरे,युवकाचे जिल्हा उपाध्यक्ष शुभम शिंगाडे, अ‍ॅड अशोक शिंगाडे उपस्थित होते.पवार म्हणाले की, राज्यात दुष्काळी सावट आहे. उजनीचा वीजपुरवठा सुरळीत केला जात नाही, भाजप शासनाकडून बाजार समिती, साखर कारखान्यात राजकारण केले जात. आहे युद्धजन्य परिस्थितीमुळे अधिवेशन संपवावे लागले अशी परिस्थिती असतानाही भाजपकडून यामध्ये राजकारण केले जात आहे. कर्जमाफी केली नाही, शेतीमालाला भाव नाही, शेतकरी सन्मान योजना फसवी असून यांच्या काळात डान्सबार पुन्हा चालु केले गेले. यामुळे तरुण पिढी उध्वस्त होत आहे नोकरभरती फसवी आहे उद्योग पतींना सवलत दिली जात आहे. मात्र शेतकऱ्यांना झुलवत ठेवले जात आहे. राज्यावर कजार्चा बोजा आहे. तालुक्यातील गटबाजी चालणार नाही इंदापूरने मला खासदार म्हणून मताधिक्य दिले. त्यामुळे इंदापूरला तालुक्याला विकासासाठी नेहमीच झुकते माप दिले. रस्ते नेहमीच महत्वाचे आहेत माझ्या पेक्षाही जास्त निधी इंदापुरला भरणे यांनी दिला. प्रास्ताविक अ‍ॅड लक्ष्मणराव शिंगाडे यांनी केले. सूत्रसंचालन सचिन देवडे यांनी केले>धनगर समाज आंदोलनाला भाजपाने रसद पुरवलीधनगर समाजाला आंदोलन करण्यासाठी भाजपने रसद पुरविली आंदोलन करत असताना आंदोलक हेलिकॉप्टर मधुन फिरत होते. आरक्षणावरुन दिशाभूल केली जात आहे. धनगर आरक्षणाबाबत टीस अहवाल धूळखात पडला आहे. धनगर समाजाला फसिवले जात आहे.मात्र अदिवासीच्या शैक्षणिक सवलती देणार असल्याचे जाहीर केले. मात्र अर्थसंकल्पात तरतूद केली त्यामुळे भाजपाने केवळ फसविण्याचे काम केले आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाterroristदहशतवादी