शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

पीएमटी फायद्यात, पीएमपीलाच काय झाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2019 1:07 AM

तोट्याचे गौडबंगाल काय : विसर्जित करण्याची मागणी

पुणे : फक्त पुणे महापालिकेची सार्वजनिक वाहतूकसेवा म्हणून प्रसिद्ध असलेली पीएमटी कधीही तोट्यात नव्हती, मग आता सुरू असलेल्या पीएमपीचा तोटा दरवर्षी वाढतच कसा चालला आहे? याचे गौडबंगाल काय आहे, असा सवाल पुणेकर नागरिकांकडून विचारला जात आहे. ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल यांनी तर यासंबंधी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून पीएमपी बंद करून पुन्हा पीएमटी सुरू करा, अशी मागणीच केली आहे. दरवर्षी त्यांना द्यावे लागणारे ३०० कोटी रुपये तरी वाचतील व ते विकासकामांमध्ये वापरता येतील, असे बागूल यांनी म्हटले आहे.

पीएमपीचा तोटा आता संशयाच्या फेऱ्यात अडकला आहे. महापालिकेची पीएमटी फायद्यात होती. त्यांना बोनसशिवाय महापालिकेला कधीही पैसे द्यावे लागले नाहीत. सेवाही कार्यक्षम होती. नागरिक अजूनही पीएमटी असेच म्हणत असतात. तरीही पिंपरी-चिंचवड महापालिकेची अशीच प्रवासीसेवा, दोन्ही शहरांचा वाढता विस्तार, वाढती प्रवासीसंख्या याचा विचार करून पीएमटी व पीसीएमटी (पिंपरी-चिंचवड महापालिका) यांचे एकत्रिकरण करून पीएमपी ही कंपनी स्थापन केली. असे करताना फायदा अपेक्षित धरला नव्हता, मात्र तोटा होणार नाही, कार्यक्षम सेवा मिळेल, असे गृहित धरले होते.या कंपनीच्या स्थापनेपासून दोन्ही महापालिकांना दरवर्षी कोट्यवधी रुपये तूट भरून काढण्यासाठी म्हणून द्यावे लागत आहेत. तरीही या कंपनीचा तोटा कमी व्हायला तयार नाही. त्यामुळेच हा तोटा संशयास्पद झाला आहे. त्याबाबत पीएमपी व्यवस्थापन स्पष्टीकरण देत नाही.पुणेकरही या सेवेने त्रस्त झाले आहेत. गाड्या रस्त्यातच बिघडतात, वेळेवर येत नाहीत, स्वच्छ नसतात अशा अनेक तक्रारी येत असतात. त्यामुळे कंपनी विसर्जित करावी, पीएमटी ही पुणे महापालिकेमार्फत चालवली जाणारी सेवा परत सुरू करावी, अशी मागणी होत आहे.बागूल यांनी तसेच पत्र आयुक्तांना पाठवले आहे. असे करायचे नसेल तर एक स्वतंत्र प्राधिकरण नियुक्त करून त्याचे संपूर्ण नियंत्रण या सेवेवर राहील, याची व्यवस्था करावी, तसा ठराव दिल्याचे बागूल म्हणाले.

टॅग्स :Puneपुणे