शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

आम्हालाही संमेलनात सहभागी करून घ्या, पराभूत उमेदवाराची आयोजक संस्थेला आर्त विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 9:43 PM

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत पराजित झालेल्या उमेदवारांना संंमेलनात सहभागी करून घेतले जात नसल्याचे आजवर पाहायला मिळाले आहे, अशी खंत व्यक्त करीत पराभूत उमेदवार रवींद्र शोभणे यांनी असे आम्हाला वाळीत टाकू नये, आम्हालाही सन्मानाने संमेलनात बोलवावे, सहभागी करून घ्यावे, अशी आर्त विनंती आयोजक संस्थेला केली आहे.

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत पराजित झालेल्या उमेदवारांना संंमेलनात सहभागी करून घेतले जात नसल्याचे आजवर पाहायला मिळाले आहे, अशी खंत व्यक्त करीत पराभूत उमेदवार रवींद्र शोभणे यांनी असे आम्हाला वाळीत टाकू नये, आम्हालाही सन्मानाने संमेलनात बोलवावे, सहभागी करून घ्यावे, अशी आर्त विनंती आयोजक संस्थेला केली आहे.यंदा बडोदे येथे होणा-या 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीच्या रिंगणात देशमुख यांच्यासह राजन खान, रवींद्र शोभणे, रवींद्र गुर्जर, किशोर सानप असे तब्बल 5 उमेदवार उतरले होते. मतमोजणीदरम्यान लक्ष्मीकांत देशमुख आणि रवींद्र शोभणे यांच्यात चांगलीच लढत झाली. यामध्ये देशमुख यांनी शोभणे यांचा 70 मतांनी पराभव करीत संमेलनाध्यक्षपदावर आपले नाव कोरले. निवडणुकीप्रमाणेच एकमेकांवर कोणतेही आरोप-प्रत्यारोप न करता अपयशही पराभूत उमेदवारांनी अत्यंत खेळीमेळीने घेतले.पराभूत उमेदवारांशी ’लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला. त्यावेळी आजवरच्या संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवारांना संमेलनाला निमंत्रित केले जात नाही, याकडे रवींद्र शोभणे यांनी लक्ष वेधले. एक चांगला आणि बाकीचे वाईट असे कुणाला वाटायला नको, त्यामुळे पराभूत उमेदवारांनाही सन्मानाने संमेलनात सहभागी करून घ्यावे असे ते म्हणाले.----------------------------------------लक्ष्मीकांत देशमुख हे माझे अत्यंत चांगले मित्र आहेत. संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. जिंकायला 70 मते कमी पडली तरी आमच्या दोघांमधील स्पर्धा ही निकोप राहिली. शेवटी यश-अपयश ठरलेले असते. पाचपैकी कुणीतरी एकच निवडून येणार हे गृहीतच असते. मात्र पराभूत उमेदवारांना संमेलनाला निमंत्रित केले जात नाही याचे वाईट वाटते. आयोजक संस्थेने असे वाळीत टाकू नये- रवींद्र शोभणे, साहित्यिक----------------------------------------अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजयी उमेदवाराचे अभिनंदन.  निवडणुकीतील यशापयश हे माझ्या जीवनाचे लक्ष्य नाही. मी जी आश्वासने दिली होती ती लवकरच पूर्ण करणार आहे. मी काहीही गमावले नाही. उलट मला अंतर्मुख होऊन विचार करण्याचे आत्मबळ मी कमावले आहे. मला अंतर्बाह्य माणसं कळली. माणसं कळणं आणि वळणं हेच प्रतिभावंताचं धन आहे. तेच मी व्रतस्थपणे माझ्या लेखनातून मांडणार आहे. मला खूप खूप नवनवीन पात्रं गवसली हे प्रातिभ धन मी जगाला देणार आहे- किशोर सानप, साहित्यिक---------------------------------------संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लक्ष्मीकांत देशमुख यांचे अभिनंदन. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना ज्या गोष्टींवर भर दिला होता, ते काम पुढे तसेच चालू राहील. मात्र महाराष्ट्रासह सगळीकडूनच मते कमी कशी पडली, याचेच आश्चर्य वाटत आहे. निवडणुकीत एकगठ्ठा मतदान होणे, मतपत्रिका गोळा करणे हे प्रकार नेहमीच घडताना दिसतात. या गोष्टी आता हळूहळू पुढे येऊ लागल्या आहेत. भविष्यात याला नक्कीच आळा बसेल- रवींद्र गुर्जर, साहित्यिक

टॅग्स :Puneपुणे