शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
5
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
6
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
7
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
8
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
9
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
10
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
11
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
12
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
13
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
14
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
15
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
16
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
17
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
18
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
19
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
20
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षांबाबत उच्च न्यायालयात याचिका; राज्यातील ११ विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 19:25 IST

विद्यापीठ वेगवेगळी भूमिका जाहीर करत असल्याने भ्रमाचे वातावरणामुळे ११ विद्यापीठातील विद्यार्थी प्रतिनिधींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव

पुणे : राज्यातील सर्वच विद्यापीठांच्यापरीक्षांमध्ये एकसमानता असावी, वेळेवर निकाल लावावे. जेणेकरून देशातील इतर सीईटी परीक्षांच्या तयारीसाठी आणि परदेशी विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सोयीचे व्हावे. यासाठी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि कुलगुरूंना भेटून निवेदन दिली आहेत. आंदोलने केली आहेत. मात्र, तरीही काही विद्यापीठ वेगवेगळी भूमिका जाहीर करत असल्याने भ्रमाचे वातावरणामुळे ११ विद्यापीठातील विद्यार्थी प्रतिनिधींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका (WP/12857/2022, WP/6385/2022) दाखल केली आहे, असे याचिकाकर्ते कल्पेश यादव आणि प्रा. बालुशा बाशल यांनी सांगितले.

प्रा. बालूशा भासल यांनी सांगितले, की सर्व अकृषी विद्यापीठासह इतर विद्यापीठांचे कुलगुरु समवेत उच्च शिक्षण मंत्र्यानी परीक्षांचे नियोजना संदर्भात बैठक घेतली होती. परीक्षेचे नियोजन कसे करावे त्यातच परीक्षांमध्ये एकसमानता असणार, विद्यार्थ्याना प्रश्नपत्रिका संच उपलब्ध करुन देणार, परीक्षांचे नियोजन लवकर करुन निकाल वेळेवर लावणे यांसह इतर मुद्दयांवर या बैठकीमध्ये सर्व कुलगुरुंनी एकमताने ठराव मान्य करत परीक्षांचे नियोजन करण्याचे निश्चित झाले. मात्र, वेळेवर निकाल प्रसिद्ध करण्याचे कारण पुढे करत नागपूर विद्यापीठासह इतर २ विद्यापीठांनी ऑफलाइन एमसीक्यू पद्धतीने परीक्षेचे नियोजन जाहीर केले आहे. मात्र, इतर विद्यापीठ हे ऑफलाइन पद्धतीने नियोजन करणार आहेत. कोणत्याच विद्यापीठाने विद्यार्थ्यांना आजपर्यंत प्रश्नपत्रिका संच उपलब्ध करुन दिलेली नाही.

''राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये कुठेही एकसमानता येताना दिसत नाही. तसेच विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका संच उपलब्ध करुन दिलेली नाही याचा परीणाम परीक्षा, निकालास उशीर लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशास अडचणी निर्माण होणार आहे. ११ विद्यापीठातील विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या मदतीने एकसमानता असावी याकरता न्यायालयात धाव घेतली असल्याचे कल्पेश यादव (राज्य सहसचिव, युवासेना) यांनी सांगितले.'' 

''समान परीक्षा पद्धत असावी. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकां संच मिळावा आणि लवकरात लवकर नवीन शैक्षणिक वर्ष सुरु करावे. यासाठी दोन महिन्यांपासून सर्व विद्यार्थी प्रतिनिधीनी सर्वच विद्यापीठात चर्चा आणि मोर्चे काढून सुद्धा न्याय मिळत नाही. आम्ही कल्पेश यादव यांच्या पुढाकाराने मुंबई उच्च न्यायलायाकडे दाद मागितली आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे असे याचिकाकर्ते प्रा. बालूशा भासल म्हणाल्या आहेत.''  

टॅग्स :universityविद्यापीठexamपरीक्षाSocialसामाजिकStudentविद्यार्थीTeacherशिक्षकCourtन्यायालय