शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बोर्डांच्या स्पर्धेतून वाढतोय विद्यार्थ्यांच्या गुणांचा टक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 08:00 IST

आपल्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे विशेषत: अकरावी तसेच बारावीनंतरच्या इतर प्रवेशाचे मार्ग सुकर व्हावेत यासाठी हा गुणांचा फुगवटा तयार केला जात असल्याची भीती शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देअकरावी व इतर प्रवेशासाठीचा तिढा : खरं मुल्यमापनच होईना, प्रत्येक शाळेत बारावीपर्यंतचे वर्ग सुरू व्हावेतशाळांच्या शंभर टक्के निकालाच्या निकषाचाही पुनर्विचार व्हावा

दीपक जाधवपुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), द कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्ड (आयसीएसई), महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ (एसएससी) व इतर आंतर राष्ट्रीय मंडळ यांच्यात दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुणांची खैरात करण्याची स्पर्धा लागली आहे. आपल्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे विशेषत: अकरावी तसेच बारावीनंतरच्या इतर प्रवेशाचे मार्ग सुकर व्हावेत यासाठी हा गुणांचा फुगवटा तयार केला जात असल्याची भीती शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.सीबीएसई पाठोपाठ आयसीएसई बोर्डाचे दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाले. एसएससी बोडार्चा बारावीचा निकाल मेच्या शेवटच्या आठवडयात तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवडयात लागणार आहे.  सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचे आकडे डोळे दिपवून टाकणारे होते. सीबीएसई बारावीच्या १७ हजार ६९३ विद्याार्थ्यांना ९५ टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. तर ९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्याार्थ्यांची संख्या ९४ हजार २९९ आहे. आयएससी बारावीच्या दोघा विद्यार्थ्यांना तर पूर्ण १०० टक्के गुण मिळाले. तिच परिस्थिती एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांची आहे, त्यांना मिळणाऱ्या कला व क्रीडा गुणांच्या २५ वाढीव गुणांमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत १०० टक्के गुण झळकत आहेत. सीबीएसईच्या परीक्षांची काठिण्यपातळी एसएससी बोडार्पेक्षा कमी असते, तसेच तसेच उत्तरपत्रिका तपासतानाही गुणांच्या बाबतही सढळ हात असतो त्यामुळे सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे गुण सर्रास अधिक असतात, अशी टिका शिक्षण वतुर्ळातून केली जाते. त्याला पर्याय म्हणून एसएससी बोडार्ने बेस्ट ऑफ फाइव्हचा पर्याय स्वीकारला. त्यामध्ये सर्वाधिक गुण मिळालेल्या पहिल्या ५ विषयांचेच मार्क गुणपत्रिकेत ग्राहय धरले जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या टक्क्यांचा आकडाच बदलून गेला. बोर्डांच्या स्पधेर्तून निर्माण झालेला हा गुणांच्या फुगवटा अकरावी प्रवेश व इतर प्रवेशांच्या तात्कालिक फायद्यासाठी उपयोगी ठरत असला तरी दिर्घकालीन विचार करता तो नुकसानकारक आहे. विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करण्याची पध्दतच सदोष करून टाकल्याने त्याचे फटके नंतरच्या काळात विद्यार्थ्यांना बसू लागले आहेत. ९० टक्क्यांच्या पुढे मार्क मिळाल्यामुळे हवेत गेलेले विद्यार्थी इंजिनिअरींग, मेडीकल अभ्यासक्रमांच्या परीक्षेला सामोरे जाताना पूर्णत: गडबडून जात असल्याचे तिथल्या प्राध्यापकांकडून सांगण्यात येत आहे.    ...........आपापल्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळविताना अडचण येऊ नये यासाठी त्यांच्या गुणात वाढ होईल असे मुल्यमापन बोर्डांकडून केले जात आहे. अकरावी प्रवेशाचा तिढा सोडविल्यास बोर्डांकडून होत असलेला गुणांचा फुगवटा रोखता येऊ शकेल. सर्व बोर्डांनी त्यांच्या सर्व शाळांचे वर्ग १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करावेत. दहावी ज्या बोडार्तून उत्तीर्ण झाले त्याच बोडार्तून बारावी उत्तीर्ण झाले पाहिजे. अत्यावश्यक निकड असल्याशिवाय दहावीनंतर बारावीला बोर्ड बदलण्यास परवानगी देऊ नये. गुणवाढीच्या स्पर्धेत सर्वच बोर्ड सहभागी आहेत. त्यामुळे हे थांबवायचे असेल तर सर्वांनी एकत्र येऊन त्याबाबत निर्णय घ्यावे लागतील वसंत काळपांडे, शिक्षणतज्ज्ञ

शाळांच्या शंभर टक्के निकालाच्या निकषाचाही पुर्नविचार व्हावाशाळांचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होणे याला चांगला निकाल म्हटले जाते. ज्या शाळेतील मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण कमी असते, त्या शाळांच्या अनुदानावरही परिणाम होतो. दहावीमध्ये शाळांचा १०० टक्के निकाल लावण्यासाठी ९ वीच्या वर्गातच अनेक विद्यार्थ्यांना नापास केले जात असल्याचे प्रकारही मोठयाप्रमाणात घडत आहेत. त्यामुळे शाळांचा दर्जा निश्चित करण्यासाठी १०० टक्के निकाल लागलाच पाहिजे असा ठरवलेल्या निकषाचाही पुर्नविचार करण्याची गरज आहे.  

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षण