शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
2
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
3
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
4
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
5
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
6
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
7
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
8
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
9
Share Market Today: Nifty ची सुस्त सुरुवात, सेन्सेक्सच्या ३ दिवसांच्या तेजीवर ब्रेक; IT शेअर्स धडाम
10
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
11
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
12
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
13
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
14
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
15
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
16
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
17
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
18
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
19
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
20
Dharmendra Health Update : "आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."

स्मारकांपेक्षा लाेकांच्या जगण्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा : प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 14:02 IST

खासगी धरणांमधील पाणी वीजनिर्मिती ऐवजी दुष्काळी भागाला देण्यात यावे अशी भूमिका वंचित आघाडीने मांडली.

पुणे : महापुरुषांची स्मारकं गरजेची आहेतच परंतु त्याहीपेक्षा लाेकांच्या जगण्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा असल्याचे म्हणत खासगी धरणांमधील पाणीदुष्काळी भागाला देण्यात यावे अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. 

पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. आंबेडकर म्हणाले, राज्यात काही भाग ओला आहे तर काही भाग हा दुष्काळी आहे. राज्यात जशी सरकारी धरणं आहेत तशीच अनेक खाजगी धरणे देखील आहेत. टाटाच्या पाच धरणांमधून वीज निर्मिती केली जाते. सध्या राज्यात विजेचे अतिरिक्त उत्पादन हाेत आहे. विजेची जास्त मागणी असते तेव्हा देेखील अतिरिक्त वीज उरत आहे. त्यामुळे या धरणांमधून करण्यात येणारी वीज निर्मिती टप्प्याटप्प्याने बंद करुन या धरणांमधील पाणी दुष्काळी भागाला देण्यात यावे. टाटा धरणामधील पाणी नद्यांच्या मार्फत उजनी धरणापर्यंत पाेहचवता येईल. तसेच तेथून मराठवाड्यातील विविध भागाला पाणी पुरवता येईल. वंचित सत्तेत आल्यास टाटा ग्रुपशी बाेलून ही याेजना अमलात आणता आणेल असा विश्वास देखील त्यांनी यावेेळी व्यक्त केला. 

तसेच वीज निर्मिती करण्याचे इतर मार्ग असून त्याचा विचार सरकारने करण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले. तसेच सध्या राज्यात वीजेचा कृत्रिम तुटवडा असून सरकारने इच्छाशक्ती दाखवल्यास वीज सर्व शेतकऱ्यांपर्यंत पाेहचविता येणे शक्य असल्याचे आंबेडकरांनी स्पष्ट केले. पाण्याचे समन्यायी वाटप हे वंचितचे धाेरण असल्याचेही ते यावेळी म्हणाले.  

मुख्यमंत्र्यांनी घाबरुन वंचित विराेधपक्ष असेल असे म्हंटलेमुख्यमंत्र्यांनी वंचित हे विराेधपक्षात असेल असे म्हंटले हाेते, ते त्यांनी वंचितला घाबरुन म्हंटले हाेते. आम्ही विराेधीपक्षात नाहीतर सत्तेत असू असा विश्वास देखील आंबेडकरांनी यावेळी व्यक्त केला. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीWaterपाणीdroughtदुष्काळ