शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

Chandrashekhar Bawankule: विधानसभेसाठी भाजप अन् महायुतीचा आकडा लोकच काय ते ठरवतील - चंद्रशेखर बावनकुळे

By राजू इनामदार | Updated: July 16, 2024 18:22 IST

संवाद यात्रेच्या माध्यमातून महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत पांघरलेला खोटेपणाचा बुरखा आम्ही फाडणार आहोत

पुणे: महायुतीत भारतीय जनता पक्ष हाच मोठा भाऊ आहे, मोठ्या भावाला अनेक भूमिका वठवाव्या लागतात. कार्यकर्त्यांचे काम सरकार आणायचे असते, त्यानंतर सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण हे नेत्यांनी ठरवायचे असते असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. लोकसभेसाठी ४०० पार चा नारा होता, आता विधानसभेसाठी किती हे सांगायचे मात्र बावनकुळे यांनी यावेळी टाळले.

भाजपच्या प्रदेश विस्तारीत कार्यकारिणीचे अधिवेशन २१ जुलैला पुण्यात होत आहे. त्याची माहिती देण्यासाठी बावनकुळे पुण्यात आले होते. अधिवेशनाची माहिती दिल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना बावनकुळे यांनी लिलया उत्तरे दिले, मात्र विधानसभेसाठी भाजप किती व महायुती किती हा आकडा सांगण्याचे त्यांनी टाळले. लोकच काय ते ठरवतील असे ते म्हणाले. महायुतीतील सर्वच पक्षांना त्यांची राजकीय शक्ती वाढवण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे ते कार्यक्रम राबवतात, महायुती म्हणून आम्ही एकत्रच आहोत व सर्व पक्षाचे नेते एकत्र बसून जागांचा निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले. पक्षाचे राज्य पदाधिकारी विजय चौधरी, माधव भंडारी तसेच राजेश पांडे, पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यावेळी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

भाजप राज्यात ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान संवाद यात्रा काढणार आहे. सर्व म्हणजे २८८ विधानसभा मतदारसंघात पक्षाचे २० नेते जातील, कार्यक्रम घेतील. मतदारांबरोबर बोलतील असे त्यांनी सांगितले. लोकसभेत महाविकास आघाडीने खोटारडेपणा केला. संविधान बदलण्यात येणार यासारखा प्रचार केला. आम्ही केंद्र सरकार, राज्य सरकारने केलेली कामे सांगितले. त्यांचा खोटेपणा उघड करण्यात आम्ही कमी पडलो. मात्र आता तसे होणार नाही. केंद्र व राज्यात असे दोन्हीकडे एकच सरकार असले की कशी कामे होतात हे राज्यातील जनता पहात आहे. उद्धव ठाकरे सरकारने केंद्राच्या ८ योजना राज्यात बंद करून ठेवल्या. मागील दोन वर्षात आम्ही सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आणल्या, त्या राबवल्या, त्याचीच माहिती आम्ही जनतेत जाऊन देऊ असे बावनकुळे म्हणाले.

अधिवेशनाला पक्षाचे ५ हजारपेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित असतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच अन्य अनेक नेते अधिवेशनाला उपस्थित असतील. पक्षाची आगामी दिशा, धोरणे यावर पक्षात मंथन होईल. विधानसभेच्या निवडणुकांसाठी शाह मार्गदर्शन करतील असे बावनकुळे यांनी सांगितले. संवाद यात्रेच्या माध्यमातून महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत पांघरलेला खोटेपणाचा बुरखा आम्ही फाडणार आहोत असे ते म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेMahayutiमहायुतीBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभा