शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

नातवाचे गुण सांगितले तर पवारांना ‘शॉक’ बसेल : प्रकाश आंबेडकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 12:26 IST

पुणे : ‘‘शरद पवारांनी मला घाबरुनच माढ्यातून माघार घेतली. मावळात नातवाला उभे केले. नातवाचे गुण सांगितले तर पवारांना ‘शॉक’ ...

ठळक मुद्देभाजपा-कॉंग्रेसकडून नोटांद्वारे प्रचार : आपल्या वंचित असण्याला आपणही जबाबदार

पुणे : ‘‘शरद पवारांनी मला घाबरुनच माढ्यातून माघार घेतली. मावळात नातवाला उभे केले. नातवाचे गुण सांगितले तर पवारांना ‘शॉक’ बसेल. या शॉकमध्ये त्यांना काही झाले तर दोष माझ्यावरच यायचा,’’ असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पवारांची घराणेशाही आणि मक्तेदारी संपवण्याचे आवाहन केले. पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शेवटची प्रचारसभा आंबेडकरांनी रविवारी (दि. २१) पुण्यात घेतली. त्यावेळी ते बोलत होते. अनिल जाधव (पुणे) आणि नवनाथ पडळकर (बारामती) या उमेदवारांसह आघाडीचे नेते यावेळी उपस्थित होते. डॉ. आंबेडकर म्हणाले, की देशात घराणेशाहीचे राजकारण सुरु आहे. लोकशाही फुलवायची तर घराणेशाही संपली पाहिजे. जात, धर्म आणि वर्गाच्या वर्चस्वाच्या मक्तेदारी संपविणे आवश्यक असून जनतेने आपले मत विकू नये. कारण, मत विकत घेणाºया उमेदवाराची बांधिलकी पैसे घेणारांसोबत राहात नाही तर त्याच्यासाठी पैसे लावणाऱ्यासोबत असते.  ‘‘निवडणूक प्रचार बंद झाल्यानंतर दोन प्रमुख पक्षांकडून नोटांचा प्रचार सुरु होईल. मत विकत घेतले गेल्यामुळेच शहरांचा आणि झोपडपट्यांचा पाणी, वीज या पलीकडे विकास झाला नाही. आपण वंचित राहिलो याला आपणच जबाबदार असून एका दिवसाची दिवाळी करायची की भविष्यकाळ उज्ज्वल करायचा हे आपण ठरवायला हवे असे ते म्हणाले. राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना यांचे कार्यकर्ते अभिनंदनाचे फोन करीत असून विधानसभेच्या तिकीटांबाबत आतापासूनच विचारणा होऊ लागली आहे,’’ असा दावा आंबेडकरांनी यावेळी केला. महात्मा गांधींना गोळ्या घालणारी मानसिकता आजही जिवंत असून गांधींच्या हत्येनंतर इतक्या वर्षांनंतरही त्यांच्या पुतळ्याला गोळ्या घातल्या जातात. याच मानसिकतेचे उमेदवार पुण्याच्या रिंगणात उतरलेले आहेत. संविधान बदलणाºयांना जागा दाखवून द्या, असे अवाहन डॉ. आंबेडकरांनी केले. सत्ता आल्यास संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना कारागृहात डांबणार असल्याचेही त्यांनी सांगितले...................मोदींना ताकदीने भेटणार‘‘इंदूमिलच्या उद्घाटन कार्यक्रमात मोदी म्हणाले, ‘तुम्ही मला भेटत नाही.’ असे विचारणाऱ्या मोदींना आता 23 मे नंतर ताकदीने भेटणार,’’ असे डॉ. आंबेडकर म्हणाले. देशाची मालमत्ता मोदी कवडीमोल भावाने विकताहेत. दुसरीकडे धार्मिक ध्रुवीकरण सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.

.................खरी लढाई भाजपसोबत‘‘लोकसभा निवडणूकांच्या जागा वाटपाबाबत मी बैठकीला बसा म्हणत असताना कॉंग्रेसवाल्यांनी दुर्लक्ष केले. पुण्यात काँगेसला उमेदवार मिळत नव्हता. शेवट मोहन जोशींना ‘बळीचा बकरा’ बनविण्यात आले. राज्यात कॉंग्रेस तिसऱ्या स्थानावर जाणार असून खरी लढाई भाजप आणि वंचित आघाडीमध्येच होणार आहे. आम्ही कॉंग्रेसशी भांडू, दोन हात करु पण भाजपासोबत जाणार नाही,’’ असे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले.    

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक