शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

पवारांनी पुरंदरच्या जनतेला फसविले- विजय शिवतारे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 2:02 AM

गेली पन्नास वर्षे पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेने पवारांवरती प्रेम केले. मात्र त्यांनी सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली.

भुलेश्वर : गेली पन्नास वर्षे पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेने पवारांवरती प्रेम केले. मात्र त्यांनी सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली. पुरंदरसाठी कोणत्याही प्रकारचे ठोस काम करता आले नाही. पंधरा वर्षांत गुंजवणी धरणाला वीट लावता आली नाही. गेल्या पन्नास वर्षांत पवारांनी पुरंदरच्या जनतेला फसवले असल्याची टीका राज्याचे जलसंपदा व जलसंधारण मंत्री विजय शिवतारे यांनी केली.पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील वाघापूर येथे विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन शिवतारे यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते.शिवतारे म्हणाले, की राज्यामध्ये पुरंदर तालुका सर्वाधिक पुढे असेल. या ठिकाणी नियोजित विमानतळाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. फक्त राजकीय विरोध राहिला आहे. पुरंदरच्या रस्त्यांची कामेसुद्धा आता जोमात सुरु आहेत असल्याने आता बारामतीकडे झुकण्याची गरज नसल्याचे टोला त्यांनी लगावला.या वेळी जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, ज्योती झेंडे, पुरंदर पंचायत समितीच्या सभापती अर्चना जाधव, माजी सभापती अतुल म्हस्के ,पंचायत समिती सदस्य रमेश जाधव, रमेश इंगळे, युवा सेना अध्यक्ष मंदार गिरमे,उमेश गायकवाड, गणेश मुळीक, वाघापुरच्या सरपंच छाया वाघमारे, उपसरपंच सारिका कुंजीर, नरेश कुंजीर, मनोज कुंजीर, प्रविण कुंजीर, बाळासो इंदलकर, नितिन कुंजीर परिसरातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.>गुंजवणी धरणाल तेराशे कोटींची मान्यतातालुक्याला वरदान ठरणाऱ्या गुंजवणी धरणाचे काम प्रगतिपथावर आहे. तेराशे तेरा कोटींची मान्यता मिळाली आहे. पन्नास कोटींचा निधीही आहे. फेब्रुवारीच्या अधिवेशनात पुढील निधी येईल. यामुळे गुंजवणीला निधी कमी पडणार नाही. यामुळे पुढील पंधरा दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरू केले जाईल.