शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत ४४० जनावरांची बिबट्यांनी केली शिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 01:17 IST

जुन्नर आणि आंबेगाव तालुका तेथील ऐतिहासिक घटनांपेक्षा बिबट्यांकडून केल्या जाणाऱ्या शिकारीनेच अधिक गाजतो आहे. गेल्या पाच वर्षांत बिबट्यांनी गावातील पाळीव जनावरांवर हल्ला करत तब्बल ४४० हून अधिक जनावरांची शिकार केली आहे.

- रामनाथ मेहेरओतूर -  जुन्नर आणि आंबेगाव तालुका तेथील ऐतिहासिक घटनांपेक्षा बिबट्यांकडून केल्या जाणाऱ्या शिकारीनेच अधिक गाजतो आहे. गेल्या पाच वर्षांत बिबट्यांनी गावातील पाळीव जनावरांवर हल्ला करत तब्बल ४४० हून अधिक जनावरांची शिकार केली आहे. वनविभागाकडून या बिबट्यांना योग्य ठिकाणी सोडण्यास यश मिळाले नाही की नागरिकांना त्यांच्या दहशतीपासून मुक्त करणे झाले नाही. मात्र, बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे जनावरांपासून मुकाव्या लागणाऱ्या ग्रामस्थांना नुकसान भरपाई म्हणून वनविभागाने तब्बल ३४ लाख ८२ हजारांची नुकसानभरपाई दिली आहे.ओतूर आणि परिसरात बिबट्यांचा खुलेआम वावर वाढला आहे. रानावनात वास्तव्य करणारा बिबट्या गावठाण भागात नरजेस पडत असल्याने बिबट्याची ग्रामस्थांच्या मनात चांगलीच धास्ती बसली आहे. रात्रीच्या सुमारास ओतूरच्या शिवाजी रोड पाठीमागील गस्त गल्लीत बिबट्या सर्रास नजरेस पडतो आहे. या परिसरातील डुकरांच्या व भटक्या कुत्र्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली असल्याने येथे दिवसाढवळ्या जाण्यासही नागरिक धजावत नाहीत.एकट्या जुन्नर तालुक्यात सुमारे चाळीसहून अधिक गावांत बिबट्यांचा वावर असल्याच्या नोंदी वनविभागाकडे आहेत. जंगलात बिबट्याला खाद्य मिळत नसल्याने व डोंगर टेकड्यांच्या सपाटीकरणामुळे तो नागरी वस्तीकडे वळला आहे.रात्री गावात येऊन शिकार करण्यास झाला सराईतओतूर, आंबेगव्हाण, लागाचा घाट, रोहोकडी, शेटेवाडी, अहिंनवेवाडी, बेल्हे, आळे, खोडद, आंबेगाव, जोगा या भागांतच बिबट्या दिसायचा. क्वचितच तो गावातही यायचा अलीकडे मात्र हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. रोहोकडी, ओतूर, सारणी, चिल्हेवाडी येथील डोंगर, ओढे, नाले, नदी, ऊस शेती म्हणजे बिबट्यांची वस्तीच झाली आहे. त्यामुळे ते गावात येऊन शिकार करण्यात सराईत झाले आहेत.वनक्षेत्रपाल पडतात अपुरेओतूर वन विभागाच्या परिमंडल हद्दीत ११ हजार ३०० हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी जुन्नर, ओतूर अशी दोन वनपरिक्षेत्र कार्यालये देखभालीसाठी आहेत.वनविभागाच्या ब्ीाटनिहाय बिबट्याचे क्षेत्र वाढत आहे. त्यांना जेरबंद करायचे असल्यास वनक्षेत्रपाल आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे.दोन्ही वनपरिक्षेत्रात बिबट्यांचा मोठा वावर आहे. सुमारे सत्तरपेक्षाही जास्त ठिकाणी बिबट्याचा वावर रोजचा झाला आहे.बिबट्यांची संख्या वाढली असली तरी पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्नही तितकेच केले जाते.बिबट्याला मारता येत नाही. त्याला पकडून त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडावे लागते. बिबट्याला मारता येत नाही. त्याला पकडून त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडावे लागते.बिबट्या अतिशय हिंस्र प्राणी असल्यामुळे त्याला पकडणे तितके सोपे नाही. मात्र, वनविभागाने यंदाच्या वर्षी अनेक ठिकाणी पिंजरे लावून बिबट्या पकडले आहेत. नागरिकांनी सतर्क राहून बिबट्या दिसताच वनरक्षकाला कळविल्यास जास्तीत जास्त बिबटे पकडण्यात मोठी मदत मिळेल, अशी माहिती ओतूर वनपरिमंडल अधिकारी बापू येळे व वनपाल सचिन मोढवे यांनी दिली.

टॅग्स :leopardबिबट्याPuneपुणेwildlifeवन्यजीव