शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सुरक्षित आणण्याची पालकांची विनंती; शरद पवार हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 12:08 IST

मणिपूरचा संघर्ष विकोपाला गेला असून महाराष्ट्रातील बारा विद्यार्थी अद्यापही मणिपूर राज्यातच अडकले आहेत

बारामती : मणिपूर येथील आयआयआयटी शैक्षणिक संस्थेत अजूनही काही विद्यार्थी अडकलेले आहेत. या विद्यार्थ्यांचे पालक मला आज भेटले आहेत.  याविषयी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे. राज्य सरकारने या विद्यार्थ्यांना सुरक्षित महाराष्ट्रात आणण्याबाबत मी चर्चा करतोय, मात्र त्यांचा संपर्क झालेला नाही. आता मी फोन द्वारे संपर्क साधणार आहे, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले. 

मणिपूर येथील इंफाळ येथे आदिवासी आणि बिगर आदिवासी या दोन समुदायांमध्ये अनुसूचित जमातीच्या दजार्बाबत संघर्ष पेटला आहे. हा संघर्ष विकोपाला जाऊन बॉम्बस्फोट व गोळीबार सारखा हिंसाचार होत आहे. अशा परिस्थितीत शिक्षणासाठी इंफाळ येथे असणारे महाराष्ट्रासह इतर राज्यातील अनेक विद्यार्थी अडकले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मणिपूर राज्याच्या राज्यपालांशी बोलून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. इतर राज्यातील विद्यार्थ्यांना त्या त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यात आणले आहे. मात्र महाराष्ट्रातील बारा विद्यार्थी अद्यापही मणिपूर राज्यातच अडकले असून महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सुरक्षित आणण्याची विनंती पालकांनी केली आहे. मणिपूरमध्ये सध्या दहशतीचे वातावरण आहे. 

मणिपूरमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी अडकले असल्याने पालक शरद पवारांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी भेटायला आले होते. मणिपूर येथील आयआयआयटी विद्यापीठात शिकण्यासाठी गेलेले १२ विद्यार्थी अडकले असल्याची माहिती पालकांनी शरद पवारांना दिली आहे. त्यानंतर शरद पवारांनी मणिपूर येथील सरकारशी बोलून मुलांना सुरक्षा दिली असल्याचे पालकांनी संगितेल आहे. शरद पवारांना भेटण्यासाठी सांगली जिल्ह्यातील पालक  गोविंद बागेत आले होते. इतर राज्यातील विद्यार्थी त्यांच्या राज्यात सरकारने परत नेले परंतु महाराष्ट्र सरकारने विद्यार्थी आणण्यास दिरंगाई केल्याचे पालकांनी सांगितले आहे. तरी सरकारने विद्यार्थांना लवकर परत आणावी अशी आर्त हाक पालकांनी सरकारला दिली आहे.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसStudentविद्यार्थीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस