शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

पानशेत धरणही शंभर टक्के भरले; साखळीतील ४ धरणांतील साठा २६ टीएमसीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 09:48 IST

जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावासाचा चांगला जोर आहे.

ठळक मुद्देचारही धरणांत मिळून २६.३३ टीएमसी (९० टक्के) पाणीसाठा

पुणे : खडकवासला साखळीतील धरण क्षेत्रात पावसाची जोरदार वृष्टी होत असून, खडकवासला पाठोपाठ पानशेत धरणही फुल्ल झाले आहे. साखळीतील चारही धरणांतील पाणीसाठा २६.३३ अब्ज घनफूट (टीएमसी) झाला आहे. पानशेत धरण भरल्याने त्यातून ४ हजार ५५१ क्युसेक्सने पाणी खडकवासल्यात सोडण्यात आले. त्यामुळे खडकवासला धरणातून दुपारी ११ वाजता तब्बल १६ हजार २४७ क्युसेक्सने मुठा नदीत पाणी सोडण्यात येत होते. परिणामी नदीकाठचे रस्ते पाण्याखाली गेले होते. सायंकाळीदेखील धरण क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने त्यातील विसर्ग २० हजार ६८१ क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात आला. जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावासाचा चांगला जोर आहे. शुक्रवारी सकाळी आठपर्यंत टेमघरला १२३, वरसगाव ११७, पानशेत ९२ आणि खडकवासला धरणक्षेत्रात ३३ मिलिमीटर पाऊस झाला. शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत टेमघर ५६, वरसगाव ३२, पानशेत २७ व खडकवासल्याला ८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पानशेत धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने खडकवासल्यातून सकाळी आठ वाजता १३ हजार ९८१ क्युसेक्सने पाणी मुठा नदीत सोडले. पानशेत धरण भरल्यानंतर तेथून विसर्ग सुरू झाल्यानंतर, खडकवासल्यातून १६ हजार २४७ क्युसेक्स पाणी नदीत सोडण्यात येत होते. खडकवासला साखळीतील वरसगाव धरणात १०.९२ (८५.१९ टक्के), पानशेत १०.६५ (१०० टक्के), टेमघर २.७९ (७५.१७ टक्के) व खडकवासला धरणात १.९७ टीएमसी (१०० टक्के) पाणीसाठा आहे. तर, चारही धरणांत मिळून २६.३३ टीएमसी (९० टक्के) पाणीसाठा झाला आहे. गुंजवणी धरण क्षेत्रात शुक्रवारी सकाळी ८ पर्यंत ८२ व दिवसभरात १४ मिलिमीटर पाऊस झाला. धरणात ३.६२ टीएमसी (९८ टक्के) पाणीसाठा जमा झाल्याने, धरणातून १४०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत होते. वीर धरणात वेगाने पाणी जमा होत असल्याने शुक्रवारी पहाटे ३१ हजार ६८९ क्युसेक्स पाणी नदीत सोडण्यात येत होते. त्यानंतर सायंकाळी त्यात १३ हजार ९४ क्युसेक्सपर्यंत कपात केली. वीर धरणात ८.७७ टीएमसी (९३.२० टक्के) पाणीसाठा आहे. नीरा देवघर धरण क्षेत्रात दिवसभरात ३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यात १०.८३ टीएमसी (९२.३६ टक्के) पाणी जमा झाले आहे. भाटघर धरणात २०.३६ टीएमसी (८६.६२ टक्के) पाणीसाठा असून, नाझरे धरणात उपयुक्त पाणीसाठा होऊ लागला आहे. चासकमान धरणात ७.४७ टीएमसी (९८.६६ टक्के) पाणीसाठा झाल्याने, शुक्रवारी दुपारी १०,९१५ क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले.......... 

टॅग्स :PuneपुणेDamधरणRainपाऊसWaterपाणी